शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

...तर ‘त्या’ पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 02:45 IST

राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या सव्वादोन लाखांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सावधगिरीचा इशारा आहे.

जमीर काझी / मुंबईराज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या सव्वादोन लाखांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सावधगिरीचा इशारा आहे. आपल्या समस्या, मागणी व प्रश्नांबाबत घटनात्मक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींशी म्हणजे विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल किंवा मुख्यमंत्र्यांशी थेट पत्रव्यवहार केल्यास त्यांना ते महागात पडण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे आपली कैफियत त्यांना रीतसर विहीत पद्धतीने मांडावयाची आहे. अधिकाऱ्यांनी परस्पर पत्रव्यवहार केल्यास त्यांना पोलीस नियमावलीनुसार शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत घटनात्मक पदावरील व्यक्तीशी संपर्क साधावा, असे आदेश सर्व पोलीस घटकप्रमुखांना देण्यात आले आहेत. कामाचा अतिरिक्त ताण, वरिष्ठांकडून होणारा अन्याय, कौटुंबिक समस्या आदींमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर परिणाम होत असतो. त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून न्याय मिळण्याची शक्यता वाटत नसल्याने अनेक अधिकारी थेट राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री यांच्याशी परस्पर पत्रव्यवहार करून आपली गाऱ्हाणी मांडतात. वास्तविक पोलीस नियमावली भाग-२ मधील नियम २३७(१) मधील सूचनांप्रमाणे थेट पत्रव्यवहार करण्यास मनाई असून त्याबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद आहे. त्याबाबत खबरदारी बाळगण्याची सूचना वारंवार केली जाते. त्यासाठी पाच वर्षांपूर्वी स्वतंत्र परिपत्रक काढून इशारा देण्यात आला आहे. मात्र, तरीही घटनात्मक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींकडे पोलिसांकडून तक्रार अर्ज, मागणीपत्रांचा ओघ कायम सुरू आहे. त्यामुळे महासंचालक सतीश माथूर यांनी सर्व घटकप्रमुखांना त्याबाबत बजाविले आहे. संबंधित व्यक्तीशी एखाद्या विषयासंबंधी पत्रव्यवहार करावयाचा असल्यास पोलीस मुख्यालयामार्फत करावयाचा आहे. राजशिष्टाचार सोडून परस्पर पत्रव्यवहार केल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. त्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अंमलदार, अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, असेही सुचविण्यात आले आहे.