शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

ठामपाच्या स्थायीत खडाजंगी

By admin | Updated: August 4, 2016 02:47 IST

शहरात रविवारी झालेल्या पावसामुळे घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते

ठाणे : शहरात रविवारी झालेल्या पावसामुळे घोडबंदर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. बांधकाम व्यावसायिकांनी तेथील पाण्याचे नैसर्गिक प्रवाह बुजवल्याने ही परिस्थिती उद्भवली, असा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी सदस्यांनी केला. परंतु, पालिकेने याचे खापर एमएसआरडीसीवर तर एमएसआरडीसीने पालिकेवर फोडले. मात्र, या यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावाचा फटका येथील रहिवाशांना बसत आहे. त्यामुळे यासंदर्भात काय उपाययोजना करणार, हे एमएसआरडीसीने लेखी स्वरूपात पालिकेला न सांगितल्यास टोल बंद केला जाईल, असा इशारा स्थायी समिती सदस्यांनी दिला. त्यावर, पाण्याचे प्रवाह बुजवणाऱ्यांवर कारवाईचे आदेश स्थायी समिती सभापती संजय वाघुले यांनी दिले. मुसळधार पावसामुळे रविवारी हिरानंदानी इस्टेट व आनंदनगर परिसरात पाण्याचे तळे साचले होते, असा मुद्दा काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक मनोज शिंदे यांनी उपस्थित केला. पालिका प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही, असा आरोप त्यांनी केला. या सर्व प्रकाराबद्दल प्रशासनाने खुलासा करावा, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यानंतर, उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी पाणी साचल्याची वस्तुस्थिती मान्य करताना पालिका प्रशासनानेही चोख भूमिका बजावल्याचे स्पष्ट केले. घोडबंदर रोड तयार करताना बांधलेले कलव्हर्ट हे लहान असल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली. यासंदर्भात २०१२ मध्ये एमएसआरडीसीला पत्रही दिले आहे, असे बुरपुल्ले यांनी स्पष्ट केले. एमएसआरडीसीने ‘आयआरबी’ कंपनीला घोडबंदर रोडचे काम दिले होते. कंपनीने काम करताना या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या होत्या, असा मुद्दा नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला. याचा त्रास मात्र नागरिकांना झाला आहे. त्यामुळे काय उपाययोजना करणार आहे, हे एमएसआरडीसीने महिनाभरात लेखी स्वरूपात महापालिकेला न कळवल्यास टोल बंद करण्याचा निर्णय घ्यावा, अशी सूचना मुल्ला यांनी केली. यासंदर्भात पालकमंत्र्यांना पत्र देण्याची मागणी करून तशा प्रकारचा ठराव बैठकीत करण्यात आला. दुसरीकडे एमएसआरडीसीने पालिका प्रशासनाचे मुद्दे खोदून काढले आहेत. २००७ मध्ये घोडबंदर रोड बांधल्यानंतर एवढ्या वर्षात कधीच पाणी साचले नाही. पालिकेने सर्व्हिस रोडचे काम करताना मोठे कलव्हर्ट बांधले आहेत. त्यामुळे योग्य समन्वय झाला नाही. महापालिकेने पत्र दिल्यानंतर या कामासाठी निधीची तरतूद करावी लागेल, असे कळवले होते. त्यामुळे महापालिकेने हे काम केले तरी चालेल, असे लेखी उत्तर पालिकेच्या पत्राला दिले होते. मात्र, त्यांच्याकडून त्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही, असे एमएसआरडीसीच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, सहा महिन्यांत कोणतेही काम करणे शक्य नाही, असे एमएसआरडीसीने स्पष्ट केल्याने हा वाद चिघळण्याची चिन्हे आहेत. >निधी मिळाल्यास काम : एमएसआरडीसीभिवंडीफाटा ते घोडबंदर जंक्शनपर्यंत ३२ कलव्हर्ट आहेत. त्यातील १६ ते १७ कलव्हर्टचे रिमॉडेलिंग करण्यात आले आहे. उर्वरित कलव्हर्टचे रिमॉडेलिंग करण्याचे प्रस्तावित आहे. निधी उपलब्ध झाल्यास ते केले जाईल, अशी माहिती एमएसआरडीसीने दिली. भरतीच्या वेळी खाडीचे पाणी खाडीजवळील नाल्यामध्ये घुसू नये तसेच नाल्यातील पाणी खाडीमध्ये जाण्यासाठी शहरात १० ठिकाणी टायडल गेट बांधण्याचे प्रस्तावित होते. मात्र, हे कामही रखडले आहे, असा मुद्दा नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला.टायडल गेटबरोबर पम्पिंग स्टेशनही बांधणे गरजेचे आहे. यासाठी निधीची तरतूद केली नव्हती, असे प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतर हे काम करावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आली.