शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

...तर जीवावर बेतले असते

By admin | Updated: June 22, 2016 01:55 IST

पारसिक बोगद्याच्या वरील भागात वसलेल्या बेकायदा उदयनगर लगतची संरक्षण भिंत कलल्याचे सकाळी सहा वाजता स्थानिकांच्या निदर्शनास आले.

पंकज रोडेकर/अनिकेत घमंडी/ कुमार बडदे,  ठाणे/मुंब्रापारसिक बोगद्याच्या वरील भागात वसलेल्या बेकायदा उदयनगर लगतची संरक्षण भिंत कलल्याचे सकाळी सहा वाजता स्थानिकांच्या निदर्शनास आले. मात्र मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक अगोदरच गतप्राण झाली असताना या भिंतीच्या दुरुस्तीच्या कामाकरिता जलद मार्गावरील वाहतूक कशी थांबवायची, असा पेच निर्माण झाला. अखेर दुपारी दीड वाजता दुरुस्तीचे काम सुरु झाले. या दरम्यान ही भिंत रेल्वे मार्गावर पडली असती व त्याचवेळी वेगात एखादी लोकल तेथून जात असती तर शेकडो लोकांचे प्राण गेले असते व तेवढेच जखमी झाले असते, अशी धक्कादायक माहिती स्थानिक व अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’च्या निदर्शनास आणली.उदयनगर झोपडपट्टीतील नागरीकांसाठी असलेल्या शौचालयाचे नुतनीकरण सुरु असताना राबिट गोण्यामध्ये भरून ते बोगद्याच्या बाजूला उभारलेल्या संरक्षक भिंतीजवळ ठेवले होते. त्या वजनाने संरक्षक भिंत रेल्वे रु ळाच्या दिशेने कलली. पारसिक बोगद्याच्या दोन्ही बाजूस आणि वरच्या बाजूस वर्षानुवर्षे बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. ही बांधकामे रोखण्याकरिता तसेच दुर्घटना घडू नये याकरिता महापालिकेने ५० फूट उंचीवर १२ फूट रुंद संरक्षक भिंत आठ वर्षांपूर्वी बांधली. त्या भिंतीच्या मध्ये ठिकठिकाणी लोंखडी जाळ््या बसवल्या आहेत. वरील नागरी वस्तीतून सोडण्यात येणारे सांडपाणी सतत या भिंतीकडे येते. अनेकदा बोगद्यातील भिंतीवरून पाणी झिरपत असते. मंगळवारी पहाटे झालेल्या पावसाचे पाणी बोगद्यावरील जमिनीत झिरपल्याने सकाळी सहा वाजता बोगद्यावरील रस्ता खचला. त्यामुळे संरक्षक भिंत रेल्वे रु ळाच्या दिशेने कलल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. महापालिकेच्या ही बाब तत्काळ निर्दशनास आणून दिली गेली. मात्र हे काम करायचे तर त्याकरिता रेल्वे वाहतूक रोखणे गरजेचे होते. त्यातच मंगळवारी सकाळपासून मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक रूळावरून घसरल्याने आणि दिव्यात जनतेच्या भावनांचा उद्रेक झाल्याने दुपारी दीड वाजेपर्यंत जलद मार्गावरील वाहतूक रोखण्याबाबत रेल्वेकडून प्रतिसाद लाभला नाही. त्यानंतर हे काम सुरू झाले. दरम्यानच्या काळात पावसाने विश्रांती घेतली म्हणून बरे. पावसाचा जोर कायम राहिला असता आणि ती कललेली भिंत धावत्या लोकलवर कोसळली असती तर काय याचा विचारच करता येत नाही. दुपारी दीडनंतर विशेष मेगाब्लॉकद्वारे भिंतीचा कललेला भाग काढून टाकला.