शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची कसोटी

By admin | Updated: April 29, 2016 03:53 IST

पावसाची तडाखेबाज सुरुवात ही समस्त शेतकरी व नागरिकांसाठी सुखावह बाब आहे.

पेण : पावसाची तडाखेबाज सुरुवात ही समस्त शेतकरी व नागरिकांसाठी सुखावह बाब आहे. रायगड जिल्ह्यात समुद्र खाडी नदीकिनारी असलेली ३५५ गावे व डोंगर पायथ्याशी असलेली ८४ गावांमध्ये पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीजन्य परिस्थिती नेहमीच उद्भवते. येणाऱ्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने काळजीपूर्वक नियोजन करणे गरजेचे आहे. यंदा तुलनेने जास्त पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात राज्य आपत्ती प्राधिकरणाची बैठक संपन्न झाली. नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका मान्सून हंगामात कोकणाच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना बसतो. यासाठी शेतकरीवर्ग व नागरिक यांना हवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी कर्नाटक राज्याच्या धर्तीवर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा सरकारचा मानस आहे असे मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत स्पष्ट केले ही स्वागतार्ह बाब आहे. याचबरोबर महाराष्ट्र आपत्ती धोके, व्यवस्थापन कार्यक्रमास मुदतवाढ या यंत्रणेसाठी कायमस्वरुपी पद निर्मिती करणे, आपदग्रस्तांना किमान सहाय्यताबाबत राष्ट्रीय स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे निकष, महाराष्ट्र शालेय सुरक्षा कार्यक्रम राबविणे, अद्ययावत राज्य आपत्कालीन केंद्र आणि जिल्हा आपत्कालीन केंद्र उभारणी, शोध, बचावकार्य, साहित्य खरेदीस मान्यता आणि इतर शासकीय यंत्रणांच्या सहभागाबरोबरच आता नव्याने शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे धडे या बाबीवर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.रायगडात अतिवृष्टी झाल्यास अंबा, सावित्री, काळ, वशिष्टी पाताळगंगा, बाळगंगा, भोगावती, कुंडलिका, मांडला, कासाड, गाढी उसर्ली, उल्हास, बाजापूर आदी नदी तटावरच्या गावांना धोका संभवतो. या नदीप्रवण क्षेत्रात पूरप्रवण रेषेत ८४ गावांचा समावेश आहे. तर समुद्रतटीय खाडीकिनारी असलेल्या ७० गावांना समुद्राच्या मोठ्या उधाणभरतीचा धोका संभवतो. उधाण भरतीला, अतिवृष्टीची जोड मिळाल्यास या गावांचा संपर्क तुटतो.राज्य आपत्ती प्राधिकरणाच्या बैठकीचे सूप वाजताच आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना तसे आदेश पारित होण्याची शक्यता असून त्यानुसार व्यवस्थापन करण्यात येणार आहे. (वार्ताहर)