शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

एसआरए योजनेंतर्गत विकासकाला तीन महिन्यांची मुदत

By admin | Updated: December 23, 2014 23:40 IST

एसआरए योजनेंतर्गत सुरु असलेली घरकुलाची कामे काही कारणास्तव रखडलेली असतील तर संबंधित विकासकाला तीन महिन्यांची नोटीस बजावण्यात येईल

नागपूर : एसआरए योजनेंतर्गत सुरु असलेली घरकुलाची कामे काही कारणास्तव रखडलेली असतील तर संबंधित विकासकाला तीन महिन्यांची नोटीस बजावण्यात येईल, त्यानंतरही कामाला सुरुवात न झाल्यास त्याला टर्मिनेट करण्यात येईल, अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी मंगळवारी विधानसभेत केली. सदा सरवणकर यांनी यासंबंधीची लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यात त्यांनी मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या इमारतीच्या दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला होता. काही खासगी विकासक म्हाडाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून इमारतीचे काम पूर्ण झाले नसतानाही आणि भोगवटा पत्र मिळण्याआधीच मूळ रहिवाशांना पुनर्बांधणी झालेल्या इमारतीत राहण्यासाठी पाठवित आहे. जी-दक्षिण आणि जी-उत्तर विभागात अशा भोडकरुंना मोठा मनस्ताप सहन कारावा लागत असल्याचा मुद्दा त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींची पुनर्बांधणी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत, संबंधित इमारतीच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेमार्फत वा खासगी विकासकामार्फत मंडळाच्या परवानगीने केली जाते. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्रचित इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच भाडेकरु, रहिवासी नवीन इमारतींमध्ये स्थलांतरित होणे अपेक्षित असते. मंडळाकडून भोगवटा प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील नाहरकत प्रमाणपत्र पाप्त न झालेल्या पुनर्विकसित इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र दिले जात नाही. त्यामुळे अशा इमारतींमधील सदनिकांचा ताबा भाडेकरु, रहिवासी यांना दिला जात नाही. जी-दक्षिण विभागात एकूण ९८ पुनर्विकास प्रकल्पांसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले असून त्यापैकी ३३ प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले आहे. जी-उत्तर विभागात एकूण ३८० पुनर्विकास प्रकल्पांसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले असून त्यापैकी २१३ प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र मिळालेले आहे. उपकरप्राप्त इमारतीच्या पुनर्विकास योजनेतील नवीन इमारतीत अर्धवट सुविधा देऊन मूळ भाडेकरू, रहिवाशी यांना नवीन इमारतीत स्थलांतरित केले असल्याची बाब निदर्शनास आल्यास अशा विकासकाविरुद्ध एमआरटीपी अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. मंगलप्रभात लोढा, राज पुरोहित, आशिष शेलार यांनी सुद्धा यासंबंधातील प्रश्न उपस्थित केले होते. (प्रतिनिधी)