शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

...तर स्वप्निलचे प्राण वाचले असते

By admin | Updated: July 21, 2016 02:50 IST

अल्पवयीन प्रेमप्रकरणातून एकाचा बळी गेल्याची घटना मंगळवारी रात्री नेरूळ येथे घडली.

सूर्यकांत वाघमारे,

नवी मुंबई- अल्पवयीन प्रेमप्रकरणातून एकाचा बळी गेल्याची घटना मंगळवारी रात्री नेरूळ येथे घडली. या घटनेला जातीवाद मुख्य कारणीभूत असला तरी बघ्याच्या भूमिकेतील नागरिक आणि पोलीस यंत्रणेचा गाफीलपणा हा देखील तितकाच जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. जर एकातरी ठिकाणावरून पीडित कुटुंबाला मदत मिळाली असती, तर कदाचित हा प्रकार घडला देखील नसता. अवघ्या पंधरा वर्षांचा स्वप्निल आणि चौदा वर्षांची त्याची आर्ची (बदललेले नाव) या दोघांचे आठवीपासून एकमेकांवर प्रेम होते असे समजते. त्यांना एकमेकांची जात माहिती नव्हती किंवा माहिती असली तरी समाजाची भावना त्यांना ज्ञात नसावी. शाळेत एकत्र, क्लासही एकच तर कॉलेजही एक असावे यासाठीही त्यांचा प्रयत्न होता. परंतु केवळ जात म्हणजेच प्रतिष्ठा करून बसलेल्या त्या आर्चीच्या कुटुंबीयांना त्यांची मुलगी दुसऱ्या जातीतील स्वप्निलच्या प्रेमात असल्याचे पचनी पडले नाही. त्या दोघांना वेगळे करण्यासाठी वाटेल ते करण्याचे त्यांनी ठरवले आणि मंगळवारची रात्र स्वप्निलची शेवटची रात्र ठरली. त्याचा तो कॉलेजचा पहिलाच दिवस होता.बहिणीच्या प्रियकराचा काटा काढायचाच या भावनेतून त्या आर्चीच्या भावाने स्वप्निलचे अपहरण करून धमकी दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो ८ ते १० साथीदारांना घेवून स्वप्निल राहत असलेल्या एसबीआय कॉलनीत घुसला. तिथे थेट स्वप्निलच्या कुटुंबीयांना बळजबरीने इमारतीच्या टेरेसवर नेवून खाली टाकण्याची धमकी तो देत होता. यादरम्यान इमारतीमधील रहिवासी जरी सोनावणे कुटुंबीयांच्या मदतीला आले असते, तर त्या प्रिन्सचे एवढे धाडस देखील झाले नसते. दुर्दैवाने तसे झाले नाही व हा प्रिन्स स्वप्निलच्या कुटुंबीयांचे अपहरण करुन घेवून जाण्यात यशस्वी ठरला. एरवी एसबीआय वसाहतीमध्ये जायचे म्हटले तरी सुरक्षा यंत्रणेच्या हजार चौकशांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीमध्ये त्याठिकाणी ते गुंड घुसले कसे हा देखील मोठा प्रश्न आहे. मुळात स्वप्निलचे अपहरण होवून धमकी मिळालेली, त्याचवेळी पोलिसांनी गांभीर्याने घेणे गरजेचे होते. तसे झाले असते तर हा प्रकार घडलाच नसता. परंतु ज्या उद्देशाने खाकी वर्दी घातलीय, त्या कर्तव्याचाच विसर पडलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी देखील संकटकाळी त्यांना मदत नाकारली. शिवाय मुलीच्या कुटुंबापासून तुमची सुटका कोणीच करू शकणार नाही, असाच भास करून दिला. त्यामुळे जीवन आणि मरणाच्या मध्ये गुंतून राहण्यापेक्षा परिस्थितीला सामोरे जात मुलीच्या कुटुंबीयांपुढे हात टेकणे हाच पर्याय त्यांनी मान्य केला. परंतु त्यातही त्यांचा घात झाला. माफीच्या बहाण्याने घरी नेल्यानंतर स्वप्निल व त्याच्या आई- वडिलांवर २५ ते ३० जणांनी हल्ला चढवला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या स्वप्निलला मोठ्या आशेने रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.>पोलिसांची भूमिका संशयास्पदस्वप्निलचे अपहरण होवून धमकी मिळालेली, त्याचवेळी पोलिसांनी गांभीर्याने घेणे गरजेचे होते. पोलिसांनी या प्रकाराकडे गांभार्याने घेतले असते तर हा प्रकार घडलाच नसता. पोलीस अधिकाऱ्यांनी देखील संकटकाळी त्यांना मदत नाकारली. शिवाय मुलीच्या कुटुंबापासून तुमची सुटका कोणीच करू शकणार नाही, असा भास करून दिला.