शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

एसआरए योजनेंतर्गत विकासकाला तीन महिन्यांची मुदत

By admin | Updated: December 23, 2014 23:40 IST

एसआरए योजनेंतर्गत सुरु असलेली घरकुलाची कामे काही कारणास्तव रखडलेली असतील तर संबंधित विकासकाला तीन महिन्यांची नोटीस बजावण्यात येईल

नागपूर : एसआरए योजनेंतर्गत सुरु असलेली घरकुलाची कामे काही कारणास्तव रखडलेली असतील तर संबंधित विकासकाला तीन महिन्यांची नोटीस बजावण्यात येईल, त्यानंतरही कामाला सुरुवात न झाल्यास त्याला टर्मिनेट करण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी मंगळवारी विधानसभेत केली. सदा सरवणकर यांनी यासंबंधीची लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यात त्यांनी मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या इमारतीच्या दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला होता. काही खासगी विकासक म्हाडाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून इमारतीचे काम पूर्ण झाले नसतानाही आणि भोगवटा पत्र मिळण्याआधीच मूळ रहिवाशांना पुनर्बांधणी झालेल्या इमारतीत राहण्यासाठी पाठवित आहे. जी-दक्षिण आणि जी-उत्तर विभागात अशा भोडकरुंना मोठा मनस्ताप सहन कारावा लागत असल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींची पुनर्बांधणी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत, संबंधित इमारतीच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेमार्फत वा खासगी विकासकामार्फत मंडळाच्या परवानगीने केली जाते. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्रचित इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच भाडेकरु, रहिवासी नवीन इमारतींमध्ये स्थलांतरित होणे अपेक्षित असते. मंडळाकडून भोगवटा प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील नाहरकत प्रमाणपत्र पाप्त न झालेल्या पुनर्विकसित इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे अशा इमारतींमधील सदनिकांचा ताबा भाडेकरु, रहिवासी यांना दिला जात नाही. जी-दक्षिण विभागात एकूण ९८ पुनर्विकास प्रकल्पांसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले असून त्यापैकी ३३ प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले आहे. जी-उत्तर विभागात एकूण ३८० पुनर्विकास प्रकल्पांसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले असून त्यापैकी २१३ प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले आहे. उपकरप्राप्त इमारतीच्या पुनर्विकास योजनेतील नवीन इमारतीत अर्धवट सुविधा देऊन मूळ भाडेकरू, रहिवाशी यांना नवीन इमारतीत स्थलांतरित केले असल्याची बाब निदर्शनास आल्यास अशा विकासकाविरुद्ध एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. मंगलप्रभात लोढा, राज पुरोहित, आशिष शेलार यांनी सुद्धा यासंबंधातील प्रश्न उपस्थित केले होते. (प्रतिनिधी)