शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

...तर पाणीकपात मागे

By admin | Updated: June 7, 2017 01:47 IST

पाणी कपातीविषयी आढावा घेऊन निर्णय घेऊ असे सूतोवाच महापौर नितीन काळजे यांनी केल्यानंतर पाणीकपात प्रशासन मागे घेणार की नाही,

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पाणी कपातीविषयी आढावा घेऊन निर्णय घेऊ असे सूतोवाच महापौर नितीन काळजे यांनी केल्यानंतर पाणीकपात प्रशासन मागे घेणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मॉन्सूनचे आगमन न झाल्याने सावध भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे. समाधानकारक पाऊस पडल्यानंतर नियमितपणे कपात मागे घेऊ असे धोरण सत्ताधारी आणि प्रशासनाने अवलंबविण्याचे ठरविले आहे. तूर्तास पाणी कपात मागे घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.महापालिकेने २ मेपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाणीकपात मागे घेतली आणि पाऊस वेळेवर पडला नाही, तर नियोजन कोसळेल. त्यामुळे पाणीकपात मागे घेणार नाही, दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. सध्या धरणात २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीकपात केल्याचे प्रशासनाने सांगितले होते. दरम्यान पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळेच पाणी टंचाई झाल्याचे लोकप्रतिनिधींनी उघड केले होते. याबाबत महापौरांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टीही काढली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांनी टँकर लॉबीसाठी पाणीटंचाई केली जात असल्याचा आरोप केला होता. खासदार श्रीरंग बारणे, शहरप्रमुख राहुल कलाटे, माजी गटनेत्या सुलभा उबाळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांनी पाणीटंचाई विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, पालिका पदाधिकारी, पाणीपुरवठा व जलसंपदा अधिकाऱ्यांची बैठक अद्याप झालेली नाही.मॉन्सून लांबल्यास अडचणजुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असला, तरी पाणीकपात मागे घेतली, तर पाऊस न पडल्यास अडचण निर्माण होऊ शकते. मॉन्सूनचे आगमन हे बेभरवशाचे असते. एक जूनपर्यंत येणारा मॉन्सून सहा तारखेपर्यंतही आलेला नाही. त्यामुळे कपात मागे घेऊन संकट ओढवून घेण्यासारखे आहे. त्यामुळे पाणीकपात मागे घेणे धोक्याचे राहील, असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.