शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

...तर आर्थिक संकट अटळ

By admin | Updated: November 2, 2016 01:20 IST

गुंतवणूक वाढल्यानंतर अर्थव्यवस्था ‘पिकअप’ घेते. हा अनुकूल निर्णय झाल्यास अर्थव्यवस्था चांगल्या दिशेने जाईल.

बारामती : गुंतवणूक वाढल्यानंतर अर्थव्यवस्था ‘पिकअप’ घेते. हा अनुकूल निर्णय झाल्यास अर्थव्यवस्था चांगल्या दिशेने जाईल. मात्र, तसे न करता केवळ कठोर नियम करण्याचे सूत्र स्वीकारल्यास मोठे आर्थिक संकट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असे भाकीत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. दि बारामती मर्चंट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात दिवाळी पाडव्यानिमित्त व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, की पंतप्रधानांनी दोन वर्षांत अर्थव्यवस्था शिस्तीच्या चौकटीत आणणार असल्याचे सांगितले आहे. सध्या दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. पुढील काळात गुंतवणूक वाढविणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. येत्या सहा महिन्यांत अमेरिकेबरोबरच सरकारच्या धोरणाचे परिणाम दिसतील. ऊस उत्पादक, व्यापारी, कारखाना या तिघांना ही धोरणे घातक आहेत, असे पवार यांनी सांगितले. दि बारामती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल वाडीकर यांनी प्रास्तविक केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, नगराध्यक्ष योगेश जगताप, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर करंदीकर, बारामती अ‍ॅग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर कदम, पोपटराव तुपे, सदाशिव सातव, सचिन सातव, सुभाष ढोले, इम्तियाज शिकीलकर, किशोर शहा, जवाहर वाघोलीकर, अरविंद जगताप, जयकुमार वडुजकर, वैभव शिंदे, विशाल वडुजकर, प्रमोद खटावकर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)>यंदा चांगल्या पावसामुळे उसाच्या लागवडीत वाढ होईल. त्यामुळे पुढील वर्षी ऊस गळीताचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. साखरेबाबत केंद्र शासनाचे निर्णय अयोग्य आहेत. साखर निर्यातीवर २० टक्के कर बसविला. साठा न करता साखर विक्री केलीच पाहिजे. विक्री न केल्यास कारवाई केली जाणार आहे. साखरेच्या साठ्यावर अधिक मर्यादा आणा, लवकर साखर विका, त्यातुन किंमत कशी देणार, हा माझ्यासारख्याला पडलेला प्रश्न आहे.