शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

शुक्र है, हम लौट आए!

By admin | Updated: April 3, 2015 02:30 IST

खुदा का शुक्र है, हम हिंदुस्थान लौट आये,’ अशी प्रतिक्रिया देत मोहम्मद जहांगीरचे डोळे पाणावले आणि एकच शांतता पसरली.

मुंबई : ‘खुदा का शुक्र है, हम हिंदुस्थान लौट आये,’ अशी प्रतिक्रिया देत मोहम्मद जहांगीरचे डोळे पाणावले आणि एकच शांतता पसरली. एक वेळ अशी होती की, आता मृत्यू अटळ आहे असे वाटत होते. त्यामुळे बिकट परिस्थितीत आपला जीव वाचविण्यासाठी डोंगरदऱ्यांचाही आधार घेण्यात आला, असे जहांगीरकडून सांगण्यात येत होते. जहांगीरप्रमाणेच अन्य भारतीयांचीही अवस्था सारखीच होती. भारतीय हवाई दलाच्या विमानाने येमेनमधील १९0 भारतीयांना मुंबईत आणण्यात आले. पहाटे ४ वाजता मुंबई विमानतळावर आल्यानंतर यातील काही जण इतर राज्यातील असल्याने त्यांची मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था करण्यात आली होती. २२ जानेवारीपासून येमेनमध्ये अंतर्गत युद्ध सुरू झाले असून, त्याने रौद्र रूपच धारण केले आहे. या युद्धात अनेक देशांचे नागरिक अडकले असून, यामध्ये भारतीयांचाही समावेश आहे. यातीलच १९0 भारतीयांना घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान एडनमधून निघून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी पहाटे उतरले. यातील १०० जणांना रेल्वेने इतर राज्यांत पाठविण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. तत्पूर्वी प्रत्यक्षात पहाटे विमानतळावर येमेनमधून परतणाऱ्या भारतीयांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना सीएसटी येथील रेल्वेच्या मुख्यालयात नेण्यासाठी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद उपस्थित होते. मध्य रेल्वेकडून या परतलेल्या भारतीयांची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था करतानाच त्यांना रेल्वेने पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी उपस्थित येमेनमधून परतलेल्या भारतीयांच्या चेहऱ्यावर असलेली चिंता मिटल्याचे स्पष्टपणे दिसत होते. एडनमध्ये एका सिमेंट कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला असलेले शक्तीदासन हे मूळचे केरळचे. गेल्याच वर्षी तेथे शक्तीदासन कामाला गेले होते. याविषयी शक्तीदासन यांच्याशी संवाद साधला असता, प्रत्येक क्षण मृत्यूच्या छायेत जगत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक क्षण मृत्यूच्या छायेत जगतानाच कुटुंबीयांचीही चिंता लागून राहिली होती. मात्र सर्व काही संपले आहे, असे वाटत असतानाच भारतात सुखरूप परतल्याने हा माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्र्रिया शक्तीदासन यांनी दिली. त्या ठिकाणी योवान मंगेश या एका रुग्णालयात लॅब टॅक्निशियन म्हणून काम करणाऱ्या तरुणाने तर मृत्यू कधी कवटाळेल अशीच भयानक परिस्थिती त्या ठिकाणी झाल्याचे सांगितले. भारतात आपण परतणार की नाही असे अनेक विचार येत होते. पण यातून सुखरूपपणे सुटका झाली असून, ते दिवस जरी आठवले तरी अंगावर शहारे येत असल्याचे मंगेश याने सांगितले.