शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या राजीनाम्याची चर्चा, पण देवेंद्र फडणवीसांनी दिले वेगळेच संकेत, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 13:59 IST

Devendra Fadnavis: अनेक विधाने आणि निर्णय यामुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. राज्यपालांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

मुंबई - अनेक विधाने आणि निर्णय यामुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. राज्यपालांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. विविध नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. दरम्यान, राज्यपालांच्या राजीनाम्याची चर्चा जोरात सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र वेगळेच संकेत दिले आहेत. राज्यपालांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलेले नाही. त्यांना पदावर राहायचे असल्यास ते पाच वर्षे पूर्ण होईपर्यत राहू शकतात. मात्र भगत सिंह कोश्यारी यांनी स्वत:च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये राज्यपालांबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या तीन चार महिन्यांपासून राज्यपाल हे सातत्याने आपल्याला जबाबदारीतून मुक्त करा, असे खासगीत सांगत आहेत. माझी तब्येतही आता साथ देत नाही आहे, असे ते सांगत आहेत. मात्र राज्यपालांना राजीनामा द्यायला सांगितला, असं कुणी म्हणत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. राज्यपालांना जर पदावर राहायचं असेल, तर ते पाच वर्षे इथं राहू शकतात. कुणीही त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. पण राज्यपालांनी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सांगितलं आहे की, आता मला या पदावर राहणं जमणार नाही. मला परत गेलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही मला राजीनामा देण्याची परवानगी द्या. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याबाबत व्यक्त केलेल्या इच्छेचा कुठल्या वादाशी संबंध आहे असं मला वाटत नाही.

फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यपाल जेव्हा पद सोडतील त्यापूर्वी ते सल्ला घेण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. दुसरं असं आहे की, राज्यपाल हेसुद्धा एक व्यक्ती आहेत. त्यामुळे निर्णय घेताना त्यांनी जर पंतप्रधानांचा सल्ला घेतला असेल, तर त्यात मला कही गैर वाटत नाही. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरही आरोप केले. राज्यपालांना लक्ष्य करण्यात आलं त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मविआला जो काही स्वैराचार करायचा होता, तो राज्यपालांनी करून दिला नाही. त्याचेच उट्टे काढण्याचा प्रयत्न त्यांना टार्गेट करून करण्यात आला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा