शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

‘थर’थराटावर निर्बंध; बालगोविंदांना बंदी!

By admin | Updated: August 18, 2016 07:08 IST

महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या उत्सवात आता १८ वर्षाखालील गोविंदा सहभागी होऊ शकणार नाहीत. शिवाय दहीहंडीची उंचीही २० फुटांपेक्षा अधिक असणार नाही. सर्वोच्च

नवी दिल्ली : महाराष्ट्रात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या उत्सवात आता १८ वर्षाखालील गोविंदा सहभागी होऊ शकणार नाहीत. शिवाय दहीहंडीची उंचीही २० फुटांपेक्षा अधिक असणार नाही. सर्वोच्च न्यायालयानेच तसे स्पष्ट निर्देश बुधवारी दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयानेही उंचीची हीच मर्यादा निश्चित केली होती. न्या. ए.आर. दवे आणि न्या. एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. जन्माष्टमीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या दहीहंडीच्या उत्सवासाठी उच्च न्यायालयाचे दोन निर्देश सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविले. एक निर्देश १८ वर्षांच्या आतील युवकांना धोकादायक कसरतीपासून रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याबाबतचा तर दुसरा दहीहंडीत सहभागी होणाऱ्यांचे जन्म प्रमाणपत्र तपासण्याविषयीचा होता. दहीहंडीचे थर २० फुटांपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या राज्य सरकारच्या याचिकेवर न्यायालयाने म्हटले आहे की, कोणताही आदेश देण्यापूर्वी आम्हाला जनहित याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांची बाजू ऐकून घ्यावी लागेल. या प्रकरणात न्यायालयाने पाटील यांचे म्हणणे मागवले होते. पाटील यांनी उच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारच्या विरोधात अवमान प्रकरणी कारवाई सुरू करण्याची मागणी केली होती. राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात असफल ठरल्याची त्यांची तक्रार होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)अठरा वर्षांवरील तरुणांनाच सहभाग घेता येणार- महाराष्ट्र सरकारने न्यायालयाशी संपर्क करून त्यांच्या २०१४ च्या आदेशावर स्पष्टीकरण मागितले होते. या आदेशानुसार उच्च न्यायालयाने दहीहंडीसाठी १८ वर्षांच्या आतील युवकांना सहभाग घेण्यास बंदी घातली होती. - उच्च न्यायालयाने ११ आॅगस्ट २०१४ रोजी स्वाती पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना आदेश दिला होता की, दहीहंडीच्या थरांची उंची २० फुटांपेक्षा जास्त असायला नको, तर १८ वर्षांच्या आतील युवकांना दहीहंडीत भाग घेण्यास परवानगी देण्यात येऊ नये.- तेव्हा राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. - सर्वोच्च न्यायालयाने सुरुवातीला उच्च न्यायालयाचा आदेश रद्द ठरविला होता आणि आव्हान देणारी याचिकाही फेटाळली होती. मंडळे नाराज; पुनर्विचाराची मागणीमुंबई आणि ठाण्यातील दहीहंडी मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाचे आशिष शेलार, मनसेचे बाळा नांदगावकर, काँग्रेसचे संजय निरूपम यांच्यासह अनेक नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि त्यासाठी राज्य सरकारने अर्ज करावा अशा आशयाचे मत व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मानवी थरांच्या उंचीबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशाबाबत काही मत व्यक्त केले नसल्याने आम्ही यापूर्वीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी बांधील नाही, असे राज्य सरकारचे म्हणणे होते. तथापि, उच्च न्यायालयाने त्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्टीकरण मागावे, असे सरकारला सांगितले होते.