शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

...तेव्हा डॉक्टरनेच घ्यावे ‘सेकण्ड ओपिनियन’

By admin | Updated: July 20, 2016 02:23 IST

डॉक्टरकडे गेल्यावर रुग्णाच्या तपासण्या झाल्यावर औषधोपचार सुरु केले जातात.

मुंबई : डॉक्टरकडे गेल्यावर रुग्णाच्या तपासण्या झाल्यावर औषधोपचार सुरु केले जातात. पण, काहीवेळा आजाराचे योग्य निदान झालेले नसते. त्यामुळे औषधे घेऊनही आजार बरा होत नाही. अशावेळी डॉक्टरच्याही लक्षात येते आजाराचे निदान होत नाही. अशावेळी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना अंधारात न ठेवता, डॉक्टरांनी स्वत: त्यांना योग्य वाटणाऱ्या डॉक्टरकडून सेकण्ड ओपिनियन घ्यावे, असा सूर ‘सर्वप्रथम अपाय नको’ या चर्चासत्रात उमटला.परळच्या केईएम रुग्णालयातील ‘बायोएथिक्स युनिट’तर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वंध्यत्व डॉ. अनिरुद्ध मालपानी लिखित ‘पेशंट सेफ्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. अविनाश सुपे उपस्थित होते. यानंतर ‘सर्वप्रथम अपाय नको’ याविषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात डॉ. फारूख उदवाडिया, डॉ.सुनिल पांड्ये, डॉ. यशवंत आमडेकर आणि डॉ. उर्मिला थत्ते सहभागी झाले असून डॉ. मालपानी यांनी सत्रसंचालकाची भूमिका बजावली. या चर्चासत्रात डॉक्टर आणि रुग्ण यांचे नातेसंबंध, डॉक्टरांचे प्रश्न, डॉक्टरांच्या जबाबदाऱ्या अशा विषयांवर चर्चा करण्यात आली. रुग्ण बरा होणे, त्याला उत्तम उपचार मिळणे हे महत्त्वाचे असते. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांचा विचार करुनच उपचारपद्धती निवडली पाहिजे. एकाच रुग्णाला तीन ते चार अथवा अधिक डॉक्टर तपासत असतील तर या सर्वांमध्ये संवाद पाहिजे. त्या रुग्णाला दिलेली औषधे कागदावर लिहणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. कोणतीही चूक झाली, काही अंदाज चुकले तर त्यासाठी मी स्वत: जवाबदार आहे, असे प्रत्येक डॉक्टरला वाटले पाहिजे. माझ्याकडून चूक झाली तर पुढच्यावेळी तो रुग्ण माझ्याकडे येणार नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे असे मत डॉ. आमडेकर यांनी सांगितले. डॉ. थत्ते यांनी डॉक्टरांनी ‘मेडिकल एरर’ रिपोर्ट केले पाहिजेत असे सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात संशोधन पब्लिश देखील झाले पाहिजे. त्यामुळे अन्य डॉक्टरांना शिकता येईल. डॉक्टरांनी रुग्णांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली पाहिजे. त्यामुळे रुग्णाचा डॉक्टरांवर विश्वास बसतो. त्यामुळे रुग्णासाठी उपचार सुकर होतात असे डॉ. मालपानी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>डॉक्टर रुग्णांमुळे आहेत-पांड्ये आपण रुग्णांमुळे आहोत हे सर्व डॉक्टरांनी लक्षात ठेवले पाहिजे. रुग्णांच्या हिताचा विचार सर्वप्रथम व्हायला पाहिजे. अनेक प्रश्न, समस्या आहेत. पण, त्या समस्यांचे पूर्णपणे निराकरण करणे शक्य नसले तरीही त्यातून मार्ग काढला पाहिजे. रुग्णांना याचा कमीत कमी त्रास कसा होईल, याचा विचार केला पाहिजे. >तीन ‘सी’ महत्त्वाचे - उदवाडियाकेअर, कम्पॅशन आणि कम्युनिकेशन हे तीन ‘सी’ डॉक्टरसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे उदवाडिया यांनी सांगितले. आजार एकच असला तरीही रुग्णानुसार बदलतो. हे डॉक्टरने लक्षात ठेवले पाहिजे. आजार ओळखून उपचार केले पाहिजेत. प्रत्येक डॉक्टरने स्वत:च कोणते उपचार केले, औषधे का दिली हे लिहून ठेवणे आवश्यक आहे.