शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

अधिका-यांनी फिरवली मंत्र्यांकडे पाठ!

By admin | Updated: April 6, 2015 23:22 IST

आयएएस अधिकारीच जर मंत्र्यांकडे पाठ फिरवत असतील तर बाकी अधिकाऱ्यांना आम्ही कोणत्या अधिकारात बोलायचे, सभागृह चालू असताना देखील

अतुल कुलकर्णी, मुंबईआयएएस अधिकारीच जर मंत्र्यांकडे पाठ फिरवत असतील तर बाकी अधिकाऱ्यांना आम्ही कोणत्या अधिकारात बोलायचे, सभागृह चालू असताना देखील अधिकाऱ्यांच्या गॅलऱ्या रिकाम्या असतात यावरुन सध्या वरिष्ठ मंत्र्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव सतीश गवई एकही दिवस मंत्र्यांना भेटायला गेले नाहीत की त्यांच्या विभागाचे ब्रिफींगही त्यांनी केलेले नाही. अधिवेशन चालू असताना अनेक विभागांचे अधिकारी त्यांच्या विभागाचे विषय आले तरीही अधिकाऱ्यांसाठीच्या गॅलरीत येऊन बसत नाहीत. यावर दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात जाहीरपणे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अर्थसंकल्पाच्या निमित्ताने विभागवार चर्चा होतात तेव्हा संपूर्ण राज्याचे चित्र आमदारांच्या बोलण्यातून उभे रहाते. त्याकडेच अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली तर राज्याच्या भावना त्यांना कळणार कशा? असेही वळसे म्हणाले होते.याबाबत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, याबाबत आपण मुख्य सचिवांना याआधीच पत्र दिले होते. मात्र ही बाब सरकार गांभीर्याने घेईल. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी गवई आणि झेंडे यांच्यावरुन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गवई यांच्या कारभाराचे पुरावे तुम्हाला देतो,असेही मेहता यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे समजते. तर विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे नातेवाईक असल्यामुळे झेंडे यांची बदली म्हाडा चे उपाध्यक्ष म्हणून करण्यात आल्याचे राष्ट्रवादीतील काही नेत्यांचे म्हणणे आहे. शालेय शिक्षण विभागाचे सचिव म्हणून देबाशिष चक्रवर्ती यांची नेमणूक करण्यात आली होती; मात्र त्यांनी या पदावर जाण्यास नकार दिल्याने आता तेथे नंदकुमार यांची नेमणूक करण्यात आली आहे.