शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

...तर भूसंपादन विधेयकावर चर्चा करा

By admin | Updated: April 13, 2015 04:56 IST

भूसंपादन विधेयकाच्या मुद्द्यावर आमची बाजू बरोबर आहे आणि आंदोलनकर्ते चुकीचे आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असेल तर त्यांनी या

पुणे : भूसंपादन विधेयकाच्या मुद्द्यावर आमची बाजू बरोबर आहे आणि आंदोलनकर्ते चुकीचे आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत असेल तर त्यांनी या विधेयकाबाबत आमच्यासोबत जाहीरपणे चर्चा करावी आणि हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे कसे ते पटवून द्यावे, असे आव्हान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी पुण्यात दिले. भूमी अधिग्रहण विधेयक आणि त्या विरोधातील आंदोलनाची पुढील दिशा, यावर चर्चा करण्यासाठी अण्णांच्या नेतृत्वाखाली विविध राज्यांतील शेतकरी संघटनांच्या नेत्यांची बैठक गांधी भवनात घेण्यात आली. बैठकीनंतर ते बोलत होते. भूसंपादन विधेयकाबाबत सरकार बरोबर आणि आंदोलनकर्ते चुकीचे, असे पंतप्रधान मोदी म्हणत असतील तर त्यांनी या विधेयकावर जाहीर चर्चा करावी़ प्रसारमाध्यमांद्वारे ही चर्चा सामान्य जनतेपर्यंत पोचायला हवी, म्हणजे दोघांचीही बाजू त्यांना कळेल आणि भूसंपादन विधेयक नेमके कोणाच्या हिताचे आहे, ते जनतेच्या लक्षात येईल.राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केलेल्या या विधेयकाच्या अध्यादेशात केवळ शब्दांची फेरफार केली गेली, असा आरोप अण्णांनी केला. भूसंपादन विधेयकाविरोधात देशपातळीवर आंदोलन करणार असल्याचेही अण्णांनी या वेळी जाहीर केले. सरकारच्या आगामी अधिवेशनाच्या आसपास हे आंदोलन होणार आहे. नवी दिल्लीत अण्णा आंदोलन करतील, याच वेळी प्रत्येक जिल्ह्यात, गावपातळीवरही आंदोलन करण्यात येईल. याच्या नियोजनावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत बैठक होणार आहे. बैठकीला सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, विनायक पाटील, विक्रांत पाटील, कमांडर नीती यांच्यासह १५ राज्यांतील शेतकरी संघटनांचे ६३ नेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)