शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

‘...तर सरकारसोबत राहण्याबाबत विचार करू’

By admin | Updated: December 30, 2014 01:12 IST

तर आम्ही सरकारसोबत राहण्याबाबत विचार करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला.

सोलापूर : आमच्या आंदोलनामुळेच पाचशेचा दर अडीच हजार झाला. सर्व बाजूंनी शेतकरी भरडत असताना शासनाने शेतकऱ्यांसाठी ठोस भूमिका घेतली नाही, तर आम्ही सरकारसोबत राहण्याबाबत विचार करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी दिला.ऊस दर व अन्य शेतकरी प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खा़ राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ मोर्चानंतर शेट्टी म्हणाले, मागील १५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमची लढाई सुरू आहे. आम्ही आजवर आंदोलनेच केल्यामुळेच साखर कारखानदारांना उसाला भाव द्यावा लागला आहे. दूध व उसाची परवड होत असताना आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही. उसाला एफआरपीप्रमाणे दर देणे साखर कारखानदारांना बंधनकारक आहे. दर न दिल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार शेतकऱ्यांनी उलथून टाकले आहे. ही वेळ शिवसेना-भाजपाच्या सरकारवर येऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. तसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील तसेच साखर आयुक्तांसोबत चर्चा झाली आहे. एफआरपीची तोडफोड करून १५०० रुपयांचा दर देणे चुकीचे आहे. ऊस गेल्यानंतर १४ दिवसांत एफआरपीनुसार विनाकपात उसाला दर देणे कायद्याने कारखानदारांवर बंधनकारक आहे. तसे होत नसल्यानेच मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. आता कारखानदारांच्या दबावापुढे न झुकता कायद्याचे पालन शासनाने केले पाहिजे. तसे झाले नाही, तर आम्हाला सरकार सोबत राहण्याबाबत विचार करावा लागेल, असा इशारा खा. शेट्टी यांनी दिला़