शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

दुष्काळ मदतनिधीकडे साखर कारखान्यांची पाठ

By admin | Updated: May 3, 2016 02:18 IST

दुष्काळ मतदनिधी म्हणून राज्यातील साखर कारखान्यांनी प्रत्येकी १० लाखांचा निधी द्यावा, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनाला कारखान्यांकडून थंड प्रतिसाद

पुणे : दुष्काळ मतदनिधी म्हणून राज्यातील साखर कारखान्यांनी प्रत्येकी १० लाखांचा निधी द्यावा, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आवाहनाला कारखान्यांकडून थंड प्रतिसाद मिळाल्याचे उघड झाले आहे. ११ दिवस उलटून गेल्यानंतर १७७ पैकी केवळ ६ कारखान्यांनीच प्रत्यक्षात मदत दिली आहे.वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये २१ एप्रिल रोजी पार पडलेल्या सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे अध्यक्ष व संचालकांच्या बैठकीत पवार यांनी हे आवाहन केले होते. परंतु बारामती अ‍ॅग्रो साखर, शिरूरमधील व्यंकटेश कृपा, कागलमधील छत्रपती शाहू, पुण्यातील दौंड शुगर, कोल्हापूरमधील दत्त शिरोळ आणि दूधगंगा-वैधगंगा या सहा कारखान्यांनी साखर आयुक्त कार्यालयात मदतीचे धनादेश जमा केले आहेत.कारखान्यांनी १० लाखांची मदत केल्यानंतर लेखा परीक्षण करताना त्यावर आक्षेप घेऊ नयेत, म्हणून राज्य शासनाने तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह कारखान्यांच्या प्रतिनिधींनी केली होती. त्यावर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने परिपत्रक काढण्याचे जाहीर केले होते. (प्रतिनिधी)