शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

...तर मीही ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही - भाई वैद्य

By admin | Updated: March 21, 2016 09:21 IST

भारतीय संविधानात नागरिकत्वाची व्याख्या बदलून जो ‘भारतमाता की जय’ असे म्हणेल तोच भारतीय अशी भूमिका घेतल्यास मी आयुष्यात कधीही ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही

पुणे : भारतीय संविधानात नागरिकत्वाची व्याख्या बदलून जो ‘भारतमाता की जय’ असे म्हणेल तोच भारतीय अशी भूमिका घेतल्यास मी आयुष्यात कधीही ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असल्यापासून ‘भारतमाता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणत आलो आहे. तेव्हा संघातील लोकांना एकदाही या घोषणेची आठवण आली नाही. मात्र, आता केवळ राजकारणासाठी कोणी देशप्रेम दाखवत असेल तर त्याचा मी धिक्कार करतो, असे वक्तव्य ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी रविवारी केले. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या ४६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित समाजप्रबोधन पुरस्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. मंडळाच्या उपाध्यक्षा प्रा. सायरा मुलाणी, नागपूरमधील मुस्लिम महिला मंचाच्या अध्यक्षा रुबिना पटेल, पुरस्कारार्थी सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, डॉ. विश्वंभर चौधरी, मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी व तमन्ना शेख इनामदार व्यासपीठावर होते. ‘राईट टू पी’ ही चळवळ चालविणाऱ्या मुमताज शेख यांना यंदाचा समाजप्रबोधन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संघाच्या विविध घटनांतून मुस्लिम समाजाला वेगळे करायचे असे संघाने ठरविले आहे का हे पाहायला हवे. राज्य संस्था ही धर्मनिरपेक्ष असायला हवी. त्यामुळे मोहन भागवतांना हे संविधान मान्य आहे का, हे तपासून पाहायला हवे, अशी टीकाही भाई वैद्य यांनी केली.संघाने मुलांना फुलपँट देताना महिलांना काय दिले, याचाही विचार व्हायला हवा. महिलांच्या सबलीकरणासाठी संघ काय करतोय, याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे बाबा आढाव म्हणाले. आताचे सरकार हे संस्कृतीकडे जाणारे नसून सनातन संस्कृतीकडे जाणारे आहे. गरजेच्या ठिकाणी सत्याग्रह करणे महत्त्वाचे असून तो करण्याची भूमिका प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असेही ते म्हणाले.या वेळी मुस्लिम सत्यशोध पत्रिका विशेषांक, मुस्लिम महिलांच्या समस्या- शोध आणि बोध व समान नागरी कायदा अपेक्षा आणि वास्तव या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. मुस्लिम सत्यशोधक मंडळ कार्यकर्ता मेळावाही रविवारी घेण्यात आला.