शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

पेरणीपूर्वीच संपली पीक विमा योजनेची मुदत

By admin | Updated: June 30, 2014 00:38 IST

पावसाच्या दडीने शेतकरी हैराण आहे. एकूण लागवड क्षेत्रापैकी केवळ २० टक्के क्षेत्रातच पेरणी झाली. या स्थितीत पिकांना संरक्षणासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजना जाहीर करण्यात आली.

रूपेश उत्तरवार - यवतमाळ पावसाच्या दडीने शेतकरी हैराण आहे. एकूण लागवड क्षेत्रापैकी केवळ २० टक्के क्षेत्रातच पेरणी झाली. या स्थितीत पिकांना संरक्षणासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजना जाहीर करण्यात आली. यासाठी अंतिम मुदत ३० जून आहे. मात्र पाऊस झाला नसल्याने पेरण्याही खोळंबल्या. अशा स्थितीत पीक विम्याची मुदत संपली आहे. नाममात्र लोकांनाच या योजनेचा लाभ घेतला.निसर्गाचा लहरीपणा, पावसाचा विलंब यामुळे शेतमालाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी हवामानावर आधारित पीक विमा जाहीर करण्यात आला. राज्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात आली. अमरावती विभागात यवतमाळ आणि अमरावती या दोन जिल्ह्यासाठीच ही योजना लागू करण्यात आली. याशिवाय इतर पाचही विभागात प्रायोगिक तत्वावर असलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ३० जून ही अंतिम मुदत आहे. पेरण्या खोळंबल्याने शेतकऱ्यांना पीक विमा काढता आला नाही. एका महत्वाकांक्षी योजनेला शेतकऱ्यांना मुकावे लागणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत नऊ लाख हेक्टरपैैकी १ लाख २० हजार हेक्टरवर पेरण्या व्हायच्या आहे. पश्चिम विदर्भात ४० लाख हेक्टरवर शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी अनेक ठिकाणी बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. यातूनच आजपर्यंत पिका विमा काढण्यासाठी शेतकरी पुढे आले नाही. शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र झालेले पेरणी क्षेत्र पटवाऱ्यांना माहीत नाही. यातून पटवारी पेरणीचे प्रमाणपत्र द्यायला तयार नाही. या योजनेचा प्रसारही पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. त्यामुळे शेतकरी पीक विमा काढण्यापासून वंचित राहिल्याचे सांगितले जाते. निसर्गाच्या लहरीपणापासून शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण देण्यात आले. त्यामुुळे शेतकऱ्यांना आशेचा किरण गवसला होता. प्रत्यक्षात पेरणीपूर्वीच मुदत संपल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसणार आहे. यातून असुरक्षिततेची भावना वाढीस लागून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.