शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

...तर मीही ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही - भाई वैद्य

By admin | Updated: March 21, 2016 09:21 IST

भारतीय संविधानात नागरिकत्वाची व्याख्या बदलून जो ‘भारतमाता की जय’ असे म्हणेल तोच भारतीय अशी भूमिका घेतल्यास मी आयुष्यात कधीही ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही

पुणे : भारतीय संविधानात नागरिकत्वाची व्याख्या बदलून जो ‘भारतमाता की जय’ असे म्हणेल तोच भारतीय अशी भूमिका घेतल्यास मी आयुष्यात कधीही ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असल्यापासून ‘भारतमाता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणत आलो आहे. तेव्हा संघातील लोकांना एकदाही या घोषणेची आठवण आली नाही. मात्र, आता केवळ राजकारणासाठी कोणी देशप्रेम दाखवत असेल तर त्याचा मी धिक्कार करतो, असे वक्तव्य ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी रविवारी केले. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या ४६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित समाजप्रबोधन पुरस्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. मंडळाच्या उपाध्यक्षा प्रा. सायरा मुलाणी, नागपूरमधील मुस्लिम महिला मंचाच्या अध्यक्षा रुबिना पटेल, पुरस्कारार्थी सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, डॉ. विश्वंभर चौधरी, मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी व तमन्ना शेख इनामदार व्यासपीठावर होते. ‘राईट टू पी’ ही चळवळ चालविणाऱ्या मुमताज शेख यांना यंदाचा समाजप्रबोधन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संघाच्या विविध घटनांतून मुस्लिम समाजाला वेगळे करायचे असे संघाने ठरविले आहे का हे पाहायला हवे. राज्य संस्था ही धर्मनिरपेक्ष असायला हवी. त्यामुळे मोहन भागवतांना हे संविधान मान्य आहे का, हे तपासून पाहायला हवे, अशी टीकाही भाई वैद्य यांनी केली.संघाने मुलांना फुलपँट देताना महिलांना काय दिले, याचाही विचार व्हायला हवा. महिलांच्या सबलीकरणासाठी संघ काय करतोय, याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे बाबा आढाव म्हणाले. आताचे सरकार हे संस्कृतीकडे जाणारे नसून सनातन संस्कृतीकडे जाणारे आहे. गरजेच्या ठिकाणी सत्याग्रह करणे महत्त्वाचे असून तो करण्याची भूमिका प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले.या वेळी मुस्लिम सत्यशोध पत्रिका विशेषांक, मुस्लिम महिलांच्या समस्या- शोध आणि बोध व समान नागरी कायदा अपेक्षा आणि वास्तव या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. मुस्लिम सत्यशोधक मंडळ कार्यकर्ता मेळावाही रविवारी घेण्यात आला.