शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

...तर अधिकाऱ्यांवर थेट कारवाई

By admin | Updated: July 16, 2017 00:44 IST

नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यासाठी राज्य शासनाने सेवा हक्क कायदा केला आहे. तरी नागरिकांना वेळेत सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. अशा कामात दिरंगाई

- लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागरिकांना वेळेत सेवा मिळण्यासाठी राज्य शासनाने सेवा हक्क कायदा केला आहे. तरी नागरिकांना वेळेत सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. अशा कामात दिरंगाई होत असेल तर नागरिकांनी तक्रार करावी. तथापि, कुणी तक्रार केली नाही, तरी आयोग अशा प्रकरणात स्वत:हून पुढाकार घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करू शकते, असा इशारा राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी दिला.विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी सेवा हक्क कायद्याबाबत विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले की, सेवा हक्क कायदा हा ५० सेवांपासून सुरू झाला. आता तब्बल ४०७ सेवा या अंतर्गत येतात. असे असले तरी या कायद्याबाबत अजूनही लोकांमध्ये जनजागृती नाही. ती करण्याची गरज आहे.तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूमध्ये विविध प्रमाणपत्रासाठी ठरावीक कालावधी निश्चित करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी योग्य व्हावी, यासाठी डॅशबोर्ड असावा, अशा अधिकाऱ्यांच्या सूचना आल्या आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील. तसेच एखादा अर्जाची नेमकी स्थिती काय आहे. याबाबत प्रत्येक संबंधितांना अलर्ट केले जाईल. जेणेकरून ते अर्ज तातडीने निकाली निघेल. याची माहिती संबधित अधिकाऱ्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांनाही दिली जाईल. ही अलर्ट प्रणाली येत्या १५ आॅगस्टपासून अमलात येणार असल्याचे क्षत्रिय यांनी सांगितले. ‘डिजिटल लॉकर’ उघडणार काही प्रमाणपत्रे ही वारंवार उपयोगात येतात. त्यामुळे ती वारंवार काढली जातात. प्रत्येक वेळी नव्याने अर्ज करून प्रत्येक कागदपत्र त्यासोबत जोडावे लागते. अशा प्रमाणपत्रांसाठी आता डिजिटल लॉकर सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली.