शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

महाराष्ट्राला ठेंगा, बिहारला देणार भरभरून!

By admin | Updated: September 28, 2015 02:23 IST

एकीकडे केंद्राच्या तिजोरीत पैसा नसल्याने महाराष्ट्रात पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे (पीएमजीएसवाय) काम पूर्णपणे ठप्प झाले असताना मोदी सरकारने विधानसभा निवडणुकांवर नजर ठेवून बिहारला

प्रमोद गवळी, नवी दिल्लीएकीकडे केंद्राच्या तिजोरीत पैसा नसल्याने महाराष्ट्रात पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे (पीएमजीएसवाय) काम पूर्णपणे ठप्प झाले असताना मोदी सरकारने विधानसभा निवडणुकांवर नजर ठेवून बिहारला याच योजनेंतर्गत २२८१ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशात वाटप करण्यात आलेला हा सर्वाधिक निधी असून यावरून केंद्राचा हेतू स्पष्ट होतो.महाराष्ट्राला या योजनेसाठी केंद्राकडून यावर्षी फक्त ३६६ कोटी रुपये मिळणार आहेत. आश्चर्य हे की, गेल्या तीन आर्थिक वर्षांदरम्यान विविध ठेकेदारांनी केलेल्या २१०० कोटी रुपयांच्या कामाचा मोबदला देण्याच्या दृष्टीने कुठलेही गांभीर्य दिसत नाही. भरीसभर म्हणजे राज्य सरकारनेही सर्व कामांची नोंद केलेली नाही. केवळ ६०० कोटी रुपयांच्या पावत्यांची यादी तयार केली आहे. अर्थात ठेकेदारांचे फक्त ६०० कोटी रुपये देणे असल्याचे सरकारला दाखवायचे आहे. आता आणखी नाही...दरम्यान पीएमजीएसवाय अंतर्गत काम करणारे अकोल्याचे ठेकेदार सुमित कोठारी, नागपूरचे अश्विन मेहता आणि जळगाव जिल्ह्यातील संजय पाटील यांनी सांगितले की, गेल्या दीड वर्षात आमचे शेकडो कोटी रुपये अडकले आहेत. विशेष म्हणजे पहिले पैसे मग काम, असा या योजनेचा नियम आहे. असे असतानाही आमचे १५०० कोटी रुपयांचे बिल बाकी आहे. या योजनेंतर्गत बिलाची रक्कम मिळण्यास यापूर्वी कधीही अडचण आली नव्हती. त्यामुळे आम्ही कामे पूर्ण केली. परंतु नवे सरकार आल्यापासून आमच्या समस्या वाढल्या आहेत. काम मध्येच बंद केले तर नियमानुसार आमच्यावर एकूण खर्चाच्या १० टक्के दंड आकारण्यात येतो. त्यामुळे कुणी काम थांबविले नव्हते. पण आता शक्य नाही.