शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

फिर वही दिल लाया हॅूँ...

By admin | Updated: October 20, 2014 00:38 IST

‘जयाभाव’च्या पाण्यात विरोधकांच्या गटांगळ्या : काका पक्षापेक्षा मोठे नव्हे... शंभूराजच्या गुंडगिरीचा बागुलबुवा जनतेनेच संपविला!

सचिन जवळकोटे - सातारा--टेबलावर हातोडा पडल्यावर जशी आजूबाजूची काच तडकत जाते; तसं ‘मोदी तडाखा’ बसल्यानंतर पुणे, सांगली अन् कोल्हापूरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडासाफ झाला... पण या त्सुनामी लाटेतही साताऱ्याचा बालेकिल्ला मात्र अभेदय राहिला. राष्ट्रवादीचे ‘पाच पांडव’ अन् काँग्रेसचे ‘राम-लक्ष्मण’ पुन्हा एकदा ‘जायंट किलर’ ठरले. मात्र, शिवसेनेच्या ‘अभिमन्यू’नंही सत्तेचा चक्रव्यूह भेदून काढला.‘साताऱ्यात ओन्ली वन राजे’ हे परवलीचं वाक्य शिवेंद्रसिंहराजेंनी पुन्हा एकदा सार्थ करून दाखविलं. बाबाराजेंच्या शब्दाला मान देऊन सातारा-जावळीकरांनी मनापासून ‘पाहुण्यांना बाय-बाय’ केलं. ‘साताऱ्यात दिवाळी’ साजरी करायला आलेले ‘मुंबईकर’ पुन्हा आपल्या गावी निघून गेले; मात्र पवारांच्या दिपकनं मिळविलेली मतं राजेंच्या भवितव्यासाठी नक्कीच धोकादायक. गेल्या निवडणुकीत नरेंद्र पाटलांना २१ हजार मतं पडली होती, यावेळी ही तब्बल अडीचपटीनं वाढली. ५० हजार मतं घेऊन पवार दुसऱ्या स्थानी राहिले. ‘एवढी कामं करूनही असं कसं झालं,’ याचं आत्मपरीक्षण बाबाराजेंनी नक्कीच केलं असावं. म्हणूनच वाढलेल्या ‘कट मिशी’वर ताव मारत त्यांनी आजच पत्रकारांना सांगितलं की, ‘याद राखाऽऽ माझ्याजवळही दगडं आहेत!’वाईत मकरंद पाटलांची चावी पुन्हा एकदा परफेक्ट बसली. मदनदादांची सारी गणितं मोडीत काढून त्यांनी ३८ हजारांचा लीड घेतला. गेल्यावेळेपेक्षा जवळपास सोळा हजारांनी आकडा वाढला. आबांनी यंदा विकासावर अधिक भर दिला तर दादांची विश्वासार्हता कमी पडली. ‘प्रत्येक वेळी आपल्या कार्यकर्त्यांना गृहीत धरून काम करता येत नाही,’ हा संदेशही लोकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचविला. त्यामुळं यापुढं कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच राजकीय निर्णय घेण्याची सवय त्यांना लावून घ्यावी लागेल.फलटणमध्ये तर दिगंबर आगवणेंच्या चमत्कारीक ‘कसरती’मुळं रामराजे गटाला रान मोकळं मिळालं होतं. हातातोंडाशी चालून आलेला आयता घास दूर सारण्याची महाघोडचूक करणाऱ्यांना फलटणकरांनी शेवटपर्यंत उपाशीच ठेवलं. अशातच, सोनवलकरांना झेड्पी अध्यक्षपद देऊन राष्ट्रवादीनं खूप छान खेळी केली. असो, लोकसभेच्या पराभवाचं उट्टं काढल्यामुळं रामराजे सुखावले. बारामतीकरांच्या नजरेत त्यांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा वाढली. त्याचा फायदा जिल्ह्याच्या राजकारणात करून घ्यायला ते आता तयार असतीलच.