शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

युतीमध्ये तणाव; १२ मे रोजी घटक पक्षांची बैठक

By admin | Updated: May 6, 2015 04:08 IST

केंद्रातील भाजपा सरकारला एक वर्ष तर राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला सहा महिने पूर्ण होत असले तरी सत्ताधारी भाजपाने महायुतीतील घटक पक्षांना चार हात लांबच ठेवले आहे.

मुंबई : केंद्रातील भाजपा सरकारला एक वर्ष तर राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला सहा महिने पूर्ण होत असले तरी सत्ताधारी भाजपाने महायुतीतील घटक पक्षांना चार हात लांबच ठेवले आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासपा व शिवसंग्राम या महायुतीतील घटक पक्षांमध्ये नाराजी धुमसत आहे. पुढील राजकीय दिशा ठरवण्याकरिता मंगळवार, १२ मे रोजी मुंबईतील एमआयजी क्लबमध्ये सकाळी साडेअकरा वाजता घटक पक्षांची बैठक होणार आहे.रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी ही बैठक बोलावली असून त्याला राजू शेट्टी, महादेव जानकर, विनायक मेटे हे उपस्थित राहणार आहेत. राज्यात सरकार येण्यापूर्वी जेव्हा भाजपाने शिवसेनेबरोबरची युती तोडली, तेव्हा या घटक पक्षांनी भाजपासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी लेखी स्वरूपात या नेत्यांना काही आश्वासने दिली होती. बहुतांश आश्वासने पाळलेली नाहीत, असे या नेत्यांचे मत आहे. राजू शेट्टी म्हणाले, भाजपाची निवडणुकीपूर्वीची व नंतरची भाषा खूप बदलली आहे. अद्याप या सरकारचे शंभर अपराध भरलेले नाहीत. त्यामुळे आम्ही संयम राखलेला आहे. राज्यातील ऊस व दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सरकारने काहीही केलेले नाही, असा आक्षेप शेट्टी यांनी घेतला. विनायक मेटे यांनी सांगितले की, घटक पक्षांना समन्वय समितीमध्ये स्थान देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. मात्र अद्याप त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. महामंडळ व समित्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. त्यामुळे आठवले यांनी बोलावलेल्या बैठकीला आम्ही हजर राहू. हा केवळ दबावतंत्राचा भाग नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली. (विशेष प्रतिनिधी)घटक पक्षांच्या नाराजीची प्रमुख कारणे> रिपाइंचे अविनाश महातेकर स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेवर नियुक्ती नाही.> मराठा आरक्षण रद्द झाल्याने विनायक मेटे नाराज> धनगर आरक्षणाच्या पूर्ततेअभावी रासपाचे महादेव जानकर चिडले.> समन्वय समितीत घटक पक्षांना स्थान दिले नाही.> सरकारमध्ये घटक पक्षांच्या नेत्यांची कामे होत नाहीत.> घटक पक्षांच्या नेत्यांना सन्मान दिला जात नाही.