शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

..तर सरकारला ग्रहण लावणार

By admin | Updated: March 10, 2016 00:48 IST

गेल्या ५० वर्षांपासून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. मागासलेल्या समाजाला ‘एसटी’मध्ये समावेश करून सवलती द्याव्यात, अशी शिफारस कालेलकर समितीने

जेजुरी : गेल्या ५० वर्षांपासून धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. मागासलेल्या समाजाला ‘एसटी’मध्ये (अनुसूचित जमाती) समावेश करून सवलती द्याव्यात, अशी शिफारस कालेलकर समितीने केंद्र सरकारला केली होती. मात्र, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार आरक्षणाबाबत वेळकाढूपणा करीत आहे. चालू अधिवेशनात आरक्षणाबाबत ठोस निर्णय न झाल्यास राज्यातील अवघा धनगर समाज एकवटून आंदोलनाद्वारे सरकारला ग्रहण लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीचे नेते आमदार प्रकाश शेंडगे यांनी जेजुरी येथे दिला आहे.धनगर समाजाला अनुसूचित जातींच्या आरक्षणातील सवलती मिळाव्यात, या मागणीसाठी आजपासून जेजुरी ते मुंबई, असे मोटरसायकल रॅलीचे आयोजन आरक्षण कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जेजुरीगडावर खंडेरायाचा विधिवत पूजा-अभिषेक करूनत बेलभंडाऱ्याची उधळण करीत रॅलीला प्रारंभ करण्यात आला. या वेळी आरक्षण कृती समितीचे नेते पांडुरंग मिरगर, नाना देवकाते, भीमदेव बुरुंगुले, कल्याणी वाघमोडे, माणिकराव सोलनकर, आबा मुरारी, राधाकृष्ण पाटील, बबन मदने, रमेश लेंडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेंडगे म्हणाले, धनगर समाजबांधवांचे आराध्यदैवत खंडेराया असल्याने देवाचे आशीर्वाद घेऊन बेलभंडारा उधळून रॅलीची सुरुवात केली आहे. खोपोली येथील शिंगरोबा यांचे दर्शन घेऊन गुरुवारी (दि. १०) आझाद मैदान मुंबई येथे हजारो बांधवांच्या उपस्थितीत आरक्षण मागणीसाठी बेलभंडारा उधळणार आहोत. २०१४च्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती येथे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सरकार स्थापन होऊ द्या; पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत आरक्षण देऊ, असे आश्वासन दिले होते. ४ जानेवारी २०१५ रोजी नागपूर येथे झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समाजाला ‘अच्छे दिन’चे प्रलोभन दाखविले होते.