शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

गुन्हेगारी रोखण्यात राज्यात ठाणे अव्वल!

By admin | Updated: January 7, 2017 03:50 IST

२०१५ च्या तुलनेत गतवर्षी ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी झाले.

ठाणे : २०१५ च्या तुलनेत गतवर्षी ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी झाले. या कामगिरीने ठाणे जिल्हा संपूर्ण राज्यात अव्वल ठरला असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी शुक्रवारी दिली. विविध गुन्ह्यांमधील जप्त मुद्देमाल तक्रारदारांना परत देण्यासाठी आयोजित केलेल्या मुद्देमाल अभिहस्तांतरण कार्यक्रमात ते बोलत होते.ठाण्यात गत काही वर्षांपासून गुन्ह्यांचे प्रमाण सतत वाढत होते. दरवर्षी सरासरी २० टक्क्यांची वाढ त्यामध्ये होत होती. २०१६ साली मात्र हे प्रमाण २० टक्क्यांनी घटले. या वर्षात मालमत्ताचोरीचे ५ हजार ४०५ गुन्हे घडले. त्यापैकी १ हजार ७२६ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले. उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांमधील २६ कोटी ६९ लाख ८० हजार ९८९ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. चेन स्नॅचिंग आणि इतर गुन्ह्यांमधील २ कोटी ८३ हजार ७७ हजार ७५५ रुपयांचे सोनेचांदी फिर्यादींना परत करण्यात आले. याशिवाय, चोरी गेलेली ८ कोटी ३३ लाख ८२ हजार रुपयांची वाहनेही फिर्यादींना परत करण्यात आली. मालमत्तेशी संबंधित इतर गुन्ह्यांमधील १३ कोटी ५३ लाख २७ हजार ४२० रुपयांचा मुद्देमालही फिर्यादींना परत करण्यात आला. एकूण २४ कोटी ७० लाख ८७ हजार १७९ रुपयांचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादींना देण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. पोलीस आयुक्तालयाच्या हिरवळीवर पार पडलेल्या या कार्यक्रमात ५४ फिर्यादींना ६२ लाख ६७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आला. चेन स्नॅचिंगचे प्रमाण २० ते २५ टक्क्यांनी कमी झाले असल्याचे पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास पोलीस सहआयुक्त आशुतोष डुंबरे, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांच्यासह पोलीस अधिकारी, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)>सौभाग्याचे लेणे मिळालेवर्तकनगरातील प्रज्ञा राजपूत, आनंदनगरातील विद्याश्री कांबळे यांचे मंगळसूत्र २ वर्षांपूर्वी चोरी झाले होते. पोलिसांच्या प्रयत्नाने सौभाग्याचे लेणे परत मिळाल्याचा आनंद त्यांच्यासह इतर महिलांच्याही चेहऱ्यावर दिसत होता.४ वर्षांत तीन गाड्या चोरीपोखरण रोडवरील सुरेश लाड यांच्या दोन कार आणि एक मोटारसायकल गेल्या ४ वर्षांत चोरी झाल्या. सर्व गाड्या पोलिसांनी त्यांना परत दिल्या. >वर्दीतील माणुसकी मानपाड्यातील विद्यार्थी सुनील सोमवंशी याची मोटारसायकल चोरी झाल्याने त्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण झाला होता. चितळसर पोलीस ठाण्यात त्याने तक्रार दिल्यानंतर तेथील पोलीस उपनिरीक्षक सुर्वे यांनी स्वत:ची मोटारसायकल सुनीलला वापरण्यासाठी दिली. वर्दीतील या माणुसकीचा प्रत्यय आपणास आला असल्याचे सुनीलने यावेळी सांगितले.