शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

डॉक्टरांअभावी ग्रामीण आरोग्य यंत्रणेवर ताण

By admin | Updated: March 4, 2015 01:55 IST

राज्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक यांची संख्या अपुरी आहे.

दीपक जाधव ल्ल पुणेराज्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक यांची संख्या अपुरी आहे. रिक्त पदे, बदली झाल्यानंतर रुजू न होणे या कारणांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत असल्याचे चित्र राज्यस्तरीय पथकाला पाहणीत आढळले आहे.‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन’ (एनआरएचएम) योजनेअंतर्गत केंद्राने दिलेल्या सेवेच्या हमीमध्ये विविध कारणांमुळे निम्मेच यश मिळाल्याचे दिसून आले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन योजनेला १० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण सरकारी रुग्णालयांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे, ठाणे, रायगड, बीड, औरंगाबाद, सोलापूर या ६ जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यात डॉक्टर, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार, वैद्यकीय महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. गाव बैठका, जनसुनवाई, मुलाखती या माध्यमातून पाहणी करण्यात आली.डॉक्टर, कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी रुग्णांनी केल्या. डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक यांची संख्या अपुरी असणे, त्यांच्या करारांचे वेळेवर नूतनीकरण न करणे, पगार वेळेवर न करणे आदी कारणांमुळे सेवेवर परिणाम होत असल्याचे आढळले. डॉक्टर-कर्मचारी उपस्थित राहण्याचे प्रमाण ५६ टक्के इतकेच आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांना निवास व्यवस्था, पाणी, वीज या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना रुग्णालयात २४ तास हजर उपस्थित राहता येत नसल्याचे दिसून आले.काही वर्षांपूर्वी सरकारी रुग्णालय म्हटले की, बऱ्याचशा आजारांवर एकच गोळी असे असणारे चित्र ‘एनआरएचएम’च्या अंमलबजावणीनंतर बदलले आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गावभेटी नियमित होत असल्याचे मत ६८ टक्के लोकांनी व्यक्त केले. गरोदर महिला व गंभीर रुग्णांना तातडीने अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध होत असल्याचे ७३ टक्के गावकऱ्यांनी सांगितले. कपात चिंताजनकराष्ट्रीय आरोग्य अभियानावरील तरतूद २०१५-१६ च्या अर्थसंकल्पामध्ये कमी करण्यात आली आहे. त्याचा फटका आरोग्य सेवांना बसणार आहे. सध्या डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवकांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे आवश्यक असताना अर्थसंकल्पामध्ये कपात झाल्याने सेवेवर परिणाम होणार आहे.