शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

ठाणे रेल्वे स्थानकात २५ हजार फुकटे!

By admin | Updated: July 8, 2017 05:39 IST

लोकलने विनातिकीट प्रवास करणे हा कायद्याने सामाजिक गुन्हा आहे. याबाबत रेल्वेला सहकार्य करावे, असे प्रवासात आपण ऐकत

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : लोकलने विनातिकीट प्रवास करणे हा कायद्याने सामाजिक गुन्हा आहे. याबाबत रेल्वेला सहकार्य करावे, असे प्रवासात आपण ऐकत असतो. रेल्वेने वारंवार सूचना करूनसुद्धा लोकलने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होण्याऐवजी ती दिवसेंदिवस वाढत आहे. ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकात मे ते जून २०१७ या ३ महिन्यांत सुमारे ५ हजार तर मागील वर्षभरात २० हजारहून अधिक फुकटे ठाणे स्थानकात टीसींंच्या जाळयात अडकले आहेत. त्यांच्याकडून ६२ लाखांहून अधिक दंडही वसूल केल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.ठाणे स्थानकात दररोज सुमारे ७-८ लाख प्रवासी येजा करीत असल्याने ते नेहमीच गजबलेले असते. येथे एकूण १० फलाट असून, मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल धावतात. त्यातच या स्थानकातून आतबाहेर करण्यासाठी जवळपास अधिकृत १९ मार्गिका आहेत. त्यामधील फलाट क्रमांक २ आणि १० यावरून थेट बाहेर पडणे शक्य होते. शहराचे दिवसेंदिवस झपाट्याने नागरिकरण होत असल्याने त्याचा स्थानकावर ताण पडतो.सर्वाधिक व्यस्त स्थानक अशी ओळख असलेल्या या स्थानकातून ठाणे ते बोरीबंदर ही पहिली लोकल धावली. या रेल्वे स्थानकाला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने येथे पहिल्या सरकत्या जिन्यापासून वातानुकूलित शौचालयासह अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची व्यवस्था केली. त्यातच, मुंबईच्या आसपासच्या शहरांमध्ये येण्याजाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकाची मदत होत असल्याने या स्थानकात लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. फुकट्यांना पकडण्यासाठी सुमारे २४ टीसींची मंजूर पदे आहेत. त्यांनी एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या वर्षभरात २० हजार २४५ विनातिकीट प्रवाशांना पकडून सुमारे ४८ लाख ६९ हजार ८१२ रुपयांचा दंड वसूल केला. विशेष म्हणजे अशा प्रकारे फुकट प्रवास करणारे प्रवासी हे फलाट क्र मांक २, ९ व १० वर अधिक प्रमाणात आढळून आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.फुकट्यांमुळे रेल्वे मालामाल ठाण्यात पकडलेल्या फुकट्यांकडून जर ६२ लाख २८ हजार ५२७ रुपये वसूल केला आहे. जर त्यांनी तिकीट काढून प्रवास केला असता, तर रेल्वेच्या तिजोरी काही लाख रुपये जमा झाले असते. मात्र, या फुकट्यांमुळे रेल्वेच्या तिजोरीत ६२ लाखांहून अधिक रक्कम दंड स्वरूपात जमा झाल्याने रेल्वे मालामाल झाली आहे.यंदा आकडा वाढला : २०१५-१६ मध्ये ठाण्यात ७ हजार ९९२ विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडले होते. त्यावेळी त्यांच्याकडून २२ लाख ६३ हजार दंड वसूल केला होता. तर २०१६-१७ या वर्षात हा आकडा चक्क २० हजार २४५ वर गेल्याने फुटक प्रवास करताना पकडणाऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे. तसेच त्यांच्याकडून ४८ लाख ६९ हजार ८१२ रुपये दंड वसूल केल्याचे रेल्वेने सांगितले.