शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

ठाणे-डोंबिवली पुन्हा १४ मिनिटांत

By admin | Updated: May 30, 2016 02:17 IST

ठाणे ते डोंबिवली हे अंतर जलद लोकलने कापण्यासाठी सध्या ३० मिनिटे लागत आहेत.

मुंबई : ठाणे ते डोंबिवली हे अंतर जलद लोकलने कापण्यासाठी सध्या ३० मिनिटे लागत आहेत. मात्र पुन्हा हे अंतर १४ मिनिटांतच कापता येणार आहे. परंतु, यासाठी प्रवाशांना एक आठवडा प्रतीक्षा करावी लागणार आहे. पारसिक बोगद्यातील रूळांखालील खडी बदलण्याचे काम एका आठवड्यात पूर्ण होणार आहे. तसेच पारसिक बोगद्यात असलेली ताशी ३० किमीची वेगमर्यादाही शिथिल करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.डीसी-एसी परिवर्तन झाल्यापासून पारसिक बोगद्याजवळ ताशी ३० किमीची वेगमर्यादा लावण्यात आली आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आल्याने पारसिक बोगद्यात रूळांखालील खडी बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जलद लोकलच्या ‘धिम्या’ गतीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. पारसिक बोगद्यात सातत्याने पाणी झिरपत असल्याने रूळाखालील खडी ठिसूळ झाली आहे. खडी रुळांना आधार देण्याचे काम करते. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांना हादरे बसू नयेत, यासाठी मध्य रेल्वेने खडी बदलण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून एका आठवड्यात काम पूर्ण होईल व पुन्हा ठाणे ते डोंबिवली हे अंतर १४ ते १५ मिनिटांत कापणे शक्य होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.