शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

...तर भारताचा इतिहास वेगळा असता

By admin | Updated: May 23, 2016 02:09 IST

पं. दीनदयाळ संघाचे प्रचारक म्हणून काम करत असताना जनसंघाच्या स्थापनेची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांचा खून झाला नसता तर ते आणखी २५ वर्षे कार्यरत राहिले असते़

पुणे : पं. दीनदयाळ संघाचे प्रचारक म्हणून काम करत असताना जनसंघाच्या स्थापनेची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांचा खून झाला नसता तर ते आणखी २५ वर्षे कार्यरत राहिले असते़ त्यातून भारताचा इतिहास वेगळा राहिला असता, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी व्यक्त केले़पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारतीय विचार साधना प्रकाशन आणि नागपूर येथील विवस्वान प्रकाशनातर्फे डॉ. कुमार शास्त्री यांनी लिहिलेल्या ‘कारुण्यऋषी पं. दीनदयाल उपाध्याय’ या पुस्तकाचे प्रकाशन भांडारी यांच्या हस्ते रविवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. सुयश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मोहन घैसास, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, किशोर शशितल आदी उपस्थित होते.भांडारी म्हणाले, ‘शोषित वंचितांची भाषा करणाऱ्यांनाच हा वर्र्ग हवा असतो. शोषित वर्गाचा उद्धार व्हावा, असे त्यांना कधीच वाटत नाही. कारण या वर्गावरच त्यांचे राजकारण सुरू असते. त्यामुळेच मोदी सरकारने जन-धन योजना राबवून समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय द्यायचा प्रयत्न केला. दोन वर्षांत या वर्गातील ३२ कोटी नागरिकांनी शून्य रुपये असलेले खाते काढले. या खात्यांवर आता ६५ हजार कोटींच्या ठेवी आहेत. याचाच अर्थ पंडितजींनी सांगितलेल्या मार्गाने मोदी सरकार काम करत आहे.’ ६० - ६५ वर्षे देशात समाजवादी विचारांची अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अर्र्थव्यवस्थेमुळे १२५ कोटींच्या देशात आजही २६ टक्के नागरिक दारिद्र्यरेषेखाली आहेत. साम्यवादी आणि समाजवादी अर्थव्यवस्था आर्थिक दरी निर्माण करत आहे. पंडितजींनी त्यांच्या काळात साम्यवादी, समाजवादी आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था असताना आपला स्वत:चा वेगळा विचार मांडला होता. लोककल्याणकारी योजनांच्या नावाखाली अनुदाने आणि योजना देऊन दारिद्र्य निर्मूलन होत नसल्याचे पंडितजींचे मत होते. भारतीय जनता पक्षाला ज्या ज्या वेळी संधी मिळाली, त्या वेळी पक्षाने पंडितजींचे विचार व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)