शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

...मग शाळेत जा!

By admin | Updated: June 3, 2017 03:40 IST

शेतकरी संपावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. कर्जमाफी, आरक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकरी संपावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. कर्जमाफी, आरक्षण वगैरे प्रत्येक मुद्द्यावर अभ्यास करू, या सरकारी आश्वासनाचाही त्यांनी समाचार घेतला. प्रत्येक विषयावर फक्त अभ्यास करायचा असेल तर त्यांनी शाळेत जायला पाहिजे, सरकार चालवू नये, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. भाजपावर हल्लाबोल करताना ते म्हणाले, शेतकरी कर्जमाफी, बाळासाहेबांचे स्मारक अशी वाट्टेल ती आश्वासने देऊन भाजपा सत्तेवर आली. पण राज्याच्या तिजोरीत पैसेच नसताना ही आश्वासने पूर्ण कशी करणार, असा सवाल करतानाच भाजपाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. जुन्या घोषणांना नवीन नाव देण्यासाठी भाजपाकडे एक समिती असल्याची टीकाही त्यांनी केली.शेतकरी संपाला तुमचा पाठिंबा आहे का? असे विचारले असतामाझा पाठिंबा शेतकऱ्यांच्या भावनांना आहे, असे सांगून ते म्हणाले,राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे निघाले, पण पुढे काय झाले? संप आणि बंद करून काय हाती पडणार हे महत्त्वाचे आहे. जे गिरणी कामगारांचे झाले ते शेतकऱ्यांचे व्हायला नको. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे असून, तोपर्यंत त्यांच्या मनातील राग कायम राहणे गरजेचे आहे.शिवसेनेवरही  साधला निशाणाराज्य सरकारवर टीकेची झोड उठवणाऱ्या राज यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. शिवसेना सत्तेत फक्त अंडी उबवत बसली असून, त्यांना भूमिकाच घेता येत नाही. त्यांचे मंत्री खुर्ची सांभाळण्यात व्यस्त आहेत, असे ते म्हणाले.