शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

राज्यपालांच्या राजीनाम्याची चर्चा, पण देवेंद्र फडणवीसांनी दिले वेगळेच संकेत, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 13:59 IST

Devendra Fadnavis: अनेक विधाने आणि निर्णय यामुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. राज्यपालांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

मुंबई - अनेक विधाने आणि निर्णय यामुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. राज्यपालांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. विविध नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. दरम्यान, राज्यपालांच्या राजीनाम्याची चर्चा जोरात सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र वेगळेच संकेत दिले आहेत. राज्यपालांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलेले नाही. त्यांना पदावर राहायचे असल्यास ते पाच वर्षे पूर्ण होईपर्यत राहू शकतात. मात्र भगत सिंह कोश्यारी यांनी स्वत:च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये राज्यपालांबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या तीन चार महिन्यांपासून राज्यपाल हे सातत्याने आपल्याला जबाबदारीतून मुक्त करा, असे खासगीत सांगत आहेत. माझी तब्येतही आता साथ देत नाही आहे, असे ते सांगत आहेत. मात्र राज्यपालांना राजीनामा द्यायला सांगितला, असं कुणी म्हणत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. राज्यपालांना जर पदावर राहायचं असेल, तर ते पाच वर्षे इथं राहू शकतात. कुणीही त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. पण राज्यपालांनी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सांगितलं आहे की, आता मला या पदावर राहणं जमणार नाही. मला परत गेलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही मला राजीनामा देण्याची परवानगी द्या. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याबाबत व्यक्त केलेल्या इच्छेचा कुठल्या वादाशी संबंध आहे असं मला वाटत नाही.

फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यपाल जेव्हा पद सोडतील त्यापूर्वी ते सल्ला घेण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. दुसरं असं आहे की, राज्यपाल हेसुद्धा एक व्यक्ती आहेत. त्यामुळे निर्णय घेताना त्यांनी जर पंतप्रधानांचा सल्ला घेतला असेल, तर त्यात मला कही गैर वाटत नाही. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरही आरोप केले. राज्यपालांना लक्ष्य करण्यात आलं त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मविआला जो काही स्वैराचार करायचा होता, तो राज्यपालांनी करून दिला नाही. त्याचेच उट्टे काढण्याचा प्रयत्न त्यांना टार्गेट करून करण्यात आला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा