शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

शुक्र है, हम लौट आए!

By admin | Updated: April 3, 2015 02:30 IST

खुदा का शुक्र है, हम हिंदुस्थान लौट आये,’ अशी प्रतिक्रिया देत मोहम्मद जहांगीरचे डोळे पाणावले आणि एकच शांतता पसरली.

मुंबई : ‘खुदा का शुक्र है, हम हिंदुस्थान लौट आये,’ अशी प्रतिक्रिया देत मोहम्मद जहांगीरचे डोळे पाणावले आणि एकच शांतता पसरली. एक वेळ अशी होती की, आता मृत्यू अटळ आहे असे वाटत होते. त्यामुळे बिकट परिस्थितीत आपला जीव वाचविण्यासाठी डोंगरदऱ्यांचाही आधार घेण्यात आला, असे जहांगीरकडून सांगण्यात येत होते. जहांगीरप्रमाणेच अन्य भारतीयांचीही अवस्था सारखीच होती. भारतीय हवाई दलाच्या विमानाने येमेनमधील १९0 भारतीयांना मुंबईत आणण्यात आले. पहाटे ४ वाजता मुंबई विमानतळावर आल्यानंतर यातील काही जण इतर राज्यातील असल्याने त्यांची मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था करण्यात आली होती. २२ जानेवारीपासून येमेनमध्ये अंतर्गत युद्ध सुरू झाले असून, त्याने रौद्र रूपच धारण केले आहे. या युद्धात अनेक देशांचे नागरिक अडकले असून, यामध्ये भारतीयांचाही समावेश आहे. यातीलच १९0 भारतीयांना घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान एडनमधून निघून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी पहाटे उतरले. यातील १०० जणांना रेल्वेने इतर राज्यांत पाठविण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. तत्पूर्वी प्रत्यक्षात पहाटे विमानतळावर येमेनमधून परतणाऱ्या भारतीयांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना सीएसटी येथील रेल्वेच्या मुख्यालयात नेण्यासाठी मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद उपस्थित होते. मध्य रेल्वेकडून या परतलेल्या भारतीयांची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था करतानाच त्यांना रेल्वेने पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी उपस्थित येमेनमधून परतलेल्या भारतीयांच्या चेहऱ्यावर असलेली चिंता मिटल्याचे स्पष्टपणे दिसत होते. एडनमध्ये एका सिमेंट कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कामाला असलेले शक्तीदासन हे मूळचे केरळचे. गेल्याच वर्षी तेथे शक्तीदासन कामाला गेले होते. याविषयी शक्तीदासन यांच्याशी संवाद साधला असता, प्रत्येक क्षण मृत्यूच्या छायेत जगत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक क्षण मृत्यूच्या छायेत जगतानाच कुटुंबीयांचीही चिंता लागून राहिली होती. मात्र सर्व काही संपले आहे, असे वाटत असतानाच भारतात सुखरूप परतल्याने हा माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्र्रिया शक्तीदासन यांनी दिली. त्या ठिकाणी योवान मंगेश या एका रुग्णालयात लॅब टॅक्निशियन म्हणून काम करणाऱ्या तरुणाने तर मृत्यू कधी कवटाळेल अशीच भयानक परिस्थिती त्या ठिकाणी झाल्याचे सांगितले. भारतात आपण परतणार की नाही असे अनेक विचार येत होते. पण यातून सुखरूपपणे सुटका झाली असून, ते दिवस जरी आठवले तरी अंगावर शहारे येत असल्याचे मंगेश याने सांगितले.