शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे पालिका आयुक्तांचा सर्जिकल स्ट्राइक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 03:43 IST

महापौरांनी सचिव विभागाला लिहिलेल्या पत्रावरून शुक्रवारच्या महासभेत गदारोळ झाला.

ठाणे : महापौरांनी सचिव विभागाला लिहिलेल्या पत्रावरून शुक्रवारच्या महासभेत गदारोळ झाला. महापौरांना विश्वासात न घेता विषयपत्रिका सभागृहासमोर आणलीच कशी, असा प्रश्न करत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी प्रशासनाला अचडणीत आणले. सचिवांनी चूक मान्य केल्यावर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापौरांच्या लेटरबॉम्बला सर्जिकल स्ट्राइकने उत्तर देऊन पटलावरील इतिवृत्त वगळता सर्वच विषय मागे घेत नगरसेवकांची कोंडी केली. महासभा सुरू होताच सचिवांनी विषयपत्रिका वाचताच शिवसेनेचे नगरसेवक दशरथ पालांडे यांनी हरकत घेत महापौरांच्या नावाचा उल्लेख का केला नाही, असा सवाल केला. तर, सेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विलास सामंत यांनी महापौरांनी सचिव विभागाला जे पत्र दिले आहे, त्याचे वाचन सभागृहात करावे, अशी मागणी केली. त्यांच्या या मागणीला विरोधकांनी साथ दिली. सचिवांनी हे पत्र वाचण्यास टाळाटाळ केली. मग आयुक्त सभागृहात येताच त्यांनी पत्र वाचण्यास सांगितले. त्यात काही विषय चर्चा न करताच पटलावर आणण्यास महापौरांनी हरकत घेतली होती. ही बाब चुकीची असून ते विषय प्रशासनाने मागे घ्यावेत, अशीही मागणीही महापौरांनी केली होती. याच मुद्यावरून पुन्हा सत्ताधारी आक्रमक झाले आणि त्यांनी प्रशासनावर तोंडसुख घत महापौरांना विश्वासात घेऊनच विषयपत्रिका आणण्यावर भर दिला. सचिवांकडून ही चूक तीन वेळा झाल्याचा आरोप विलास सामंत यांनी केला. सचिवांकडून खुलासा मागितला. त्यावर सचिव मनीष जोशी यांनी महापौरांनीच १८ तारखेला महासभा घ्यावी, असा निर्णय घेतल्याचे सांगून त्याची विषय पत्रिका ९ तारखेला प्रसिद्ध करणे बंधनकारक होते. काही विषय उशिराने आल्याने त्याची माहिती महापौरांना देणे आवश्यक असतांनाही केवळ कायदेशीर अडचणी लक्षात घेऊन ही विषय पत्रिका प्रसिद्ध केल्याचे सांगत चूक झाल्याचे कबूल केले. सचिवांच्या खुलाशानंतर महासभा सुरळीत सुरु होईल, अशी शक्यता असतांनाच आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही प्रशासनाची चूक मान्य करत केली. यापुढे एखाद्या विषयाचा गोषवारा उपलब्ध झाला नाही तर तो विषय पटलावर घेतला जाणार नाही असे सांगून अशी चूक करणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करू असे जाहीर करत सर्व विषय माघे घेतल्याचे जाहीर केल्याने महापौरांच्या लेटरबॉम्बला सर्जिकल स्ट्राईकने उत्तर दिले. आयुक्तांच्या सर्जिकल स्ट्राईकने सर्वच नगरसेवक हादरले. पण याचे खापर त्यांनी महापौरांवर फोडले. तुम्ही या मानपमानाच्या नाट्यात पडला नसतात तर नगरसेवकांच्या प्रभागातील रखडलेले प्रस्ताव मार्गी लागले असते, असा टोला काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी लगावला. सत्ताधाऱ्यांनीही महासभा घेण्याची मागणी केली. परंतु, आयुक्त आपल्या मतावर ठाम राहिले. त्यामुळे ही महासभा पुन्हा होणार असे महापौर सांगत असले, तरी थेट पुढील महिन्यात महासभा होईल, असे आयुक्तांनी सांगितल्याने सर्वपक्षीय सदस्य हबकले. त्या सभेत विषय मंजूर झाल्यावर लगेचच आचारसंहिता लागली, तर कामे होणार कधी असा प्रश्न त्यांना पडला. (प्रतिनिधी)>प्रशासनाची मनमानी; महापौरांचा आरोपसदस्यांचे विषय मार्गी लागावे हीच माझी नेहमी इच्छा होती. परंतु,अनेक वेळा सदस्यांचे विषय मागे ठेवून प्रशासन स्वत:चे विषय पटलावर आणत होते असा गौप्यस्फोट महापौर संजय मोरे यांनी सभागृहासमोर केला. रस्त्यांच्या विषयातही प्रशासनाकडून आडकाठी घातली गेली होती. वारंवार असे प्रकार घडत असल्याने ठाण्याचा प्रथम नागरिक म्हणून मी हा पत्रव्यवहार केला होता. परंतु, त्याचा कुठेही गवगवा केला नसल्याचा खुलासाही त्यांनी यावेळी केला. सत्ताधारी नगरसेवकांचा सभात्यागमहापौरांना डावलून प्रशासन मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करून प्रशासनाला कामे करायची नसल्याचे सांगत शिवसेनेचे नगरसेवक काशीराम राऊत यांनी सभागृहात विषय पत्रिका उधळून प्रशासनाचा निषेध करून सभात्याग केला. प्रशासनाकडून अशा प्रकारे नगरसेवकांची पिळवणूक सुरु असून, नगरसेवकांची कामे होऊ नयेत हीच त्यांची इच्छा असल्याचे मत व्यक्त करून शिवसेनेचे नगरसेवक सुधीर भगत यांनीही सभात्याग केला.