शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

खंडपीठासाठी शिवसैनिकांचे ठाकरेंना साकडे

By admin | Updated: February 7, 2015 00:10 IST

या पाच जिल्ह्यांतील जवळपास ७० हजार केसेसे उच्च न्यायालयात प्रलंबित असून, वकील व पक्षकार यांचा विचार करता जवळपास दीड कोटी जनतेचा प्रश्न आहे.

सातारा : ‘सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ लवकरच होईल. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे,’ अशी माहिती शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी दिली.कोल्हापूर खंडपीठ कृती समितीच्या सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांच्या बार असोसिएशनच्या सर्व अध्यक्ष व कृती समितीच्या सदस्यांनी शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज(शुक्रवारी) भेट घेऊन कोल्हापूर खंडपीठासाठी मागणी करून चर्चा केली.या पाच जिल्ह्यांतील जवळपास ७० हजार केसेसे उच्च न्यायालयात प्रलंबित असून, वकील व पक्षकार यांचा विचार करता जवळपास दीड कोटी जनतेचा प्रश्न आहे. प्रत्येकाला मुंबई येथील हायकोर्टात यावे लागते. त्यामुळे जनतेचा पैसा, वेळ वाया जात असून, त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे अत्यंत आवश्यक आहे, असे कृती समितीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले. यावेळी शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, सातारा जिल्हाप्रमुख हर्षल कदम, जिल्हा उपप्रमुख अजिंक्य पाटील, तालुकाप्रमुख अनिल शेटे यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. कोल्हापूर खंडपीठ मागणी कृती समितीचे अध्यक्ष विवेक घाडगे, सांगली बार असोसिएशन महेश जाधव, ईश्वरपूरचे अ‍ॅड. फिरोज मगदूम, प्रमोद भोकरे, उमेश माणकापुरे, दीपक शिंदे, शिवसेनेचे कायदेशीर सल्लागार संजय इंजे, अभिजित गार्डे, राजू चौगुले, अमोल चिमण्णा, भालचंद्र मोकाशी, संतोष पाटील, सागर मलगुंडे तसेच सर्व शिवसैनिक पदाधिकारी व वकीलही हजर होते. (प्रतिनिधी)