शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठाण्यातील बार आणखी २० दिवस राहणार बंद

By admin | Updated: April 3, 2017 04:20 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगतच्या बारना सील ठोकण्याचे काम सुरू झाल्याने त्याविरोधात ठाण्यातील बारनी दारूविक्री बंद केली.

ठाणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगतच्या बारना सील ठोकण्याचे काम सुरू झाल्याने त्याविरोधात ठाण्यातील बारनी दारूविक्री बंद केली. काही बारही बंद ठेवले आहेत. ते आम्ही अजून २० दिवस बंद ठेवू शकतो, असे हॉटेल आणि बार ओनर असोसिएशनने स्पष्ट केले आहे.यातून मार्ग काढण्यासाठी असोसिएशन लोकप्रतिनिधींपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांना भेटणार आहे. मध्य प्रदेश आणि राज्यस्थान सरकारने ज्या पद्धतीने अनेक राज्य महामार्गांचा दर्जा काढून घेतला, तसा मार्ग महाराष्ट्र सरकारनेही काढावा आणि हॉटेल व्यवसाय वाचवण्याची मागणी करणार असल्याचे असोसिएशन उपाध्यक्ष कुशल भंडारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यामुळे अवैध दारू विक्रीची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.सरकारने दिलेल्या परवान्याप्रमाणे ही हॉटेल सुरु होती. कर्ज काढून अनेकांनी हॉटेल सुरू केली. बहुतांश हॉटेल दारूविक्रीवर अवलंबून आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधांमुळे ग्राहकांची संख्याही कमी होणार आहे. याचा परिणाम आमच्यावर होईल. हॉटेलसाठी भाजी पुरवणाऱ्यांवर होईल. हॉटेलमध्ये काम करणाऱ्यांचे पगार, लाईट बिल, कर कसे भरणार असेही प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वेळीच यावर तोडगा काढला नाही, तर या व्यवसायाशी जोडलेले सर्वजण देशोधडीला लागतील, अशी भीती त्यांनी वर्तवली. बंदीची झळ जास्तीत जास्त आणखी १० ते २० दिवस सहन करण्याची क्षमता या व्यावसायिकांची आहे. त्यामुळे हा व्यवसाय वाचविण्याची जबाबदारी शासनाची आहे. यासाठी लवकरच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)