शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

ठाणे-मुंबईला टोलनाक्यांचा विळखा कायम

By admin | Updated: June 1, 2015 04:38 IST

राज्यातील १२ टोलनाके जूनपासून बंद करण्याचा मुहूर्त शासनाने दीड महिन्यापूर्वी घोषित केला आहे. पण, या यादीत मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एकाही टोलनाक्याचा समावेश

सुरेश लोखंडे -  ठाणेराज्यातील १२ टोलनाके जूनपासून बंद करण्याचा मुहूर्त शासनाने दीड महिन्यापूर्वी घोषित केला आहे. पण, या यादीत मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एकाही टोलनाक्याचा समावेश नाही. त्यामुळे विरोधीपक्ष असताना टोलला विरोध करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडूनसुद्धा मुंबई-ठाणेकरांच्या तोंडाला पाने पुसल्याचे उघड झाले आहे.रस्त्यावरील खर्चापेक्षा जास्त रकमेची वसुली टोलनाक्यांद्वारे होत असल्याचा आरोप सातत्याने झाला. मुंबईला जाण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी राज्यात सर्वाधिक टोलनाक्यांचा विळखा ठाण्यासह नव्या पालघर जिल्ह्यात सुमारे १६ ठिकाणी आहे. त्यांच्या विरोधात सातत्याने रस्त्यावर उतरणारी शिवसेना-भाजपा आता सत्तेवर असतानाही त्यांच्याकडून या दोन्ही जिल्ह्यांतील एकही टोलनाका बंद करणे शक्य झाले नाही. यामुळे विरोधी पक्षाच्या बाकावर बसून टोल बंद करण्यासाठी केलेली आंदोलने केवळ ‘चिथावणी देणारी’ ठरले आहे. सत्ताधारी शिवसेना-भाजपाच्या आमदारांनी पूर्वी टोलच्या जिझिया कराविरोधात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे कामकाज बंद पाडून सभात्याग केल्याचे अद्याप स्मरणात आहे. जिल्ह्यातील ही टोलधाड नष्ट करण्यासाठी सध्याचे पालकमंत्री व बांधकाममंत्री एकनाथ शिंदे सत्तेत असतानाही अपयशी ठरल्याचे राजकीय धुरीणांकडून ऐकायला मिळत आहे. ठाणे-पालघरच्या १६ टोलनाक्यांपैकी ग्रामीण भागालगतच्या ५ नाक्यांवर कार, जीप व एसटी बसेसचा टोल घेणे बंद करण्याचे घोषित करण्यात आले. मात्र, एकही नाका कायमचा बंद करण्यात न आल्यामुळे नागरिकांच्या पदरी निराशा आली आहे. त्यातच मुंबईत जाण्यासाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून भूमिका बजावत असलेल्या ठाणे शहरालगतचे टोलनाके बंद करण्यात आले नाहीत. बंद केलेले व कार, जीप, बसला सवलत दिलेले टोलनाके सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ आणि एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प आदींच्या नियंत्रणातील आहेत. ठाणे, पालघर जिल्ह्यांत उभ्या करण्यात आलेल्या सुमारे १६ टोलनाक्यांपैकी ५ टोलनाके सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत. ५ टोलनाके महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंळाचे असून, उर्वरित ५ टोलनाके राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियंत्रणातील आहेत. यापैकी बंद केलेल्या नाक्यांमध्ये एकाही खाजगी कंपनीच्या टोलनाक्याचा समावेश नाही.