शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
6
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
7
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
8
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
10
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
11
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
12
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
13
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
14
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
15
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
16
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
17
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
18
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
19
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
20
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय

ठाणे पालिका आयुक्तांचा सर्जिकल स्ट्राइक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 03:43 IST

महापौरांनी सचिव विभागाला लिहिलेल्या पत्रावरून शुक्रवारच्या महासभेत गदारोळ झाला.

ठाणे : महापौरांनी सचिव विभागाला लिहिलेल्या पत्रावरून शुक्रवारच्या महासभेत गदारोळ झाला. महापौरांना विश्वासात न घेता विषयपत्रिका सभागृहासमोर आणलीच कशी, असा प्रश्न करत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी प्रशासनाला अचडणीत आणले. सचिवांनी चूक मान्य केल्यावर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापौरांच्या लेटरबॉम्बला सर्जिकल स्ट्राइकने उत्तर देऊन पटलावरील इतिवृत्त वगळता सर्वच विषय मागे घेत नगरसेवकांची कोंडी केली. महासभा सुरू होताच सचिवांनी विषयपत्रिका वाचताच शिवसेनेचे नगरसेवक दशरथ पालांडे यांनी हरकत घेत महापौरांच्या नावाचा उल्लेख का केला नाही, असा सवाल केला. तर, सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विलास सामंत यांनी महापौरांनी सचिव विभागाला जे पत्र दिले आहे, त्याचे वाचन सभागृहात करावे, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीला विरोधकांनी साथ दिली. सचिवांनी हे पत्र वाचण्यास टाळाटाळ केली. मग आयुक्त सभागृहात येताच त्यांनी पत्र वाचण्यास सांगितले. त्यात काही विषय चर्चा न करताच पटलावर आणण्यास महापौरांनी हरकत घेतली होती. ही बाब चुकीची असून ते विषय प्रशासनाने मागे घ्यावेत, अशीही मागणीही महापौरांनी केली होती. याच मुद्यावरून पुन्हा सत्ताधारी आक्रमक झाले आणि त्यांनी प्रशासनावर तोंडसुख घत महापौरांना विश्वासात घेऊनच विषयपत्रिका आणण्यावर भर दिला. सचिवांकडून ही चूक तीन वेळा झाल्याचा आरोप विलास सामंत यांनी केला. सचिवांकडून खुलासा मागितला. त्यावर सचिव मनीष जोशी यांनी महापौरांनीच १८ तारखेला महासभा घ्यावी, असा निर्णय घेतल्याचे सांगून त्याची विषय पत्रिका ९ तारखेला प्रसिद्ध करणे बंधनकारक होते. काही विषय उशिराने आल्याने त्याची माहिती महापौरांना देणे आवश्यक असतांनाही केवळ कायदेशीर अडचणी लक्षात घेऊन ही विषय पत्रिका प्रसिद्ध केल्याचे सांगत चूक झाल्याचे कबूल केले. सचिवांच्या खुलाशानंतर महासभा सुरळीत सुरु होईल, अशी शक्यता असतांनाच आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही प्रशासनाची चूक मान्य करत केली. यापुढे एखाद्या विषयाचा गोषवारा उपलब्ध झाला नाही तर तो विषय पटलावर घेतला जाणार नाही असे सांगून अशी चूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करू असे जाहीर करत सर्व विषय माघे घेतल्याचे जाहीर केल्याने महापौरांच्या लेटरबॉम्बला सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिले. आयुक्तांच्या सर्जिकल स्ट्राईकने सर्वच नगरसेवक हादरले. पण याचे खापर त्यांनी महापौरांवर फोडले. तुम्ही या मानपमानाच्या नाट्यात पडला नसतात तर नगरसेवकांच्या प्रभागातील रखडलेले प्रस्ताव मार्गी लागले असते, असा टोला काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी लगावला. सत्ताधाऱ्यांनीही महासभा घेण्याची मागणी केली. परंतु, आयुक्त आपल्या मतावर ठाम राहिले. त्यामुळे ही महासभा पुन्हा होणार असे महापौर सांगत असले, तरी थेट पुढील महिन्यात महासभा होईल, असे आयुक्तांनी सांगितल्याने सर्वपक्षीय सदस्य हबकले. त्या सभेत विषय मंजूर झाल्यावर लगेचच आचारसंहिता लागली, तर कामे होणार कधी असा प्रश्न त्यांना पडला. (प्रतिनिधी)>प्रशासनाची मनमानी; महापौरांचा आरोपसदस्यांचे विषय मार्गी लागावे हीच माझी नेहमी इच्छा होती. परंतु,अनेक वेळा सदस्यांचे विषय मागे ठेवून प्रशासन स्वत:चे विषय पटलावर आणत होते असा गौप्यस्फोट महापौर संजय मोरे यांनी सभागृहासमोर केला. रस्त्यांच्या विषयातही प्रशासनाकडून आडकाठी घातली गेली होती. वारंवार असे प्रकार घडत असल्याने ठाण्याचा प्रथम नागरिक म्हणून मी हा पत्रव्यवहार केला होता. परंतु, त्याचा कुठेही गवगवा केला नसल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला. सत्ताधारी नगरसेवकांचा सभात्यागमहापौरांना डावलून प्रशासन मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करून प्रशासनाला कामे करायची नसल्याचे सांगत शिवसेनेचे नगरसेवक काशीराम राऊत यांनी सभागृहात विषय पत्रिका उधळून प्रशासनाचा निषेध करून सभात्याग केला. प्रशासनाकडून अशा प्रकारे नगरसेवकांची पिळवणूक सुरु असून, नगरसेवकांची कामे होऊ नयेत हीच त्यांची इच्छा असल्याचे मत व्यक्त करून शिवसेनेचे नगरसेवक सुधीर भगत यांनीही सभात्याग केला.