शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

बीपीटीच्या जागेवरील भाडेकरूंची निदर्शने

By admin | Updated: April 5, 2017 02:41 IST

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवरील भाडेकरूंना घरे खाली करण्याची नोटीस दिल्याविरोधात शेकडो भाडेकरूंनी मंगळवारी आझाद मैदानात निदर्शने केली

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवरील भाडेकरूंना घरे खाली करण्याची नोटीस दिल्याविरोधात शेकडो भाडेकरूंनी मंगळवारी आझाद मैदानात निदर्शने केली. मुंबई पोर्ट ट्रस्टने कारवाईला स्थगिती देऊन राज्य शासनाने भाडेकरूंना दिलासा द्यावा, अशी मागणी संबंधित भाडेकरूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.भाडे नियंत्रण कायद्याच्या आधारे बीपीटी, एलआयसी आणि इतर सहकारी क्षेत्रीय संस्थांच्या जमिनीवरील भाडेकरूंना त्रास दिला जात असल्याचा आरोप सुबोध सप्रे यांनी केला. सप्रे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करत संबंधित प्रशासने भाडेकरूंना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावत आहेत. याआधीच सर्वोच्च न्यायालयाने २००६ साली भाडेकरू आणि प्रशासनाला तडजोडीचे सूत्र सांगितलेले आहे. या सूत्रानुसार २ हजार ३०० भाडेकरूंना दिलासा मिळणार आहे. या सूत्राची अंमलबजावणी करण्यासाठी सुमारे ४०० भाडेकरूंनी याआधीच ठरलेली रक्कम प्रशासनाकडे जमा केली आहे. मात्र तरीही गेल्या १० वर्षांत केवळ ६ भाडेकरूंनाच प्रशासनाने दिलासा दिलेला आहे. त्यामुळे संबंधित जागेवरून भाडेकरूंना हाकलून देण्याचा प्रशासनाचा डाव दिसत असल्याचा आरोपही सप्रे यांनी केला.याआधी काँग्रेसचे दिवंगत नेते मुरली देवरा असताना भाडेकरू आणि प्रशासनामध्ये मध्यस्थीची भूमिका बजावत होते. काही ठिकाणी तर पोलीस बलाचा वापर करून भाडेकरूंना बळजबरीने घरे खाली करण्यास सरकारने भाग पडल्याचा आरोप माजी नगरसेवक विनोद शेखर यांनी केला. (प्रतिनिधी)