शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

...तर भारताचा इतिहास वेगळा असता

By admin | Updated: May 23, 2016 02:09 IST

पं. दीनदयाळ संघाचे प्रचारक म्हणून काम करत असताना जनसंघाच्या स्थापनेची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांचा खून झाला नसता तर ते आणखी २५ वर्षे कार्यरत राहिले असते़

पुणे : पं. दीनदयाळ संघाचे प्रचारक म्हणून काम करत असताना जनसंघाच्या स्थापनेची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांचा खून झाला नसता तर ते आणखी २५ वर्षे कार्यरत राहिले असते़ त्यातून भारताचा इतिहास वेगळा राहिला असता, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी व्यक्त केले़पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारतीय विचार साधना प्रकाशन आणि नागपूर येथील विवस्वान प्रकाशनातर्फे डॉ. कुमार शास्त्री यांनी लिहिलेल्या ‘कारुण्यऋषी पं. दीनदयाल उपाध्याय’ या पुस्तकाचे प्रकाशन भांडारी यांच्या हस्ते रविवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते. सुयश चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मोहन घैसास, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, किशोर शशितल आदी उपस्थित होते.भांडारी म्हणाले, ‘शोषित वंचितांची भाषा करणाऱ्यांनाच हा वर्र्ग हवा असतो. शोषित वर्गाचा उद्धार व्हावा, असे त्यांना कधीच वाटत नाही. कारण या वर्गावरच त्यांचे राजकारण सुरू असते. त्यामुळेच मोदी सरकारने जन-धन योजना राबवून समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय द्यायचा प्रयत्न केला. दोन वर्षांत या वर्गातील ३२ कोटी नागरिकांनी शून्य रुपये असलेले खाते काढले. या खात्यांवर आता ६५ हजार कोटींच्या ठेवी आहेत. याचाच अर्थ पंडितजींनी सांगितलेल्या मार्गाने मोदी सरकार काम करत आहे.’ ६० - ६५ वर्षे देशात समाजवादी विचारांची अर्थव्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अर्र्थव्यवस्थेमुळे १२५ कोटींच्या देशात आजही २६ टक्के नागरिक दारिद्र्यरेषेखाली आहेत. साम्यवादी आणि समाजवादी अर्थव्यवस्था आर्थिक दरी निर्माण करत आहे. पंडितजींनी त्यांच्या काळात साम्यवादी, समाजवादी आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था असताना आपला स्वत:चा वेगळा विचार मांडला होता. लोककल्याणकारी योजनांच्या नावाखाली अनुदाने आणि योजना देऊन दारिद्र्य निर्मूलन होत नसल्याचे पंडितजींचे मत होते. भारतीय जनता पक्षाला ज्या ज्या वेळी संधी मिळाली, त्या वेळी पक्षाने पंडितजींचे विचार व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)