शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

...तर आर्थिक संकट अटळ

By admin | Updated: November 2, 2016 01:20 IST

गुंतवणूक वाढल्यानंतर अर्थव्यवस्था ‘पिकअप’ घेते. हा अनुकूल निर्णय झाल्यास अर्थव्यवस्था चांगल्या दिशेने जाईल.

बारामती : गुंतवणूक वाढल्यानंतर अर्थव्यवस्था ‘पिकअप’ घेते. हा अनुकूल निर्णय झाल्यास अर्थव्यवस्था चांगल्या दिशेने जाईल. मात्र, तसे न करता केवळ कठोर नियम करण्याचे सूत्र स्वीकारल्यास मोठे आर्थिक संकट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असे भाकीत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. दि बारामती मर्चंट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात दिवाळी पाडव्यानिमित्त व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ते म्हणाले, की पंतप्रधानांनी दोन वर्षांत अर्थव्यवस्था शिस्तीच्या चौकटीत आणणार असल्याचे सांगितले आहे. सध्या दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. पुढील काळात गुंतवणूक वाढविणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. येत्या सहा महिन्यांत अमेरिकेबरोबरच सरकारच्या धोरणाचे परिणाम दिसतील. ऊस उत्पादक, व्यापारी, कारखाना या तिघांना ही धोरणे घातक आहेत, असे पवार यांनी सांगितले. दि बारामती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल वाडीकर यांनी प्रास्तविक केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, नगराध्यक्ष योगेश जगताप, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर करंदीकर, बारामती अ‍ॅग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर कदम, पोपटराव तुपे, सदाशिव सातव, सचिन सातव, सुभाष ढोले, इम्तियाज शिकीलकर, किशोर शहा, जवाहर वाघोलीकर, अरविंद जगताप, जयकुमार वडुजकर, वैभव शिंदे, विशाल वडुजकर, प्रमोद खटावकर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)>यंदा चांगल्या पावसामुळे उसाच्या लागवडीत वाढ होईल. त्यामुळे पुढील वर्षी ऊस गळीताचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. साखरेबाबत केंद्र शासनाचे निर्णय अयोग्य आहेत. साखर निर्यातीवर २० टक्के कर बसविला. साठा न करता साखर विक्री केलीच पाहिजे. विक्री न केल्यास कारवाई केली जाणार आहे. साखरेच्या साठ्यावर अधिक मर्यादा आणा, लवकर साखर विका, त्यातुन किंमत कशी देणार, हा माझ्यासारख्याला पडलेला प्रश्न आहे.