शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

...तर भारताचा इतिहास वेगळा असता

By admin | Updated: May 23, 2016 02:09 IST

पं. दीनदयाळ संघाचे प्रचारक म्हणून काम करत असताना जनसंघाच्या स्थापनेची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांचा खून झाला नसता तर ते आणखी २५ वर्षे कार्यरत राहिले असते़

पुणे : पं. दीनदयाळ संघाचे प्रचारक म्हणून काम करत असताना जनसंघाच्या स्थापनेची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांचा खून झाला नसता तर ते आणखी २५ वर्षे कार्यरत राहिले असते़ त्यातून भारताचा इतिहास वेगळा राहिला असता, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी व्यक्त केले़पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारतीय विचार साधना प्रकाशन आणि नागपूर येथील विवस्वान प्रकाशनातर्फे डॉ. कुमार शास्त्री यांनी लिहिलेल्या ‘कारुण्यऋषी पं. दीनदयाल उपाध्याय’ या पुस्तकाचे प्रकाशन भांडारी यांच्या हस्ते रविवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. सुयश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मोहन घैसास, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, किशोर शशितल आदी उपस्थित होते.भांडारी म्हणाले, ‘शोषित वंचितांची भाषा करणाऱ्यांनाच हा वर्र्ग हवा असतो. शोषित वर्गाचा उद्धार व्हावा, असे त्यांना कधीच वाटत नाही. कारण या वर्गावरच त्यांचे राजकारण सुरू असते. त्यामुळेच मोदी सरकारने जन-धन योजना राबवून समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय द्यायचा प्रयत्न केला. दोन वर्षांत या वर्गातील ३२ कोटी नागरिकांनी शून्य रुपये असलेले खाते काढले. या खात्यांवर आता ६५ हजार कोटींच्या ठेवी आहेत. याचाच अर्थ पंडितजींनी सांगितलेल्या मार्गाने मोदी सरकार काम करत आहे.’ ६० - ६५ वर्षे देशात समाजवादी विचारांची अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अर्र्थव्यवस्थेमुळे १२५ कोटींच्या देशात आजही २६ टक्के नागरिक दारिद्र्यरेषेखाली आहेत. साम्यवादी आणि समाजवादी अर्थव्यवस्था आर्थिक दरी निर्माण करत आहे. पंडितजींनी त्यांच्या काळात साम्यवादी, समाजवादी आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था असताना आपला स्वत:चा वेगळा विचार मांडला होता. लोककल्याणकारी योजनांच्या नावाखाली अनुदाने आणि योजना देऊन दारिद्र्य निर्मूलन होत नसल्याचे पंडितजींचे मत होते. भारतीय जनता पक्षाला ज्या ज्या वेळी संधी मिळाली, त्या वेळी पक्षाने पंडितजींचे विचार व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)