शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

ठाणो जिल्हा विभाजन 15 ऑगस्टला

By admin | Updated: June 7, 2014 00:55 IST

येत्या 15 ऑगस्टर्पयत ठाणो जिल्ह्याच्या विभाजनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेत दिले.

महसूल मंत्री  : ‘तारीख पे तारीख’मुळे विरोधक झाले आक्रमक
मुंबई : येत्या 15 ऑगस्टर्पयत ठाणो जिल्ह्याच्या विभाजनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी  विधान परिषदेत दिले. मात्र, ठाण्याच्या विभाजनासाठी गेल्या सहा वर्षापासून सरकार केवळ तारखा देत ठाणोकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे, असा आरोप करत सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांनी त्यांना धारेवर धरले.
ठाणो जिल्ह्याच्या विभाजनाबाबतचा तारांकीत प्रश्न काँग्रेसचे संजय दत्त यांनी उपस्थित केला. गेली सहा वर्षे प्रत्येक अधिवेशनात हा मुद्दा आला आणि प्रत्येक वेळी महसूल मंत्र्यांनी सारखेच उत्तर दिले. सहा वर्षे एकच उत्तर दिल्याबद्दल सरकारचे कौतुक करायला हवे, असा टोला दत्त यांनी लगावला. या वेळी झालेल्या चर्चेत विनोद तावडे, नरेंद्र पाटील, पांडुरंग फुंडकर, जयंत पाटील, भाई गिरकर, निरंजन डावखरे आदी सदस्यांनी भाग घेतला. ग्रामीण आणि आदिवासी विभागातील समस्या सेाडविण्यासाठी ठाणो जिल्ह्याचे विभाजन आवश्यक आहे. सात महापालिका, नागरी शहरी भाग, अत्यंत दुर्गम आदिवासी व ग्रामीण भागाचा समावेश असणा:या ठाणो जिल्ह्याचे तातडीने विभाजन व्हायला हवे, अशी मागणी सदस्यांनी लावून धरली.
 
दोनच वर्षापूर्वी येथे जि.प.च्या निवडणुका झाल्या आहेत. विभाजन झाल्यास पुन्हा निवडणुका होणार यामुळे काहींचा विरोध आहे. मात्र, येत्या 15 ऑगस्टर्पयत तसा प्रय} सरकार करेल, असे थोरात म्हणाले. विभाजनाचा मुद्दा निकालात काढण्याठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि संबंधित आमदारांची एकत्र बैठक आपल्या दालनात बोलावण्याची घोषणा सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केली.  
 
सातबाराच्या नोंदी कमी करण्यासाठी 
कालबद्ध कार्यक्रम - थोरात
1शासकीय कामासाठी संपादित केलेल्या जमिनींच्या नोंदी सातबाराच्या उता:यावरून कमी करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधान 
परिषदेत दिली. 
2रस्ते, सिंचन प्रकल्प, कालवे आदी कारणांसाठी बीड जिल्ह्यातील शेत जमिनी संपादित करण्यात आल्या. मात्र, सातबाराच्या उता:यावरून या जमिनींची नोंद कमी करण्यात आली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात अल्पभूधारक असणारा शेतकरी कागदोपत्री बहुभूधारक दिसतो आणि सवलतींपासून वंचित राहत असल्याने संपादित जमिनी वगळण्याची मागणी राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांनी प्रश्नोत्तराच्या तासात केली. 
3याला उत्तर देताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत 3 हजार 732 प्रकरणांपैकी 3 हजार 18 प्रकरणो निकालात काढली. उर्वरित 714 प्रकरणो निकाली काढण्यात येतील. यासोबतच राज्यातील 51 हजार प्रकरणो निकालात काढली आहेत.
 
 च्राज्यात गेल्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे विदर्भ, खान्देश आणि मराठवाडय़ातील शेतक:यांच्या आत्महत्येच्या घटना घडल्या. या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मोबदला मिळत नसल्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. 
च्त्यावर उत्तर देताना मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम म्हणाले की, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तत्काळ मदत देण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिका:यांना देण्यात आले आहेत. 
च्भरपाईसाठी शेतक:यांकडे लाच मागितली जात आहे.  जिल्हाधिकारीही आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करीत नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. यानंतर सभापतींनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना 15 दिवसांत मदत करण्याचे निर्देश दिले.  
 
च्राज्यात गारपिटीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांना येत्या 15 दिवसांत मदत पोहोचविण्यात यावी, असे निर्देश विधान परिषदेतील सभापती शिवाजीराव देशमुख यांनी आज दिले.
 
आदिवासी विभागातील साहित्य खरेदीची सीआयडी चौकशी 
 आदिवासी शाळा आणि विभागांसाठी साहित्य खरेदीतील कोटय़वधींच्या भ्रष्टाचाराची सीआयडी चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी आज दिले.
शिवसेनेचे सदस्य डॉ. दीपक सावंत यांनी आदिवासी विभागात स्वेटर, चिक्की आणि नाईट गाऊन खरेदीतील चौकशीचा तारांकीत प्रश्न उपस्थित केला. दरवर्षी साहित्य खरेदीमध्ये भ्रष्टाचार होतो तरीही त्याच लोकांना कंत्रटे दिली जातात. ई-टेंडरिंगची माहिती विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही. साहित्य खरेदीतील भ्रष्टाचाराची सीआयडीमार्फत चौकशीची करण्याची मागणी सावंत यांनी केली.