शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सरकारस्थापनेच्या हालचाली; ४४ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा अन् २२ आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांकडे...
2
“सत्यजित तांबेंनी PM मोदींना फोन लावावा अन् एक तासात भेट घेऊन दाखवावी”; काँग्रेसचे आव्हान
3
“युद्धविराम अमेरिकेच्या दबावाखाली का केला? भाजपाला उत्तरे द्यावीच लागतील”: हर्षवर्धन सपकाळ
4
ठाकरे गटाला मोठे खिंडार; नाशिकमधील माजी आमदारांचा उद्धवसेनेला रामराम, शिंदे गटात प्रवेश
5
IPL 2025: जितेश शर्माची मॅचविनिंग खेळी... खास फटकेबाजी करत मोडला धोनी, पोलार्डचा विक्रम
6
डॉ. कलाम यांच्या भूमिकेसाठी धनुषचीच निवड का केली? ओम राऊत म्हणाले, "त्याच्यापेक्षा चांगला..."
7
पुन्हा हाहाकार माजवणार कोरोना? जपानच्या 'बाबा वेंगा'ने केलीय धडकी भरवणारी भविष्यवाणी!
8
IndiGo: नवी मुंबई विमानतळावरून उड्डाण करणारी इंडिगो पहिली विमान कंपनी ठरणार!
9
पत्नी कोमात गेली, डॉक्टर म्हणाले, ती वाचणार नाही; पतीने सोडली नाही आशा, वाचवला जीव
10
'ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने एकदा नव्हे दोन वेळा केला होता कॉल, मृतांचा आकडाही आला समोर
11
काश्मीर, गुजरात, पंजाब, राजस्थान; पाकिस्तानला लागून असलेल्या सीमावर्ती भागात उद्या मॉक ड्रिल
12
किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता ३ लाखांवरून थेट ५ लाखांपर्यंत वाढणार? कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
13
Naresh Mhaske: संजय राऊतांमुळेच आनंद दिघेंवर टाडा लागला, नरेश म्हस्के यांचा खळबळजनक आरोप
14
निस्सान भारत सोडणार? अफवांच्या हिंदोळ्यावर निस्सानने मॅग्नाईट सीएनजी लाँच केली...
15
Mutual Fund असावा तर असा! कोणताही गाजावाजा नाही, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला जबरदस्त रिटर्न
16
नक्षलवाद्यांनी लुटला हजारो किलो स्फोटकांनी भरलेला ट्रक, ओडिशामधील धक्कादायक घटना
17
'मला गोळ्या घाला आणि इथेच जमिनीत पुरा'; शेख हसीना लष्करी अधिकाऱ्याला असं का बोलल्या?
18
"...तर राहुल गांधींना काळं फासू’’, सावरकरांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा
19
'ऑपरेशन सिंदूर आठवडाभर सुरू ठेवलं असतं तर...', बलुचिस्तानच्या नेत्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
20
IPL 2025: BCCI चा दणका! 'शतकवीर' ऋषभ पंतसह LSGच्या सर्व खेळाडूंना लाखोंचा दंड, कारण काय?

ठाणे-डोंबिवली पुन्हा १४ मिनिटांत

By admin | Updated: May 30, 2016 02:17 IST

ठाणे ते डोंबिवली हे अंतर जलद लोकलने कापण्यासाठी सध्या ३० मिनिटे लागत आहेत.

मुंबई : ठाणे ते डोंबिवली हे अंतर जलद लोकलने कापण्यासाठी सध्या ३० मिनिटे लागत आहेत. मात्र पुन्हा हे अंतर १४ मिनिटांतच कापता येणार आहे. परंतु, यासाठी प्रवाशांना एक आठवडा प्रतीक्षा करावी लागणार आहे. पारसिक बोगद्यातील रूळांखालील खडी बदलण्याचे काम एका आठवड्यात पूर्ण होणार आहे. तसेच पारसिक बोगद्यात असलेली ताशी ३० किमीची वेगमर्यादाही शिथिल करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.डीसी-एसी परिवर्तन झाल्यापासून पारसिक बोगद्याजवळ ताशी ३० किमीची वेगमर्यादा लावण्यात आली आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आल्याने पारसिक बोगद्यात रूळांखालील खडी बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जलद लोकलच्या ‘धिम्या’ गतीमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. पारसिक बोगद्यात सातत्याने पाणी झिरपत असल्याने रूळाखालील खडी ठिसूळ झाली आहे. खडी रुळांना आधार देण्याचे काम करते. त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्यांना हादरे बसू नयेत, यासाठी मध्य रेल्वेने खडी बदलण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून एका आठवड्यात काम पूर्ण होईल व पुन्हा ठाणे ते डोंबिवली हे अंतर १४ ते १५ मिनिटांत कापणे शक्य होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.