शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

राज्यपालांच्या राजीनाम्याची चर्चा, पण देवेंद्र फडणवीसांनी दिले वेगळेच संकेत, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 13:59 IST

Devendra Fadnavis: अनेक विधाने आणि निर्णय यामुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. राज्यपालांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

मुंबई - अनेक विधाने आणि निर्णय यामुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. राज्यपालांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. विविध नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. दरम्यान, राज्यपालांच्या राजीनाम्याची चर्चा जोरात सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र वेगळेच संकेत दिले आहेत. राज्यपालांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलेले नाही. त्यांना पदावर राहायचे असल्यास ते पाच वर्षे पूर्ण होईपर्यत राहू शकतात. मात्र भगत सिंह कोश्यारी यांनी स्वत:च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये राज्यपालांबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या तीन चार महिन्यांपासून राज्यपाल हे सातत्याने आपल्याला जबाबदारीतून मुक्त करा, असे खासगीत सांगत आहेत. माझी तब्येतही आता साथ देत नाही आहे, असे ते सांगत आहेत. मात्र राज्यपालांना राजीनामा द्यायला सांगितला, असं कुणी म्हणत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. राज्यपालांना जर पदावर राहायचं असेल, तर ते पाच वर्षे इथं राहू शकतात. कुणीही त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. पण राज्यपालांनी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सांगितलं आहे की, आता मला या पदावर राहणं जमणार नाही. मला परत गेलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही मला राजीनामा देण्याची परवानगी द्या. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याबाबत व्यक्त केलेल्या इच्छेचा कुठल्या वादाशी संबंध आहे असं मला वाटत नाही.

फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यपाल जेव्हा पद सोडतील त्यापूर्वी ते सल्ला घेण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. दुसरं असं आहे की, राज्यपाल हेसुद्धा एक व्यक्ती आहेत. त्यामुळे निर्णय घेताना त्यांनी जर पंतप्रधानांचा सल्ला घेतला असेल, तर त्यात मला कही गैर वाटत नाही. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरही आरोप केले. राज्यपालांना लक्ष्य करण्यात आलं त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मविआला जो काही स्वैराचार करायचा होता, तो राज्यपालांनी करून दिला नाही. त्याचेच उट्टे काढण्याचा प्रयत्न त्यांना टार्गेट करून करण्यात आला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा