शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

ठाणे रेल्वे स्थानकात २५ हजार फुकटे!

By admin | Updated: July 8, 2017 05:39 IST

लोकलने विनातिकीट प्रवास करणे हा कायद्याने सामाजिक गुन्हा आहे. याबाबत रेल्वेला सहकार्य करावे, असे प्रवासात आपण ऐकत

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : लोकलने विनातिकीट प्रवास करणे हा कायद्याने सामाजिक गुन्हा आहे. याबाबत रेल्वेला सहकार्य करावे, असे प्रवासात आपण ऐकत असतो. रेल्वेने वारंवार सूचना करूनसुद्धा लोकलने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होण्याऐवजी ती दिवसेंदिवस वाढत आहे. ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकात मे ते जून २०१७ या ३ महिन्यांत सुमारे ५ हजार तर मागील वर्षभरात २० हजारहून अधिक फुकटे ठाणे स्थानकात टीसींंच्या जाळयात अडकले आहेत. त्यांच्याकडून ६२ लाखांहून अधिक दंडही वसूल केल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.ठाणे स्थानकात दररोज सुमारे ७-८ लाख प्रवासी येजा करीत असल्याने ते नेहमीच गजबलेले असते. येथे एकूण १० फलाट असून, मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल धावतात. त्यातच या स्थानकातून आतबाहेर करण्यासाठी जवळपास अधिकृत १९ मार्गिका आहेत. त्यामधील फलाट क्रमांक २ आणि १० यावरून थेट बाहेर पडणे शक्य होते. शहराचे दिवसेंदिवस झपाट्याने नागरिकरण होत असल्याने त्याचा स्थानकावर ताण पडतो.सर्वाधिक व्यस्त स्थानक अशी ओळख असलेल्या या स्थानकातून ठाणे ते बोरीबंदर ही पहिली लोकल धावली. या रेल्वे स्थानकाला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याने येथे पहिल्या सरकत्या जिन्यापासून वातानुकूलित शौचालयासह अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची व्यवस्था केली. त्यातच, मुंबईच्या आसपासच्या शहरांमध्ये येण्याजाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकाची मदत होत असल्याने या स्थानकात लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. फुकट्यांना पकडण्यासाठी सुमारे २४ टीसींची मंजूर पदे आहेत. त्यांनी एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या वर्षभरात २० हजार २४५ विनातिकीट प्रवाशांना पकडून सुमारे ४८ लाख ६९ हजार ८१२ रुपयांचा दंड वसूल केला. विशेष म्हणजे अशा प्रकारे फुकट प्रवास करणारे प्रवासी हे फलाट क्र मांक २, ९ व १० वर अधिक प्रमाणात आढळून आल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.फुकट्यांमुळे रेल्वे मालामाल ठाण्यात पकडलेल्या फुकट्यांकडून जर ६२ लाख २८ हजार ५२७ रुपये वसूल केला आहे. जर त्यांनी तिकीट काढून प्रवास केला असता, तर रेल्वेच्या तिजोरी काही लाख रुपये जमा झाले असते. मात्र, या फुकट्यांमुळे रेल्वेच्या तिजोरीत ६२ लाखांहून अधिक रक्कम दंड स्वरूपात जमा झाल्याने रेल्वे मालामाल झाली आहे.यंदा आकडा वाढला : २०१५-१६ मध्ये ठाण्यात ७ हजार ९९२ विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना पकडले होते. त्यावेळी त्यांच्याकडून २२ लाख ६३ हजार दंड वसूल केला होता. तर २०१६-१७ या वर्षात हा आकडा चक्क २० हजार २४५ वर गेल्याने फुटक प्रवास करताना पकडणाऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे. तसेच त्यांच्याकडून ४८ लाख ६९ हजार ८१२ रुपये दंड वसूल केल्याचे रेल्वेने सांगितले.