शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

पेरणीपूर्वीच संपली पीक विमा योजनेची मुदत

By admin | Updated: June 30, 2014 00:38 IST

पावसाच्या दडीने शेतकरी हैराण आहे. एकूण लागवड क्षेत्रापैकी केवळ २० टक्के क्षेत्रातच पेरणी झाली. या स्थितीत पिकांना संरक्षणासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजना जाहीर करण्यात आली.

रूपेश उत्तरवार - यवतमाळ पावसाच्या दडीने शेतकरी हैराण आहे. एकूण लागवड क्षेत्रापैकी केवळ २० टक्के क्षेत्रातच पेरणी झाली. या स्थितीत पिकांना संरक्षणासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजना जाहीर करण्यात आली. यासाठी अंतिम मुदत ३० जून आहे. मात्र पाऊस झाला नसल्याने पेरण्याही खोळंबल्या. अशा स्थितीत पीक विम्याची मुदत संपली आहे. नाममात्र लोकांनाच या योजनेचा लाभ घेतला.निसर्गाचा लहरीपणा, पावसाचा विलंब यामुळे शेतमालाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी हवामानावर आधारित पीक विमा जाहीर करण्यात आला. राज्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात आली. अमरावती विभागात यवतमाळ आणि अमरावती या दोन जिल्ह्यासाठीच ही योजना लागू करण्यात आली. याशिवाय इतर पाचही विभागात प्रायोगिक तत्वावर असलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ३० जून ही अंतिम मुदत आहे. पेरण्या खोळंबल्याने शेतकऱ्यांना पीक विमा काढता आला नाही. एका महत्वाकांक्षी योजनेला शेतकऱ्यांना मुकावे लागणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत नऊ लाख हेक्टरपैैकी १ लाख २० हजार हेक्टरवर पेरण्या व्हायच्या आहे. पश्चिम विदर्भात ४० लाख हेक्टरवर शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी अनेक ठिकाणी बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. यातूनच आजपर्यंत पिका विमा काढण्यासाठी शेतकरी पुढे आले नाही. शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र झालेले पेरणी क्षेत्र पटवाऱ्यांना माहीत नाही. यातून पटवारी पेरणीचे प्रमाणपत्र द्यायला तयार नाही. या योजनेचा प्रसारही पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. त्यामुळे शेतकरी पीक विमा काढण्यापासून वंचित राहिल्याचे सांगितले जाते. निसर्गाच्या लहरीपणापासून शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण देण्यात आले. त्यामुुळे शेतकऱ्यांना आशेचा किरण गवसला होता. प्रत्यक्षात पेरणीपूर्वीच मुदत संपल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसणार आहे. यातून असुरक्षिततेची भावना वाढीस लागून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.