शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

ठाणे जिल्ह्यात ५२ टक्के मतदान

By admin | Updated: October 16, 2014 05:08 IST

जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ५९ लाख ९० हजार ७६७ मतदारांपैकी ४३.८१ टक्के म्हणजे २६ लाख २४ हजार ५५५ मतदारांनी मतदान केले.

ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ५९ लाख ९० हजार ७६७ मतदारांपैकी ४३.८१ टक्के म्हणजे २६ लाख २४ हजार ५५५ मतदारांनी मतदान केले. परंतु, ६ वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी येण्यास विलंब होणार असल्याने ठाणे जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी सुमारे ५० ते ५२ टक्के सरासरी मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यानुसार, सुमारे ३१ लाख १५ हजार (५२ टक्के) मतदारांनी मतदान करून १८ विधानसभा मतदारसंघांतील २३८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत ‘लॉक’ केले आहे. कोणाला किती मतदान झाले, याची उत्सुकता असली तरी १९ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीपर्यंत सर्वांना त्याची वाट पाहावी लागणार आहे. मतदानाच्या कालावधीतील भिवंडी, शहापूर तालुक्यांतील किरकोळ घटना वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान झाल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला. जिल्ह्यातील सहा हजार १४५ मतदान केंद्रांवर मतदारांनी निर्भय वातावरणात बुधवारी मतदान केले़जिल्ह्यात सकाळी ७पासून सुरू झालेल्या मतदानात दुपारी १ वाजेपर्यंत प्रत्येक फेरीमध्ये दुपटीने वाढ होताना आढळून आली. यानंतर, मात्र ३ वाजेपर्यंतच्या चौथ्या फेरीत केवळ ७ टक्के वाढ होऊन जिल्ह्यात केवळ २८ टक्के मतदान झाले. दोन तासांनंतरच्या ५ वाजेपर्यंतच्या पाचव्या फेरीअखेर जिल्ह्यातील मतदानात १५ टक्के वाढ होऊन जिल्हाभरात ४३.८१ टक्के म्हणजे २६ लाख २४ हजार ५५५ मतदान झाले आहे.जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ५.७८ टक्के मतदान झाले. पहिल्या फेरीच्या या कालावधीत अंबरनाथ मतदारसंघात सर्वाधिक ९.९५ टक्के मतदान झाले असता ऐरोली मतदारसंघात सर्वात कमी ५.६६ टक्के मतदान झाले होते. ११वाजेच्या दुसऱ्या फेरीमध्ये ११ टक्के मतदान झाले असता या कालावधीत भिवंडी पश्चिममध्ये १२.९५ टक्के सर्वात जास्त तर डोंबिवलीत १०.३४ टक्के सर्वात कमी मतदान झाले. याशिवाय, १ वाजेच्या तिसऱ्या फेरीत जिल्ह्यात २१.१९ टक्के मतदान झाले. या दरम्यान ओवळा-माजिवडा या ठिकाणी २५.९४ टक्के मतदान सर्वात जास्त तर ऐरोलीमध्ये २०.२५ टक्के मतदान सर्वात कमी झाले. चौथ्या फेरीअखेर २८.३१ टक्के मतदान झाले असता भिवंडी पूर्व मतदारसंघात सर्वात जास्त ३६.३२ टक्के तर शहापूरमध्ये २६.१५ टक्के सर्वात कमी मतदान झाल्याचे उघड झाले. (प्रतिनिधी)