शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
5
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
6
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
7
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
8
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
9
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
10
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
11
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
12
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
13
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
14
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
15
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
16
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
17
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
18
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
19
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
20
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."

दारी आलेल्या भाजीला ठाणेकरांचा तुडुंब प्रतिसाद

By admin | Updated: August 4, 2016 02:50 IST

‘शॉप फॉर चेंज’ या संस्थेने ठाण्यात आयोजित केलेल्या शेतकरी ते ग्राहक उपक्रमास ठाणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला.

ठाणे : ग्राहकांना थेट दारापर्यंत भाजीपाला मिळावा यासाठी ‘शॉप फॉर चेंज’ या संस्थेने ठाण्यात आयोजित केलेल्या शेतकरी ते ग्राहक उपक्रमास ठाणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांचा माल थेट आपल्या दारापर्यंत मिळत असल्याने एकीकडे ठाणेकर आनंदीत झाले होते, तर आपल्या शेतातील भाजीपाला हातोहात विकला जात असल्याने शेतकरीही सुखावले होते. ठाणे, डोंबिवली, दादर येथे प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात आला. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता ठाण्यातील विष्णूनगर येथे बुधवारी मनसेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला गेला. नारायणगाव परिसरातील शेतकऱ्यांचा चांगल्या दर्जाचा रास्त दरातील भाजीपाला ठाणेकरांच्या दारात आला. जवळपास दीड टन भाजीपाला आणला होता. आता दर सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी ४.३० ते ७.३० यावेळेत दादर, डोंबिवली, ठाणे येथे हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे संस्थेचे समीर आठवले यांनी सांगितले. दलालांच्या माध्यमातून ज्यावेळी भाजीपाला विकला जात असे त्यावेळी आम्हाला तुटपुंजी मिळकत मिळत होती. परंतु या उपक्रमामुळे ३० टक्के फायदा होतो. आमच्या शेतातील माल थेट ग्राहकाच्या दारात जातो, ही संकल्पनाच खूप समाधान देणारी आहे. आम्ही थेट शहरात विक्रीसाठी आलो तर आम्हाला कोण दाद देणार? त्यामुळे संस्थेचा मोलाचा आधार मिळतो आहे. हा उपक्रम सातत्याने चालू रहावा, अशी आमची अपेक्षा आहे. ग्राहकांना ज्या भाज्या आवडतात त्याच आम्ही आणतो. कोणीही घासाघीस करीत नाही. कारण किरकोळ बाजारातून घेत असलेल्या दरापेक्षा ५० टक्के कमी दरानेच भाजीपाला आम्ही विकतो. त्यामुळे यात ग्राहकांचाच फायदा आहे. भाजीपाला विकताना कोणतीही अडचण आम्हाला जाणवत नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले.याआधी ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम राबविला होता. त्यावेळी जवळपास ८०० किलो भाजीपाला विकला गेला होता. परंतु आताही ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. - समीर आठवले, शॉप फॉर चेंज.