शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
4
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
5
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
7
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
8
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
9
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
10
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता
11
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
12
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
13
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
14
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
15
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
16
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
17
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
18
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
19
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
20
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण

...तर मीही ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही - भाई वैद्य

By admin | Updated: March 21, 2016 09:21 IST

भारतीय संविधानात नागरिकत्वाची व्याख्या बदलून जो ‘भारतमाता की जय’ असे म्हणेल तोच भारतीय अशी भूमिका घेतल्यास मी आयुष्यात कधीही ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही

पुणे : भारतीय संविधानात नागरिकत्वाची व्याख्या बदलून जो ‘भारतमाता की जय’ असे म्हणेल तोच भारतीय अशी भूमिका घेतल्यास मी आयुष्यात कधीही ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असल्यापासून ‘भारतमाता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणत आलो आहे. तेव्हा संघातील लोकांना एकदाही या घोषणेची आठवण आली नाही. मात्र, आता केवळ राजकारणासाठी कोणी देशप्रेम दाखवत असेल तर त्याचा मी धिक्कार करतो, असे वक्तव्य ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी रविवारी केले. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या ४६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित समाजप्रबोधन पुरस्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. मंडळाच्या उपाध्यक्षा प्रा. सायरा मुलाणी, नागपूरमधील मुस्लिम महिला मंचाच्या अध्यक्षा रुबिना पटेल, पुरस्कारार्थी सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, डॉ. विश्वंभर चौधरी, मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी व तमन्ना शेख इनामदार व्यासपीठावर होते. ‘राईट टू पी’ ही चळवळ चालविणाऱ्या मुमताज शेख यांना यंदाचा समाजप्रबोधन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संघाच्या विविध घटनांतून मुस्लिम समाजाला वेगळे करायचे असे संघाने ठरविले आहे का हे पाहायला हवे. राज्य संस्था ही धर्मनिरपेक्ष असायला हवी. त्यामुळे मोहन भागवतांना हे संविधान मान्य आहे का, हे तपासून पाहायला हवे, अशी टीकाही भाई वैद्य यांनी केली.संघाने मुलांना फुलपँट देताना महिलांना काय दिले, याचाही विचार व्हायला हवा. महिलांच्या सबलीकरणासाठी संघ काय करतोय, याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे बाबा आढाव म्हणाले. आताचे सरकार हे संस्कृतीकडे जाणारे नसून सनातन संस्कृतीकडे जाणारे आहे. गरजेच्या ठिकाणी सत्याग्रह करणे महत्त्वाचे असून तो करण्याची भूमिका प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले.या वेळी मुस्लिम सत्यशोध पत्रिका विशेषांक, मुस्लिम महिलांच्या समस्या- शोध आणि बोध व समान नागरी कायदा अपेक्षा आणि वास्तव या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. मुस्लिम सत्यशोधक मंडळ कार्यकर्ता मेळावाही रविवारी घेण्यात आला.