शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
2
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
3
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
4
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
5
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
6
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
7
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
8
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
9
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
10
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
11
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
12
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
13
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
14
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
15
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
16
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा
17
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
18
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
19
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
20
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

‘...तर सरकारसोबत राहण्याबाबत विचार करू’

By admin | Updated: December 30, 2014 01:12 IST

तर आम्ही सरकारसोबत राहण्याबाबत विचार करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला.

सोलापूर : आमच्या आंदोलनामुळेच पाचशेचा दर अडीच हजार झाला. सर्व बाजूंनी शेतकरी भरडत असताना शासनाने शेतकऱ्यांसाठी ठोस भूमिका घेतली नाही, तर आम्ही सरकारसोबत राहण्याबाबत विचार करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला.ऊस दर व अन्य शेतकरी प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खा़ राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ मोर्चानंतर शेट्टी म्हणाले, मागील १५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमची लढाई सुरू आहे. आम्ही आजवर आंदोलनेच केल्यामुळेच साखर कारखानदारांना उसाला भाव द्यावा लागला आहे. दूध व उसाची परवड होत असताना आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही. उसाला एफआरपीप्रमाणे दर देणे साखर कारखानदारांना बंधनकारक आहे. दर न दिल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार शेतकऱ्यांनी उलथून टाकले आहे. ही वेळ शिवसेना-भाजपाच्या सरकारवर येऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. तसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील तसेच साखर आयुक्तांसोबत चर्चा झाली आहे. एफआरपीची तोडफोड करून १५०० रुपयांचा दर देणे चुकीचे आहे. ऊस गेल्यानंतर १४ दिवसांत एफआरपीनुसार विनाकपात उसाला दर देणे कायद्याने कारखानदारांवर बंधनकारक आहे. तसे होत नसल्यानेच मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. आता कारखानदारांच्या दबावापुढे न झुकता कायद्याचे पालन शासनाने केले पाहिजे. तसे झाले नाही, तर आम्हाला सरकार सोबत राहण्याबाबत विचार करावा लागेल, असा इशारा खा. शेट्टी यांनी दिला़