‘माण-खटाव’मध्ये मात्र ‘कपबशी’ची स्वप्नं खळ्ळऽऽकन फोडून ‘जयाभाव’चा ‘हात’ अधिकच मजबूत झाला. राष्ट्रवादीच्या साध्या सरपंचापासून ते शरद पवारांपर्यंत साऱ्यांनीच त्यांच्या पराभवासाठी देव पाण्यात ठेवले होते; परंतु ‘जयाभाव’नं आणलेल्या ‘उरमोडी’च्या पाण्यात सारे विरोधक गटांगळ््या खात बुडाले. आजपावेतो जाती-पातीच्या राजकारणात अडकलेल्या इथल्या जनतेनं प्रथमच विकासाला भरभरून मत दिलं. गुदगे-येळगावकरांसारख्या ‘भूमिका बदलू’ नेत्यांनाही जनतेनं स्पष्टपणे वास्तवाची जाणीव करून दिली.कोरेगावात तर शशिकांत शिंदे खऱ्या अर्थानं ‘जायंट किलर’ ठरले. बेरजेच्या राजकारणात आपण किती सरप्लस आहोत, हे त्यांनी ४७ हजारांच्या लीडवरून दाखवून दिलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, शिंदेंनी उदयनराजेंशी केलेली युती जिल्ह्याच्या राजकारणाला भलतीच कलाटणी देणारी. या दोन नेत्यांचं एकत्र येणं, विरोधकांसाठी (पक्षातल्याही) मती गुंग करणारं अन् पोटशूळ उठविणारी.‘कऱ्हाड उत्तर’मध्ये बाळासाहेबांनी मैदान मारलं असलं तरी गेल्यावेळेपेक्षा निम्म्यावर आलेला लीड त्यांच्यासाठी नक्कीच धोक्याची घंटा वाजविणारा. गेल्यावेळी पक्ष सोबत नसतानाही त्यांनी एकट्याच्या जीवावर ४२ हजारांची आघाडी घेतलेली; परंतु आजचा निकाल पाहता कार्यकर्त्यांचीही चुळबूळ वाढलेली. त्यांनी आतून काँग्रेसशी संधान साधल्यानं त्यांना एवढा तरी विजय मिळविता आला; परंतु स्वत:च्या फायद्यासाठी पृथ्वीराज बाबांशी वाढविलेली सलगी म्हणे अजितदादांच्या डोक्यात बसलीय! असो, ‘सत्तेसाठी वाट्टेल ते’ करण्याऱ्या पक्षाच्या संस्कृतीतच बाळासाहेब वाढलेले. त्यात या बिच्चाऱ्या आमदारांचा तरी काय दोष?‘कऱ्हाड दक्षिण’मध्ये मात्र पृथ्वीराज बाबांनी काकांची पुरती वाट लावून टाकली. तब्बल सातवेळा आमदार झालेल्या काकांना त्यांनी शेवटी घरी बसवलं. ‘कोणताही नेता पक्षाच्या जीवावर मोठा होतो. पक्षापेक्षा नव्हे!’ या राजकीय समीकरणाची जनतेनेच जाणीव करून दिली. बाबांनीही ‘जनाधार नसलेला नेता’ हा आपल्यावरचा डागही पुसून काढला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कऱ्हाडकरही अखेरपर्यंत अठराशे कोटींच्या विकास कामाला जागले.शेजारच्या पाटण मतदारसंघात संध्याकाळचे पाच वाजले तरीही निकाल लवकर लागत नव्हता. नेहमी घोड्यावर बसणाऱ्या नेत्यांच्या तालुक्यात प्रशासकीय यंत्रणेनं मात्र खूप वेळ लावला. अधिकाऱ्यांचंही बरोबरच की होऽऽ. थोडीशी जरी चूक झाली तरी लगेच तक्रार करायला दोन्ही गट मोकळे. पत्रकं काढायला नेतेही तयारच. या ठिकाणी शंभूराजनी घेतलेली आघाडी भलतीच धक्कादायक. डोळे विस्फारणारी. पाटणकरांच्या हक्काच्या टापूत त्यांनी मारलेली मुसंडी अत्यंत लक्षणीय. त्यांच्या तथाकथित गुंडगिरीचा अन् विश्वासघातकी राजकारणाचा तालुक्यात उभा केलेला बागुलबुवा अखेर जनतेनंच नष्ट केला!