शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
3
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
4
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
5
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
6
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
7
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
8
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
9
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
10
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
11
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
12
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
13
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
14
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
15
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
16
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
17
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
18
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

...तर कंत्राटदाराला तुरुंगात टाका

By admin | Updated: August 10, 2016 04:37 IST

रस्ता बांधल्यावर किंवा दुरुस्त केल्यावर पुन्हा तिथेच खड्डे पडणार नाहीत, असे हमीपत्र कंत्राटदारांकडून घ्या आणि हमीपत्र देऊनही त्या रस्त्यावर खड्डे पडलेच तर

मुंबई : रस्ता बांधल्यावर किंवा दुरुस्त केल्यावर पुन्हा तिथेच खड्डे पडणार नाहीत, असे हमीपत्र कंत्राटदारांकडून घ्या आणि हमीपत्र देऊनही त्या रस्त्यावर खड्डे पडलेच तर त्या कंत्राटदाराची रवानगी थेट तुरुंगात करा, असा आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिला. न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. न्या. विद्यासागर कानडे यांनी तर याबाबत त्यांना आलेला अनुभव न्यायालयात सांगितला.‘मी दक्षिण मुंबईतून बोरीवलीला एका इन्स्टिट्यूशनमध्ये लेक्चर देण्यासाठी जात होतो. मात्र रस्त्यावर एवढे खड्डे होते की त्यामुळे मला पाठदुखीचा त्रास सुरू झाला. तब्बल एक आठवडा मला पट्टा लावून काम करावे लागले,’ असा मुंबईच्या रस्त्यांचा अनुभव न्या. कानडे यांनी महापालिकेच्या वकिलांना सांगितला.न्या. कानडे यांनी नाराजी व्यक्त करीत म्हटले की, १९६०मध्ये महापालिकेचे कर्मचारी पाणी टाकून रस्ता साफ करीत. मात्र आता रस्त्यांची दुर्दशाच आहे. रस्ते बांधणाऱ्या किंवा दुरुस्त करणाऱ्या कंत्राटदारांकडून पुन्हा त्या रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत, असे हमीपत्र घ्यावे म्हणजे त्या रस्त्यावर खड्डे पडल्यास महापालिका त्यांच्यावर थेट कारवाई करू शकेल. अशा कंत्राटदारांची रवानगी थेट कारागृहात करा, असा आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिला. ‘महापालिका असे करण्यास तयार नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही तसा आदेश देऊ,’ असेही खंडपीठाने म्हटले.मुंबईतील आयएमडीला पावसाचे अचूक वेध दर्शविण्याचे निर्देश द्यावेत, यासाठी व्यवसायाने वकील असलेले अटल दुबे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीत मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा उपस्थित झाला. (प्रतिनिधी)