शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात ५२ टक्के मतदान

By admin | Updated: October 16, 2014 05:08 IST

जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ५९ लाख ९० हजार ७६७ मतदारांपैकी ४३.८१ टक्के म्हणजे २६ लाख २४ हजार ५५५ मतदारांनी मतदान केले.

ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील ५९ लाख ९० हजार ७६७ मतदारांपैकी ४३.८१ टक्के म्हणजे २६ लाख २४ हजार ५५५ मतदारांनी मतदान केले. परंतु, ६ वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी येण्यास विलंब होणार असल्याने ठाणे जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी सुमारे ५० ते ५२ टक्के सरासरी मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यानुसार, सुमारे ३१ लाख १५ हजार (५२ टक्के) मतदारांनी मतदान करून १८ विधानसभा मतदारसंघांतील २३८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत ‘लॉक’ केले आहे. कोणाला किती मतदान झाले, याची उत्सुकता असली तरी १९ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीपर्यंत सर्वांना त्याची वाट पाहावी लागणार आहे. मतदानाच्या कालावधीतील भिवंडी, शहापूर तालुक्यांतील किरकोळ घटना वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान झाल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला. जिल्ह्यातील सहा हजार १४५ मतदान केंद्रांवर मतदारांनी निर्भय वातावरणात बुधवारी मतदान केले़जिल्ह्यात सकाळी ७पासून सुरू झालेल्या मतदानात दुपारी १ वाजेपर्यंत प्रत्येक फेरीमध्ये दुपटीने वाढ होताना आढळून आली. यानंतर, मात्र ३ वाजेपर्यंतच्या चौथ्या फेरीत केवळ ७ टक्के वाढ होऊन जिल्ह्यात केवळ २८ टक्के मतदान झाले. दोन तासांनंतरच्या ५ वाजेपर्यंतच्या पाचव्या फेरीअखेर जिल्ह्यातील मतदानात १५ टक्के वाढ होऊन जिल्हाभरात ४३.८१ टक्के म्हणजे २६ लाख २४ हजार ५५५ मतदान झाले आहे.जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ५.७८ टक्के मतदान झाले. पहिल्या फेरीच्या या कालावधीत अंबरनाथ मतदारसंघात सर्वाधिक ९.९५ टक्के मतदान झाले असता ऐरोली मतदारसंघात सर्वात कमी ५.६६ टक्के मतदान झाले होते. ११वाजेच्या दुसऱ्या फेरीमध्ये ११ टक्के मतदान झाले असता या कालावधीत भिवंडी पश्चिममध्ये १२.९५ टक्के सर्वात जास्त तर डोंबिवलीत १०.३४ टक्के सर्वात कमी मतदान झाले. याशिवाय, १ वाजेच्या तिसऱ्या फेरीत जिल्ह्यात २१.१९ टक्के मतदान झाले. या दरम्यान ओवळा-माजिवडा या ठिकाणी २५.९४ टक्के मतदान सर्वात जास्त तर ऐरोलीमध्ये २०.२५ टक्के मतदान सर्वात कमी झाले. चौथ्या फेरीअखेर २८.३१ टक्के मतदान झाले असता भिवंडी पूर्व मतदारसंघात सर्वात जास्त ३६.३२ टक्के तर शहापूरमध्ये २६.१५ टक्के सर्वात कमी मतदान झाल्याचे उघड झाले. (प्रतिनिधी)