शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी बंद, सरनाईकांचा स्तुत्य निर्णय

By admin | Updated: August 11, 2014 14:56 IST

ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानने दहीहंडी बंद करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला असून याऐवजी अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करु अशी घोषणा संस्कृती प्रतिष्ठानचे प्रमुख आ. प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

ऑनलाइन टीम

ठाणे, दि. ११ - मुंबई, ठाण्यासह राज्यभरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली ठाण्यातील दंहीहंडीतील इव्हेंट 'संस्कृती' बंद होणार आहे. ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानने दहीहंडीतील थरांसाठी लाखोंची बक्षिस देण्याची प्रथा बंद करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला असून याऐवजी अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा करु अशी घोषणा संस्कृती प्रतिष्ठानचे प्रमुख आ. प्रताप सरनाईक यांनी केली आहे. 

गेल्या काही वर्षांत दहीहंडीत लाखोंच्या बक्षिसाची उधळण होत असल्याने या उत्सवाचे रुपच बदलले आहे. गोविंदा पथकं या पारितोषिकांपायी थरांचा विक्रम करण्यासाठी झटतात. पण या नादात अनेक गोविंदा जखमी होतात. काही वेळेला ही स्पर्धा गोविंदा पथकातील तरुणांच्या जीवावरही बेतते. यंदा बाल हक्क संरक्षण आयोगाने १२ वर्षांखालील मुलांना दहीहंडीवर चढविण्यास बंदी घातली आहे. याला गोविंदा पथकांनी विरोध दर्शवला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानने यंदापासून दहीहंडीचा मेगा इव्हेंट न करता साधेपणाने हा उत्सव साजरा करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. 

संस्कृती प्रतिष्ठानचे प्रमुख आ. प्रताप सरनाईक म्हणाले, जोगेश्वरी, नवी मुंबई येथे सरावा दरम्यान गोविंदांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने आता आयोजकांनीच या थरांच्या स्पर्धेवर निर्णय घेण्याची गरज होती. त्यामुळेच आम्ही थरांची स्पर्धा न करता साधेपणाने दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. यंदा आम्ही थरांसाठी लाखो रुपयांचे बक्षिसे देणार नसून याऐवजी आम्ही गोविंदा पथकांसाठी सराव शिबीर आयोजित करु. यात गोविंदा पथकांना एक प्रमाणपत्र आणि सेफ्टी किट भेट म्हणून देणार आहोत असे सरनाईक यांनी सांगितले. अपहरणाच्या भितीने रिक्षेतून उडी मारणा-या स्वप्नाली लाडचा उपचाराचा सर्व खर्च संस्कृती प्रतिष्ठान करणार असल्याचे सरनाईक म्हणाले.  राज्य सरकारने दहीहंडीचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश केल्यास या खेळात नियमावली तयारी होईल व गोविंदा पथकांमधील जीवघेण्या स्पर्धेवर अंकूश बसेल. मात्र दुर्दैवाने राज्य सरकारने याविषयी अद्याप निर्णय घेतलेला नाही अशी टीकाही त्यांनी केली.