शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीपूर्वीच संपली पीक विमा योजनेची मुदत

By admin | Updated: June 30, 2014 00:38 IST

पावसाच्या दडीने शेतकरी हैराण आहे. एकूण लागवड क्षेत्रापैकी केवळ २० टक्के क्षेत्रातच पेरणी झाली. या स्थितीत पिकांना संरक्षणासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजना जाहीर करण्यात आली.

रूपेश उत्तरवार - यवतमाळ पावसाच्या दडीने शेतकरी हैराण आहे. एकूण लागवड क्षेत्रापैकी केवळ २० टक्के क्षेत्रातच पेरणी झाली. या स्थितीत पिकांना संरक्षणासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजना जाहीर करण्यात आली. यासाठी अंतिम मुदत ३० जून आहे. मात्र पाऊस झाला नसल्याने पेरण्याही खोळंबल्या. अशा स्थितीत पीक विम्याची मुदत संपली आहे. नाममात्र लोकांनाच या योजनेचा लाभ घेतला.निसर्गाचा लहरीपणा, पावसाचा विलंब यामुळे शेतमालाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी हवामानावर आधारित पीक विमा जाहीर करण्यात आला. राज्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात आली. अमरावती विभागात यवतमाळ आणि अमरावती या दोन जिल्ह्यासाठीच ही योजना लागू करण्यात आली. याशिवाय इतर पाचही विभागात प्रायोगिक तत्वावर असलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ३० जून ही अंतिम मुदत आहे. पेरण्या खोळंबल्याने शेतकऱ्यांना पीक विमा काढता आला नाही. एका महत्वाकांक्षी योजनेला शेतकऱ्यांना मुकावे लागणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत नऊ लाख हेक्टरपैैकी १ लाख २० हजार हेक्टरवर पेरण्या व्हायच्या आहे. पश्चिम विदर्भात ४० लाख हेक्टरवर शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी अनेक ठिकाणी बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. यातूनच आजपर्यंत पिका विमा काढण्यासाठी शेतकरी पुढे आले नाही. शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र झालेले पेरणी क्षेत्र पटवाऱ्यांना माहीत नाही. यातून पटवारी पेरणीचे प्रमाणपत्र द्यायला तयार नाही. या योजनेचा प्रसारही पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही. त्यामुळे शेतकरी पीक विमा काढण्यापासून वंचित राहिल्याचे सांगितले जाते. निसर्गाच्या लहरीपणापासून शेतकऱ्यांना पीक विम्याचे संरक्षण देण्यात आले. त्यामुुळे शेतकऱ्यांना आशेचा किरण गवसला होता. प्रत्यक्षात पेरणीपूर्वीच मुदत संपल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसणार आहे. यातून असुरक्षिततेची भावना वाढीस लागून शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची भीती आहे.