शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

ठाणे: ताटातूट झालेल्या आजींना रेल्वेकडून मदत, घरी परण्यासाठी काढून दिले तिकीट; खर्चासाठीही दिले पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2017 2:43 AM

ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात तारीख असल्याने न्यायबंदी मुलाला भेटण्यासाठी आलेल्या अक्कलकोट येथील ७० वर्षीय आजीबाई आणि तिच्या सुनेची मुलाच्या भेटीनंतर घरी परताना ठाण्यात ताटातूट झाली.

पंकज रोडेकरठाणे : ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात तारीख असल्याने न्यायबंदी मुलाला भेटण्यासाठी आलेल्या अक्कलकोट येथील ७० वर्षीय आजीबाई आणि तिच्या सुनेची मुलाच्या भेटीनंतर घरी परताना ठाण्यात ताटातूट झाली. त्यानंतर ती आजीबाई कसेबसे ठाणे रेल्वे स्थानकात आली. याचदरम्यान, रेल्वे प्रशासनाने तिच्या सुनेचा शोध घेतला. पण, ती शोधून न सापडल्याने अखेर तिला मदत म्हणून रेल्वे तिकीट आणि खर्चाला पैसे देऊन एक्सप्रेसमध्ये बसवून घरी धाडले.लक्ष्मीबाई (नाव बदलेले आहे) आणि त्यांची सून या दोघी तळोजा जेलमध्ये न्यायबंदी असलेल्या मुलाची शुक्रवारी ठाणे न्यायालयात हजर करण्याची तारीख असल्याने त्याला भेटण्यासाठी सकाळी ठाण्यात आल्या. दुपारी भेट झाल्यानंतर दोघीही पायी ठाणे रेल्वे स्थानकाकडे घरी जाण्यासाठी परताना त्या ठाणे बाजारपेठेत झालेल्या गर्दीत रस्त्याच्या वेगवेगळ्या बाजूला गेल्या. याचदरम्यान, गर्दीतून आजीबाई सुनेच्या दिशेने जात असताना, अचानक दोन-तीन बस आणि एका मागून एक आल्याने काही वाहनांमुळे त्यांची ताटातूट झाली. गर्दी कमी झाल्यावर आजीबार्इंनी सुनेचा शोध घेतला. मात्र, ती न सापडल्याने मोठ्या धीराने त्यांनी लोकांना विचारत कसेबसे ठाणे रेल्वे स्थानक गाठले. तोपर्यंत सांयकाळचे ५.३० वाजले होते. सून रेल्वे स्थानकात असेल म्हणून त्यांनी ठाणे रेल्वे स्थानक प्रबंधक कार्यालयामार्फत शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही दाद देत नसल्याने केविलवाण्या अवस्थेत असलेल्या आजीबार्इंना रेल्वे प्रशासनाने धीर देऊन विचारपूस केली. त्यावेळी आजीबाई अक्कलकोट येथे राहणाºया असल्याचे समोर आले.आजीबार्इंच्या कपड्यांवरून त्या गरीब घरातील असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यांच्याकडील एका पिशवीत पाण्याची बाटली आणि अवघी दहा रुपयांची नोट होती. याचदरम्यान, अक्कलकोटला जाण्यासाठी रात्री १०.३५ ची कुर्ला- कोईम्बतूर एक्सप्रेस असल्याने तब्बल पाच तासांचा मुक्काम आजीबार्इंचा प्रबंधक कार्यालयात होता. नाश्ता आणि रात्रीचे जेवण करून त्या एक्सप्रेसने आपल्या घराकडे रवाना झाल्या.दरम्यान, रेल्वे प्रशासनाने तातडीने या वृद्ध महिलेच्या तक्रारीची दखल घेऊन तिला सर्वतोपरी मदत करून आपल्या नातलगांपर्यंत जाण्याकरता मदत केल्याबद्दल प्रवासी संघटना आणि ज्येष्ठ नागरिकांकरता काम करणारे कार्यकर्ते यांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे