शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

...तेव्हा डॉक्टरनेच घ्यावे ‘सेकण्ड ओपिनियन’

By admin | Updated: July 20, 2016 02:23 IST

डॉक्टरकडे गेल्यावर रुग्णाच्या तपासण्या झाल्यावर औषधोपचार सुरु केले जातात.

मुंबई : डॉक्टरकडे गेल्यावर रुग्णाच्या तपासण्या झाल्यावर औषधोपचार सुरु केले जातात. पण, काहीवेळा आजाराचे योग्य निदान झालेले नसते. त्यामुळे औषधे घेऊनही आजार बरा होत नाही. अशावेळी डॉक्टरच्याही लक्षात येते आजाराचे निदान होत नाही. अशावेळी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना अंधारात न ठेवता, डॉक्टरांनी स्वत: त्यांना योग्य वाटणाऱ्या डॉक्टरकडून सेकण्ड ओपिनियन घ्यावे, असा सूर ‘सर्वप्रथम अपाय नको’ या चर्चासत्रात उमटला.परळच्या केईएम रुग्णालयातील ‘बायोएथिक्स युनिट’तर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वंध्यत्व डॉ. अनिरुद्ध मालपानी लिखित ‘पेशंट सेफ्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. अविनाश सुपे उपस्थित होते. यानंतर ‘सर्वप्रथम अपाय नको’ याविषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात डॉ. फारूख उदवाडिया, डॉ.सुनिल पांड्ये, डॉ. यशवंत आमडेकर आणि डॉ. उर्मिला थत्ते सहभागी झाले असून डॉ. मालपानी यांनी सत्रसंचालकाची भूमिका बजावली. या चर्चासत्रात डॉक्टर आणि रुग्ण यांचे नातेसंबंध, डॉक्टरांचे प्रश्न, डॉक्टरांच्या जबाबदाऱ्या अशा विषयांवर चर्चा करण्यात आली. रुग्ण बरा होणे, त्याला उत्तम उपचार मिळणे हे महत्त्वाचे असते. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांचा विचार करुनच उपचारपद्धती निवडली पाहिजे. एकाच रुग्णाला तीन ते चार अथवा अधिक डॉक्टर तपासत असतील तर या सर्वांमध्ये संवाद पाहिजे. त्या रुग्णाला दिलेली औषधे कागदावर लिहणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. कोणतीही चूक झाली, काही अंदाज चुकले तर त्यासाठी मी स्वत: जवाबदार आहे, असे प्रत्येक डॉक्टरला वाटले पाहिजे. माझ्याकडून चूक झाली तर पुढच्यावेळी तो रुग्ण माझ्याकडे येणार नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे असे मत डॉ. आमडेकर यांनी सांगितले. डॉ. थत्ते यांनी डॉक्टरांनी ‘मेडिकल एरर’ रिपोर्ट केले पाहिजेत असे सांगितले. वैद्यकीय क्षेत्रात संशोधन पब्लिश देखील झाले पाहिजे. त्यामुळे अन्य डॉक्टरांना शिकता येईल. डॉक्टरांनी रुग्णांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली पाहिजे. त्यामुळे रुग्णाचा डॉक्टरांवर विश्वास बसतो. त्यामुळे रुग्णासाठी उपचार सुकर होतात असे डॉ. मालपानी यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)>डॉक्टर रुग्णांमुळे आहेत-पांड्ये आपण रुग्णांमुळे आहोत हे सर्व डॉक्टरांनी लक्षात ठेवले पाहिजे. रुग्णांच्या हिताचा विचार सर्वप्रथम व्हायला पाहिजे. अनेक प्रश्न, समस्या आहेत. पण, त्या समस्यांचे पूर्णपणे निराकरण करणे शक्य नसले तरीही त्यातून मार्ग काढला पाहिजे. रुग्णांना याचा कमीत कमी त्रास कसा होईल, याचा विचार केला पाहिजे. >तीन ‘सी’ महत्त्वाचे - उदवाडियाकेअर, कम्पॅशन आणि कम्युनिकेशन हे तीन ‘सी’ डॉक्टरसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे उदवाडिया यांनी सांगितले. आजार एकच असला तरीही रुग्णानुसार बदलतो. हे डॉक्टरने लक्षात ठेवले पाहिजे. आजार ओळखून उपचार केले पाहिजेत. प्रत्येक डॉक्टरने स्वत:च कोणते उपचार केले, औषधे का दिली हे लिहून ठेवणे आवश्यक आहे.