शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

शुक्र है, हम लौट आए!

By admin | Updated: April 3, 2015 02:30 IST

खुदा का शुक्र है, हम हिंदुस्थान लौट आये,’ अशी प्रतिक्रिया देत मोहम्मद जहांगीरचे डोळे पाणावले आणि एकच शांतता पसरली.

मुंबई : ‘खुदा का शुक्र है, हम हिंदुस्थान लौट आये,’ अशी प्रतिक्रिया देत मोहम्मद जहांगीरचे डोळे पाणावले आणि एकच शांतता पसरली. एक वेळ अशी होती की, आता मृत्यू अटळ आहे असे वाटत होते. त्यामुळे बिकट परिस्थितीत आपला जीव वाचविण्यासाठी डोंगरदऱ्यांचाही आधार घेण्यात आला, असे जहांगीरकडून सांगण्यात येत होते. जहांगीरप्रमाणेच अन्य भारतीयांचीही अवस्था सारखीच होती. भारतीय हवाई दलाच्या विमानाने येमेनमधील १९0 भारतीयांना मुंबईत आणण्यात आले. पहाटे ४ वाजता मुंबई विमानतळावर आल्यानंतर यातील काही जण इतर राज्यातील असल्याने त्यांची मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था करण्यात आली होती. २२ जानेवारीपासून येमेनमध्ये अंतर्गत युद्ध सुरू झाले असून, त्याने रौद्र रूपच धारण केले आहे. या युद्धात अनेक देशांचे नागरिक अडकले असून, यामध्ये भारतीयांचाही समावेश आहे. यातीलच १९0 भारतीयांना घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान एडनमधून निघून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी पहाटे उतरले. यातील १०० जणांना रेल्वेने इतर राज्यांत पाठविण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. तत्पूर्वी प्रत्यक्षात पहाटे विमानतळावर येमेनमधून परतणाऱ्या भारतीयांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना सीएसटी येथील रेल्वेच्या मुख्यालयात नेण्यासाठी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद उपस्थित होते. मध्य रेल्वेकडून या परतलेल्या भारतीयांची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था करतानाच त्यांना रेल्वेने पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी उपस्थित येमेनमधून परतलेल्या भारतीयांच्या चेहऱ्यावर असलेली चिंता मिटल्याचे स्पष्टपणे दिसत होते. एडनमध्ये एका सिमेंट कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला असलेले शक्तीदासन हे मूळचे केरळचे. गेल्याच वर्षी तेथे शक्तीदासन कामाला गेले होते. याविषयी शक्तीदासन यांच्याशी संवाद साधला असता, प्रत्येक क्षण मृत्यूच्या छायेत जगत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक क्षण मृत्यूच्या छायेत जगतानाच कुटुंबीयांचीही चिंता लागून राहिली होती. मात्र सर्व काही संपले आहे, असे वाटत असतानाच भारतात सुखरूप परतल्याने हा माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्र्रिया शक्तीदासन यांनी दिली. त्या ठिकाणी योवान मंगेश या एका रुग्णालयात लॅब टॅक्निशियन म्हणून काम करणाऱ्या तरुणाने तर मृत्यू कधी कवटाळेल अशीच भयानक परिस्थिती त्या ठिकाणी झाल्याचे सांगितले. भारतात आपण परतणार की नाही असे अनेक विचार येत होते. पण यातून सुखरूपपणे सुटका झाली असून, ते दिवस जरी आठवले तरी अंगावर शहारे येत असल्याचे मंगेश याने सांगितले.