शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

...तर ‘त्या’ पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 02:45 IST

राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या सव्वादोन लाखांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सावधगिरीचा इशारा आहे.

जमीर काझी / मुंबईराज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या सव्वादोन लाखांहून अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सावधगिरीचा इशारा आहे. आपल्या समस्या, मागणी व प्रश्नांबाबत घटनात्मक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींशी म्हणजे विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल किंवा मुख्यमंत्र्यांशी थेट पत्रव्यवहार केल्यास त्यांना ते महागात पडण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे आपली कैफियत त्यांना रीतसर विहीत पद्धतीने मांडावयाची आहे. अधिकाऱ्यांनी परस्पर पत्रव्यवहार केल्यास त्यांना पोलीस नियमावलीनुसार शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पोलीस महासंचालक कार्यालयामार्फत घटनात्मक पदावरील व्यक्तीशी संपर्क साधावा, असे आदेश सर्व पोलीस घटकप्रमुखांना देण्यात आले आहेत. कामाचा अतिरिक्त ताण, वरिष्ठांकडून होणारा अन्याय, कौटुंबिक समस्या आदींमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर परिणाम होत असतो. त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून न्याय मिळण्याची शक्यता वाटत नसल्याने अनेक अधिकारी थेट राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री यांच्याशी परस्पर पत्रव्यवहार करून आपली गाऱ्हाणी मांडतात. वास्तविक पोलीस नियमावली भाग-२ मधील नियम २३७(१) मधील सूचनांप्रमाणे थेट पत्रव्यवहार करण्यास मनाई असून त्याबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद आहे. त्याबाबत खबरदारी बाळगण्याची सूचना वारंवार केली जाते. त्यासाठी पाच वर्षांपूर्वी स्वतंत्र परिपत्रक काढून इशारा देण्यात आला आहे. मात्र, तरीही घटनात्मक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींकडे पोलिसांकडून तक्रार अर्ज, मागणीपत्रांचा ओघ कायम सुरू आहे. त्यामुळे महासंचालक सतीश माथूर यांनी सर्व घटकप्रमुखांना त्याबाबत बजाविले आहे. संबंधित व्यक्तीशी एखाद्या विषयासंबंधी पत्रव्यवहार करावयाचा असल्यास पोलीस मुख्यालयामार्फत करावयाचा आहे. राजशिष्टाचार सोडून परस्पर पत्रव्यवहार केल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. त्याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अंमलदार, अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, असेही सुचविण्यात आले आहे.