शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

...मग शाळेत जा!

By admin | Updated: June 3, 2017 03:40 IST

शेतकरी संपावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. कर्जमाफी, आरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी संपावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. कर्जमाफी, आरक्षण वगैरे प्रत्येक मुद्द्यावर अभ्यास करू, या सरकारी आश्वासनाचाही त्यांनी समाचार घेतला. प्रत्येक विषयावर फक्त अभ्यास करायचा असेल तर त्यांनी शाळेत जायला पाहिजे, सरकार चालवू नये, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. भाजपावर हल्लाबोल करताना ते म्हणाले, शेतकरी कर्जमाफी, बाळासाहेबांचे स्मारक अशी वाट्टेल ती आश्वासने देऊन भाजपा सत्तेवर आली. पण राज्याच्या तिजोरीत पैसेच नसताना ही आश्वासने पूर्ण कशी करणार, असा सवाल करतानाच भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. जुन्या घोषणांना नवीन नाव देण्यासाठी भाजपाकडे एक समिती असल्याची टीकाही त्यांनी केली.शेतकरी संपाला तुमचा पाठिंबा आहे का? असे विचारले असतामाझा पाठिंबा शेतकऱ्यांच्या भावनांना आहे, असे सांगून ते म्हणाले,राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे निघाले, पण पुढे काय झाले? संप आणि बंद करून काय हाती पडणार हे महत्त्वाचे आहे. जे गिरणी कामगारांचे झाले ते शेतकऱ्यांचे व्हायला नको. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे असून, तोपर्यंत त्यांच्या मनातील राग कायम राहणे गरजेचे आहे.शिवसेनेवरही  साधला निशाणाराज्य सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या राज यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. शिवसेना सत्तेत फक्त अंडी उबवत बसली असून, त्यांना भूमिकाच घेता येत नाही. त्यांचे मंत्री खुर्ची सांभाळण्यात व्यस्त आहेत, असे ते म्हणाले.