शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

ठाणो जिल्हा विभाजन 15 ऑगस्टला

By admin | Updated: June 7, 2014 00:55 IST

येत्या 15 ऑगस्टर्पयत ठाणो जिल्ह्याच्या विभाजनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेत दिले.

महसूल मंत्री  : ‘तारीख पे तारीख’मुळे विरोधक झाले आक्रमक
मुंबई : येत्या 15 ऑगस्टर्पयत ठाणो जिल्ह्याच्या विभाजनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी  विधान परिषदेत दिले. मात्र, ठाण्याच्या विभाजनासाठी गेल्या सहा वर्षापासून सरकार केवळ तारखा देत ठाणोकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे, असा आरोप करत सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्यांना धारेवर धरले.
ठाणो जिल्ह्याच्या विभाजनाबाबतचा तारांकीत प्रश्न काँग्रेसचे संजय दत्त यांनी उपस्थित केला. गेली सहा वर्षे प्रत्येक अधिवेशनात हा मुद्दा आला आणि प्रत्येक वेळी महसूल मंत्र्यांनी सारखेच उत्तर दिले. सहा वर्षे एकच उत्तर दिल्याबद्दल सरकारचे कौतुक करायला हवे, असा टोला दत्त यांनी लगावला. या वेळी झालेल्या चर्चेत विनोद तावडे, नरेंद्र पाटील, पांडुरंग फुंडकर, जयंत पाटील, भाई गिरकर, निरंजन डावखरे आदी सदस्यांनी भाग घेतला. ग्रामीण आणि आदिवासी विभागातील समस्या सेाडविण्यासाठी ठाणो जिल्ह्याचे विभाजन आवश्यक आहे. सात महापालिका, नागरी शहरी भाग, अत्यंत दुर्गम आदिवासी व ग्रामीण भागाचा समावेश असणा:या ठाणो जिल्ह्याचे तातडीने विभाजन व्हायला हवे, अशी मागणी सदस्यांनी लावून धरली.
 
दोनच वर्षापूर्वी येथे जि.प.च्या निवडणुका झाल्या आहेत. विभाजन झाल्यास पुन्हा निवडणुका होणार यामुळे काहींचा विरोध आहे. मात्र, येत्या 15 ऑगस्टर्पयत तसा प्रय} सरकार करेल, असे थोरात म्हणाले. विभाजनाचा मुद्दा निकालात काढण्याठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि संबंधित आमदारांची एकत्र बैठक आपल्या दालनात बोलावण्याची घोषणा सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केली.  
 
सातबाराच्या नोंदी कमी करण्यासाठी 
कालबद्ध कार्यक्रम - थोरात
1शासकीय कामासाठी संपादित केलेल्या जमिनींच्या नोंदी सातबाराच्या उता:यावरून कमी करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधान 
परिषदेत दिली. 
2रस्ते, सिंचन प्रकल्प, कालवे आदी कारणांसाठी बीड जिल्ह्यातील शेत जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, सातबाराच्या उता:यावरून या जमिनींची नोंद कमी करण्यात आली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात अल्पभूधारक असणारा शेतकरी कागदोपत्री बहुभूधारक दिसतो आणि सवलतींपासून वंचित राहत असल्याने संपादित जमिनी वगळण्याची मागणी राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली. 
3याला उत्तर देताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत 3 हजार 732 प्रकरणांपैकी 3 हजार 18 प्रकरणो निकालात काढली. उर्वरित 714 प्रकरणो निकाली काढण्यात येतील. यासोबतच राज्यातील 51 हजार प्रकरणो निकालात काढली आहेत.
 
 च्राज्यात गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे विदर्भ, खान्देश आणि मराठवाडय़ातील शेतक:यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या. या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मोबदला मिळत नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. 
च्त्यावर उत्तर देताना मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम म्हणाले की, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तत्काळ मदत देण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिका:यांना देण्यात आले आहेत. 
च्भरपाईसाठी शेतक:यांकडे लाच मागितली जात आहे.  जिल्हाधिकारीही आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करीत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. यानंतर सभापतींनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना 15 दिवसांत मदत करण्याचे निर्देश दिले.  
 
च्राज्यात गारपिटीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांना येत्या 15 दिवसांत मदत पोहोचविण्यात यावी, असे निर्देश विधान परिषदेतील सभापती शिवाजीराव देशमुख यांनी आज दिले.
 
आदिवासी विभागातील साहित्य खरेदीची सीआयडी चौकशी 
 आदिवासी शाळा आणि विभागांसाठी साहित्य खरेदीतील कोटय़वधींच्या भ्रष्टाचाराची सीआयडी चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी आज दिले.
शिवसेनेचे सदस्य डॉ. दीपक सावंत यांनी आदिवासी विभागात स्वेटर, चिक्की आणि नाईट गाऊन खरेदीतील चौकशीचा तारांकीत प्रश्न उपस्थित केला. दरवर्षी साहित्य खरेदीमध्ये भ्रष्टाचार होतो तरीही त्याच लोकांना कंत्रटे दिली जातात. ई-टेंडरिंगची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही. साहित्य खरेदीतील भ्रष्टाचाराची सीआयडीमार्फत चौकशीची करण्याची मागणी सावंत यांनी केली.