शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात ५२ टक्के मतदान

By admin | Updated: October 16, 2014 05:08 IST

जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ५९ लाख ९० हजार ७६७ मतदारांपैकी ४३.८१ टक्के म्हणजे २६ लाख २४ हजार ५५५ मतदारांनी मतदान केले.

ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ५९ लाख ९० हजार ७६७ मतदारांपैकी ४३.८१ टक्के म्हणजे २६ लाख २४ हजार ५५५ मतदारांनी मतदान केले. परंतु, ६ वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी येण्यास विलंब होणार असल्याने ठाणे जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी सुमारे ५० ते ५२ टक्के सरासरी मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यानुसार, सुमारे ३१ लाख १५ हजार (५२ टक्के) मतदारांनी मतदान करून १८ विधानसभा मतदारसंघांतील २३८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत ‘लॉक’ केले आहे. कोणाला किती मतदान झाले, याची उत्सुकता असली तरी १९ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीपर्यंत सर्वांना त्याची वाट पाहावी लागणार आहे. मतदानाच्या कालावधीतील भिवंडी, शहापूर तालुक्यांतील किरकोळ घटना वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान झाल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला. जिल्ह्यातील सहा हजार १४५ मतदान केंद्रांवर मतदारांनी निर्भय वातावरणात बुधवारी मतदान केले़जिल्ह्यात सकाळी ७पासून सुरू झालेल्या मतदानात दुपारी १ वाजेपर्यंत प्रत्येक फेरीमध्ये दुपटीने वाढ होताना आढळून आली. यानंतर, मात्र ३ वाजेपर्यंतच्या चौथ्या फेरीत केवळ ७ टक्के वाढ होऊन जिल्ह्यात केवळ २८ टक्के मतदान झाले. दोन तासांनंतरच्या ५ वाजेपर्यंतच्या पाचव्या फेरीअखेर जिल्ह्यातील मतदानात १५ टक्के वाढ होऊन जिल्हाभरात ४३.८१ टक्के म्हणजे २६ लाख २४ हजार ५५५ मतदान झाले आहे.जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ५.७८ टक्के मतदान झाले. पहिल्या फेरीच्या या कालावधीत अंबरनाथ मतदारसंघात सर्वाधिक ९.९५ टक्के मतदान झाले असता ऐरोली मतदारसंघात सर्वात कमी ५.६६ टक्के मतदान झाले होते. ११वाजेच्या दुसऱ्या फेरीमध्ये ११ टक्के मतदान झाले असता या कालावधीत भिवंडी पश्चिममध्ये १२.९५ टक्के सर्वात जास्त तर डोंबिवलीत १०.३४ टक्के सर्वात कमी मतदान झाले. याशिवाय, १ वाजेच्या तिसऱ्या फेरीत जिल्ह्यात २१.१९ टक्के मतदान झाले. या दरम्यान ओवळा-माजिवडा या ठिकाणी २५.९४ टक्के मतदान सर्वात जास्त तर ऐरोलीमध्ये २०.२५ टक्के मतदान सर्वात कमी झाले. चौथ्या फेरीअखेर २८.३१ टक्के मतदान झाले असता भिवंडी पूर्व मतदारसंघात सर्वात जास्त ३६.३२ टक्के तर शहापूरमध्ये २६.१५ टक्के सर्वात कमी मतदान झाल्याचे उघड झाले. (प्रतिनिधी)