शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

ठाणे-मुंबईला टोलनाक्यांचा विळखा कायम

By admin | Updated: June 1, 2015 04:38 IST

राज्यातील १२ टोलनाके जूनपासून बंद करण्याचा मुहूर्त शासनाने दीड महिन्यापूर्वी घोषित केला आहे. पण, या यादीत मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एकाही टोलनाक्याचा समावेश

सुरेश लोखंडे -  ठाणेराज्यातील १२ टोलनाके जूनपासून बंद करण्याचा मुहूर्त शासनाने दीड महिन्यापूर्वी घोषित केला आहे. पण, या यादीत मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एकाही टोलनाक्याचा समावेश नाही. त्यामुळे विरोधीपक्ष असताना टोलला विरोध करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडूनसुद्धा मुंबई-ठाणेकरांच्या तोंडाला पाने पुसल्याचे उघड झाले आहे.रस्त्यावरील खर्चापेक्षा जास्त रकमेची वसुली टोलनाक्यांद्वारे होत असल्याचा आरोप सातत्याने झाला. मुंबईला जाण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी राज्यात सर्वाधिक टोलनाक्यांचा विळखा ठाण्यासह नव्या पालघर जिल्ह्यात सुमारे १६ ठिकाणी आहे. त्यांच्या विरोधात सातत्याने रस्त्यावर उतरणारी शिवसेना-भाजपा आता सत्तेवर असतानाही त्यांच्याकडून या दोन्ही जिल्ह्यांतील एकही टोलनाका बंद करणे शक्य झाले नाही. यामुळे विरोधी पक्षाच्या बाकावर बसून टोल बंद करण्यासाठी केलेली आंदोलने केवळ ‘चिथावणी देणारी’ ठरले आहे. सत्ताधारी शिवसेना-भाजपाच्या आमदारांनी पूर्वी टोलच्या जिझिया कराविरोधात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे कामकाज बंद पाडून सभात्याग केल्याचे अद्याप स्मरणात आहे. जिल्ह्यातील ही टोलधाड नष्ट करण्यासाठी सध्याचे पालकमंत्री व बांधकाममंत्री एकनाथ शिंदे सत्तेत असतानाही अपयशी ठरल्याचे राजकीय धुरीणांकडून ऐकायला मिळत आहे. ठाणे-पालघरच्या १६ टोलनाक्यांपैकी ग्रामीण भागालगतच्या ५ नाक्यांवर कार, जीप व एसटी बसेसचा टोल घेणे बंद करण्याचे घोषित करण्यात आले. मात्र, एकही नाका कायमचा बंद करण्यात न आल्यामुळे नागरिकांच्या पदरी निराशा आली आहे. त्यातच मुंबईत जाण्यासाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून भूमिका बजावत असलेल्या ठाणे शहरालगतचे टोलनाके बंद करण्यात आले नाहीत. बंद केलेले व कार, जीप, बसला सवलत दिलेले टोलनाके सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ आणि एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प आदींच्या नियंत्रणातील आहेत. ठाणे, पालघर जिल्ह्यांत उभ्या करण्यात आलेल्या सुमारे १६ टोलनाक्यांपैकी ५ टोलनाके सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत. ५ टोलनाके महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंळाचे असून, उर्वरित ५ टोलनाके राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियंत्रणातील आहेत. यापैकी बंद केलेल्या नाक्यांमध्ये एकाही खाजगी कंपनीच्या टोलनाक्याचा समावेश नाही.