शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

ठाणे-पालघरमध्ये पाण्याने तळ गाठला

By admin | Updated: April 20, 2015 02:31 IST

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील भूजल पातळी कमालीची खालावली आहे. या दोन्ही जिल्ह्यांमधील १४ तालुक्यांमधील पाण्याने तळ गाठल्याची माहिती

ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील भूजल पातळी कमालीची खालावली आहे. या दोन्ही जिल्ह्यांमधील १४ तालुक्यांमधील पाण्याने तळ गाठल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या भूजल सर्वेक्षण खात्याने सादर केलेल्या अहवालामध्ये नमूद केली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर, ठाणे आणि अंबरनाथ या तालुक्यांमधील ३८ विहिरींची नुकतीच पाहणी केली. भिवंडीतील ८ विहिरींची पाहणी केली असता या ठिकाणी ४.२१ मीटरवर पाणी गेल्याचे आढळले. मागील वर्षांच्या तुलनेत ही पाणीपातळी ०.१२ मीटरने घसरली आहे. कल्याणातील पाणीपातळी १.१० मीटर असून ती १.२२ ने घसरली आहे. मुरबाडमधील पाणीपातळी ४.५६ असून ती केवळ ०.४ ने खाली आली आहे. शहापुरात पाण्याची पातळी ३.१० असून ती ०.३ ने घसरली आहे. ठाण्याची पाणीपातळी २.५७ असून ती ०.१८ ने घसरली आहे. तर अंबरनाथमधील पाण्याची पातळी ३.५३ मीटर असून ती ०.०९ ने घसरल्याचे समोर आले आहे. डहाणूची पाणीपातळी ०.३६ ने, जव्हारची ०.१४, मोखाडा ०.०३, पालघर ०.२६, तलासरी ०.०९, वाडा ०.२३ आणि विक्रमगडची पातळी ०.११ ने घसरली.(प्रतिनिधी)