शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

...तर समृद्धी मार्गाला जमीन नाही - पवार

By admin | Updated: April 3, 2017 06:48 IST

मुंबई ते नागपूर या महामार्गाचा घाट कोणाच्या समृद्धीसाठी घातला जात आहे?

कल्याण : मुंबई ते नागपूर या महामार्गाचा घाट कोणाच्या समृद्धीसाठी घातला जात आहे? आधीच जिल्ह्यात दोन महामार्ग असताना हा महामार्ग कशासाठी? असे सवाल करीत, शेतकऱ्यांना त्याचा पुरेसा मोबदला दिला गेला नाही, तर एक इंचही जागा समृद्धी मार्गासाठी दिली जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारी दिला. यासाठी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन उभारेल, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. कांबा गावात ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यात ते बोलत होते. समृद्धी मार्गात बाधित होत असलेल्या शेतकऱ्यांच्या संघर्ष समितीने पवार यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे पवार यांनी समजून घेतले. या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार आनंद परांजपे, संजीव नाईक, आमदार ज्योती कलानी व अन्य मान्यवर उपस्थित होते.आधी समृद्धी मार्ग तयार केला जाईल. नंतर गावे वसवली जातील. मार्ग तयार करण्यास दहा वर्षे, गावे वसविण्यास दहा वर्षे लागतील. तोवर मोबदल्याच्या अपेक्षेतील शेतकरी खचून ‘वर’ गेलेला असेल. त्यामुळे आधी मोबदला द्या. नंतरच शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पासाठी दिली जाईल, अशी भूमिका पवार यांनी जाहीर केली.शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मुद्दा मांडत आम्ही संघर्ष यात्रा काढली आहे. पण शेतकऱ्यांसाठी तोशिस सोसण्यास सरकार तयार नाही. देशातील राष्ट्रीयीकृत बँकेतून कर्ज घेणाऱ्या कर्जदारांचे दोन वर्षांत जवळपास १२५ लाख कोटींचे कर्ज माफ करण्यास हेच सरकार तयार आहे. पण केंद्रातील भाजपा सरकारला सामान्य माणसाच्या प्रश्नाविषयी जराही कणव, आस्था नसल्याची टीका त्यांनी केली. (प्रतिनिधी)>पीक विम्याचा मुद्दा संसदेत मांडणारभाजपा सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यावर लहान आकाराचे ३५ उद्योगधंदे बंद झाले. त्यामुळे ४० टक्के कामगारांची कामयस्वरूपी नोकरी गेली. त्यांच्या कुटुंबीयांना जबर किंमत मोजावी लागली, असे सांगून शरद पवार म्हणाले, ‘नोटा बदलून देतो’, असे सांगितल्यावर अनेकांनी बँकेत नोटा जमा केल्या. देशातील ३७० जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ४० हजार कोटी जमा आहेत. महाराष्ट्राच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आठ हजार कोटी जमा आहेत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७८ कोटी जमा आहेत. त्याचे व्याज आणि विम्याची रक्कम यांचा भार बँकेवर पडतो आहे. हा पैसा अद्याप बदलून दिलेला नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतूनच शेतकऱ्यांच्या पीक योजनेसाठी कर्जपुरवठा होतो. त्यांच्या व्यवहाराचा रस्ताच नोटाबंदीने उद््ध्वस्त केल्याने शेतकऱ्यांच्या पीककर्ज योजनेलाच सुरुंग लागला आहे. हा मुद्दा मी संसदेत मांडणार आहे, असे त्यांनी सांगितले.>अहवालाच्या निर्णयावर टीका राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा अहवाल तयार करण्याचे काम राज्य सरकारने टाटा इन्स्टिट्यूटला दिले आहे. त्यांचा येथे काय संबंध? शेतकऱ्याच्या आत्महत्येचे कारणच समजून घ्यायचे असेल तर सरकारने गाव-पाड्यावर जाऊन त्या शेतकऱ्याची आई, बहीण, भाऊ, मुलगा, मुलगी, वडील यांच्याकडून हा प्रश्न समजून घ्यायला हवा, असे पवार म्हणाले.विरोधकांची एकजूट हवीलोकशाही दुभंगण्याचे काम भाजपा करीत असल्याने आता विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आवाहन पवार यांनी केले.