शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

दहशतवादी सलिक होता नागपूर ‘एटीएस’ ला वॉन्टेड!

By admin | Updated: November 1, 2016 02:42 IST

औरंगाबाद येथे २०१२ ला झालेल्या चकमकीत अकिल खिलजी जखमी अवस्थेत पोलिसांच्या हाती लागला

नरेश डोंगरे,

नागपूर- भोपाळनजीक पोलिसांनी सोमवारी पहाटे कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांपैकी तिघांचे महाराष्ट्रात खास करून विदर्भ-मराठवाड्यातील नागपूर, सोलापूर आणि औरंगाबादमध्ये जबरदस्त नेटवर्क होते. औरंगाबाद येथे २०१२ ला झालेल्या चकमकीत अकिल खिलजी जखमी अवस्थेत पोलिसांच्या हाती लागला होता. तर, या चकमकीनंतर पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेला मोहम्मद सलिख हा दहशतवादी नागपूर-औरंगाबाद एटीएसला ‘वॉन्टेड’ होता. गेल्या चार वर्षांपासून सलिखचा ताबा मिळावा म्हणून राज्याचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) प्रयत्नरत होते. भोपाळ जेल ब्रेक आणि एन्काऊंटरनंतर ही खळबळजनक बाब उजेडात आली आहे. भोपाळमध्ये जेल ब्रेक झाल्याचे वृत्त सोमवारी पहाटे ४.३० च्या सुमारास स्थानिक सुरक्षा यंत्रणांना कळले. त्यानंतर मोहम्मद खालिद अहमद, शेख मुजीब, मजीद, अकील खिलजी, जाकीर, महबूब, अमजद आणि सलिख या दहशतवाद्यांच्या शोधार्थ एटीएस आणि पोलीस रेल्वेस्थानक तसेच नागपूर शहराला जोडणाऱ्या मध्य प्रदेशच्या सर्व मार्गावर शोधकार्य राबवू लागले. काही वेळेनंतर या सर्व दहशतवाद्यांचे एन्काऊंटर झाल्याचे कळाल्याने सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र, मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावे पुढे येताच सुरक्षा यंत्रणांमध्ये पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली. कारण या आठ दहशतवाद्यांपैकी तिघे प्रत्यक्ष महाराष्ट्रातील घातपाती कृत्य तसेच घातपाताच्या कटकारस्थानाशी जुळलेले होते. दहशतवादी मोहम्मद खालिद अहमद हा मूळचा सोलापूरचा निवासी होय. एटीएसच्या वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, तो प्रारंभी सिमीत सक्रिय होता. सफदर नागोरी आणि रियाज भटकळच्या संपर्कात आल्यानंतर खालिद खतरनाक दहशतवादी बनला. तो नंतर इंडियन मुझाहिदीनमध्ये (इंमू , सिमीची पुढची आवृत्ती) काम करू लागला. तपास यंत्रणांच्या नजरेत येताच तो महाराष्ट्रातून एकाएक गायब झाला. त्यावेळी सिमीवर बंदी येण्यापूर्वी राज्याचा महासचिव म्हणून काम करणारा जियाउद्दीन सिद्दीकी (औरंगाबाद) याच्या संपर्कात खालिद आला.त्यानंतर सिमीचे राज्यभरात जोरदार नेटवर्क तयार झाले. औरंगाबाद, परभणी, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात त्यांनी सिमीच्या स्लीपरची भलीमोठी फळी तयार केली. घातपाती कृत्य करण्यासोबतच सिमी-इंमूचे दहशतवादी स्लिपर्सच्या माध्यमातून बँका लुटून, दरोडे घालून फंड जमा करीत होते. >चिखलीतही कटकारस्थानऔरंगाबाद चकमकीनंतर तपास यंत्रणांच्या डोळ्यात धूळ झोकून पळून गेलेला मोहम्मद सलिख याचा शोध घेण्यासाठी एटीएस जंगजंग पछाडत होती. दरम्यान, औरंगाबाद चकमक आणि तत्पूर्वी चिखली (जि. बुलडाणा) जवळ त्याने कटकारस्थान केल्याचे तपासात पुढे आले होते. त्यामुळे त्याच्याकडून राज्यातील सिमीच्या नेटवर्कचा धक्कादायक खुलासा होऊ शकतो, अशी खात्री एटीएसला होती. त्याला खंडवा जेल ब्रेक प्रकरणात अटक झाल्याचे माहीत झाल्यानंतर नागपूर-औरंगाबाद एटीएसने मध्य प्रदेशच्या सुरक्षा यंत्रणांकडे त्याचा ताबा मिळावा म्हणून बरेच प्रयत्न केले. मात्र, खंडवा प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत त्याला मध्य प्रदेशातून बाहेर काढण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता. त्यामुळे त्याचा ताबा स्थानिक एटीएसला मिळू शकला नाही. आज भोपाळच्या जेल ब्रेक आणि एन्काऊंटरमध्ये खालिद, खिलजीसोबत सलिखचेही नाव आल्याने तपास यंत्रणांमध्ये पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे.