शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

...तर जीवावर बेतले असते

By admin | Updated: June 22, 2016 01:55 IST

पारसिक बोगद्याच्या वरील भागात वसलेल्या बेकायदा उदयनगर लगतची संरक्षण भिंत कलल्याचे सकाळी सहा वाजता स्थानिकांच्या निदर्शनास आले.

पंकज रोडेकर/अनिकेत घमंडी/ कुमार बडदे,  ठाणे/मुंब्रापारसिक बोगद्याच्या वरील भागात वसलेल्या बेकायदा उदयनगर लगतची संरक्षण भिंत कलल्याचे सकाळी सहा वाजता स्थानिकांच्या निदर्शनास आले. मात्र मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक अगोदरच गतप्राण झाली असताना या भिंतीच्या दुरुस्तीच्या कामाकरिता जलद मार्गावरील वाहतूक कशी थांबवायची, असा पेच निर्माण झाला. अखेर दुपारी दीड वाजता दुरुस्तीचे काम सुरु झाले. या दरम्यान ही भिंत रेल्वे मार्गावर पडली असती व त्याचवेळी वेगात एखादी लोकल तेथून जात असती तर शेकडो लोकांचे प्राण गेले असते व तेवढेच जखमी झाले असते, अशी धक्कादायक माहिती स्थानिक व अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’च्या निदर्शनास आणली.उदयनगर झोपडपट्टीतील नागरीकांसाठी असलेल्या शौचालयाचे नुतनीकरण सुरु असताना राबिट गोण्यामध्ये भरून ते बोगद्याच्या बाजूला उभारलेल्या संरक्षक भिंतीजवळ ठेवले होते. त्या वजनाने संरक्षक भिंत रेल्वे रु ळाच्या दिशेने कलली. पारसिक बोगद्याच्या दोन्ही बाजूस आणि वरच्या बाजूस वर्षानुवर्षे बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. ही बांधकामे रोखण्याकरिता तसेच दुर्घटना घडू नये याकरिता महापालिकेने ५० फूट उंचीवर १२ फूट रुंद संरक्षक भिंत आठ वर्षांपूर्वी बांधली. त्या भिंतीच्या मध्ये ठिकठिकाणी लोंखडी जाळ््या बसवल्या आहेत. वरील नागरी वस्तीतून सोडण्यात येणारे सांडपाणी सतत या भिंतीकडे येते. अनेकदा बोगद्यातील भिंतीवरून पाणी झिरपत असते. मंगळवारी पहाटे झालेल्या पावसाचे पाणी बोगद्यावरील जमिनीत झिरपल्याने सकाळी सहा वाजता बोगद्यावरील रस्ता खचला. त्यामुळे संरक्षक भिंत रेल्वे रु ळाच्या दिशेने कलल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. महापालिकेच्या ही बाब तत्काळ निर्दशनास आणून दिली गेली. मात्र हे काम करायचे तर त्याकरिता रेल्वे वाहतूक रोखणे गरजेचे होते. त्यातच मंगळवारी सकाळपासून मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक रूळावरून घसरल्याने आणि दिव्यात जनतेच्या भावनांचा उद्रेक झाल्याने दुपारी दीड वाजेपर्यंत जलद मार्गावरील वाहतूक रोखण्याबाबत रेल्वेकडून प्रतिसाद लाभला नाही. त्यानंतर हे काम सुरू झाले. दरम्यानच्या काळात पावसाने विश्रांती घेतली म्हणून बरे. पावसाचा जोर कायम राहिला असता आणि ती कललेली भिंत धावत्या लोकलवर कोसळली असती तर काय याचा विचारच करता येत नाही. दुपारी दीडनंतर विशेष मेगाब्लॉकद्वारे भिंतीचा कललेला भाग काढून टाकला.