शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

उत्सवांच्या मनमानीविरुद्ध ठाण्यात मोर्चेबांधणी

By admin | Updated: July 4, 2015 03:19 IST

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्सावातील मनमानीला चाप लावण्यासाठी ठाणे महापालिकेने जोरदार तयारी केली आहे. उत्सवादरम्यान आवाज प्रमाणापेक्षा वाढल्यास

मुंबई : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्सावातील मनमानीला चाप लावण्यासाठी ठाणे महापालिकेने जोरदार तयारी केली आहे. उत्सवादरम्यान आवाज प्रमाणापेक्षा वाढल्यास त्याची तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन नंबर व ई-मेल आयडी तसेच रस्त्यावरील मंडप हटवण्यासाठी धोरण आखले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी तरी ठाण्यात कमी आवाजात उत्सव साजरे होतील, अशी शक्यता आहे. न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर याचे प्रतिज्ञापत्र ठाणे पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सादर केले. आवाजाच्या तक्रारी आल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. या तक्रारींची स्वतंत्र नोंदवही देखील असणार असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र उत्सवांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी खंडपीठाने मार्च महिन्यात दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी कशी करणार? याचे प्रतिज्ञापत्र शुक्रवारीही मुख्य सचिव यांनी सादर केले नाही. अखेर न्यायालयाने यासाठी मुख्य सचिवांना येत्या ९ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी ही शेवटी संधी दिली जात आहे, असेही खंडपीठाने या वेळी स्पष्ट केले. उत्सवांमध्ये आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन केले जाते. रस्त्यावर मंडप उभारले जातात. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे याला निर्बंध घालणारे आदेश न्यायायलाने जारी करावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका ठाण्यातील डॉ. महेश बेडेकर यांनी केली आहे. याची दखल घेत न्यायालयाने मार्च महिन्यात याचे सविस्तर आदेश जारी केले.