शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

डॉक्टरांअभावी ग्रामीण आरोग्य यंत्रणेवर ताण

By admin | Updated: March 4, 2015 01:55 IST

राज्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक यांची संख्या अपुरी आहे.

दीपक जाधव ल्ल पुणेराज्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवक यांची संख्या अपुरी आहे. रिक्त पदे, बदली झाल्यानंतर रुजू न होणे या कारणांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत असल्याचे चित्र राज्यस्तरीय पथकाला पाहणीत आढळले आहे.‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन’ (एनआरएचएम) योजनेअंतर्गत केंद्राने दिलेल्या सेवेच्या हमीमध्ये विविध कारणांमुळे निम्मेच यश मिळाल्याचे दिसून आले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन योजनेला १० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण सरकारी रुग्णालयांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पुणे, ठाणे, रायगड, बीड, औरंगाबाद, सोलापूर या ६ जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यात डॉक्टर, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार, वैद्यकीय महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. गाव बैठका, जनसुनवाई, मुलाखती या माध्यमातून पाहणी करण्यात आली.डॉक्टर, कर्मचारी नियमित उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी रुग्णांनी केल्या. डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक यांची संख्या अपुरी असणे, त्यांच्या करारांचे वेळेवर नूतनीकरण न करणे, पगार वेळेवर न करणे आदी कारणांमुळे सेवेवर परिणाम होत असल्याचे आढळले. डॉक्टर-कर्मचारी उपस्थित राहण्याचे प्रमाण ५६ टक्के इतकेच आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांना निवास व्यवस्था, पाणी, वीज या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना रुग्णालयात २४ तास हजर उपस्थित राहता येत नसल्याचे दिसून आले.काही वर्षांपूर्वी सरकारी रुग्णालय म्हटले की, बऱ्याचशा आजारांवर एकच गोळी असे असणारे चित्र ‘एनआरएचएम’च्या अंमलबजावणीनंतर बदलले आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गावभेटी नियमित होत असल्याचे मत ६८ टक्के लोकांनी व्यक्त केले. गरोदर महिला व गंभीर रुग्णांना तातडीने अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध होत असल्याचे ७३ टक्के गावकऱ्यांनी सांगितले. कपात चिंताजनकराष्ट्रीय आरोग्य अभियानावरील तरतूद २०१५-१६ च्या अर्थसंकल्पामध्ये कमी करण्यात आली आहे. त्याचा फटका आरोग्य सेवांना बसणार आहे. सध्या डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवकांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे आवश्यक असताना अर्थसंकल्पामध्ये कपात झाल्याने सेवेवर परिणाम होणार आहे.