शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
3
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
4
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
5
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
6
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
7
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
8
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
9
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
10
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
11
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
12
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
13
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
14
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
15
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
16
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
17
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
18
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
19
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
20
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
Daily Top 2Weekly Top 5

चिमणी संवर्धनाचे एक तप : 14 हजार घरट्यांचे मोफत वाटप

By admin | Updated: March 2, 2017 09:02 IST

अझहर शेख / आॅनलाइन लोकमत नाशिक, दि. 1 - लहानपणापासूनच निसर्गाविषयीची असलेली आवड आणि या आवडीतूनच वृक्ष, पक्षी, प्राण्यांची ...

अझहर शेख / आॅनलाइन लोकमत

नाशिक, दि. 1 - लहानपणापासूनच निसर्गाविषयीची असलेली आवड आणि या आवडीतूनच वृक्ष, पक्षी, प्राण्यांची लागलेली गोडी. निसर्गासाठी काहीतरी योगदान देण्याचे ध्येय घेऊन नाशिकमधील पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड हे मागील एक तपापासून चिमणी संवर्धनासाठी शहरात विशेष परिश्रम घेत आहेत. टाकाऊ फर्निचरच्या तुकड्यांपासून तयार केलेले १४ हजार कृत्रिम घरट्यांचे मोफत वाटप केले आहे. त्यांचा कृत्रिम घरटी वाटपाचे अभियान आजही सुरू आहे.

निसर्ग संवर्धनाचा घेतलेला वसा यशस्वीपणे पार पाडण्याची खुणगाठ गायकवाड यांनी बांधली. आपल्या अंगणातून उडून गेलेल्या चिमण्या पुन्हा कशा अंगणात परततील या चिंंतेतून मंथन करीत सुचलेल्या संकल्पनेतून त्यांनी एक प्रयोग करण्याचे ठरविले. गायकवाड यांनी आपले मित्र, नातेवाईक यांना फर्निचरच्या कामातून निघालेले टाकाऊ तुकडे फेकून न देता किंवा जाळून न टाकता दान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद लाभला.

मिळणाऱ्या फर्निचरच्या तुकड्यांपासून त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने लाकडी घरटी तयार करण्यास सुरूवात केली. प्रारंभी दहा ते पंधरा घरटी तयार करुन त्यांनी स्वत:च्या ‘संस्कृती’ अपार्टमेंटमध्ये सुरक्षितरीत्या टांगली. त्यानंतर राहत्या सदनिकेच्या खिडक्यांपासून तर बाल्कनीपर्यंत एकूण वीस घरटी त्यांनी लावली. एकूण चाळीस ते पन्नास घरटी त्यांनी अपार्टमेंटच्या परिसरात लावली. या घरट्यांचे दररोज निरीक्षण क रण्यास सुरूवात केली. सुरूवातीला चार ते पाच दिवस एकही चिमणीचे कुटुंब या कृत्रिम घरट्यांकडे फिरकले नाही; मात्र आठवडाभरातच ‘संस्कृती’च्या आवारातील घरट्यांमध्ये चिऊतार्इंनी संसार थाटण्यास सुरूवात केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आणि प्रयोग यशस्वी झाल्याच्या त्यांच्या आनंदापुढे जणू आकाश ठेंगणे झाले होते. त्यांच्या फ्लॅटच्या खिडक्यांमध्ये लावलेल्या घरट्यांमध्येही चिऊतार्इंनी वास्तव्यास सुरूवात केल्याने चिऊतार्इंचा चिवचिवाट ‘संस्कृती’मध्ये गुंजला.कृत्रिम घरटी चिऊताई स्वीकारते हे लक्षात आल्यानंतर गायकवाड यांनी मोफत कृत्रिम घरटी वाटप करण्याचे ठरविले. कारण विविध दुकानांमध्ये मिळणारे ‘बर्ड फिडर अ‍ॅण्ड बर्ड हाउस’च्या किमती अधिक असल्यामुळे नागरिक ते घेण्यास टाळाटाळ करत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली होती. त्यांनी विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना, मित्रपरिवाराला भेट म्हणून चिमणी घरटे देण्यास प्रारंभ केला. त्यानंतर शहरातील विविध संस्था, संघटना, फे्रे न्ड सर्कललादेखील चिमण्यांची घरटी मोफत वाटली. चिमणी संवर्धन व्हावे, हा एकमेव उद्देश त्यांचा यामागे होता. घरटी लावायची कशी याची सूचना व भ्रमणध्वनी क्रमांक असलेले स्टिकर त्यांनी प्रत्येक घरट्यावर चिकटवून ती घरटी वाटण्यास सुरुवात केली. त्यामुळे ज्यांच्या घरात घरट्यांमध्ये चिऊताई आली त्यांचा ‘कॉल’ गायकवाड यांना हमखास येतो. त्यांच्या आनंदपूर्ण संवाद ऐकून त्यांना जणू एकप्रकारे ऊर्जा मिळत गेली. हळूहळू नागरिक स्वयंस्फूर्तीने त्यांच्याकडे फर्निचरचे तुकडे आणून देऊ लागले. यामुळे त्यांना कारपेंटरची मदत घ्यावी लागली आणि घरटी तयार करण्याचे प्रमाण वाढविले. बारा वर्षांमध्ये त्यांनी जवळपास १४ हजार घरटी वाटप केले आहेत.

तरूणाईचे संघटन... सोळा हजार रोपांचे संवर्धन सर्वप्रथम शहरात चिमण्यांसाठी घरटी तयार करुन ती मोफत वाटणे व सकाळच्या सुमारास चारचाकी ट्रॉलीवर पाण्याने भरलेले डबे व काही रोपटे घेऊन मोकळ्या जागेवर वृक्षारोपणासाठी जाण्याचा दैनंदिन उपक्रम गायकवाड यांनी हाती घेतला. त्यांच्या या वृक्षप्रेमापोटी सकाळी स्वत:चे आरोग्य सुदृढ रहावे म्हणून फेरफटका मारणाऱ्या नाशिककरांचे लक्ष वेधले गेले. आपण आपल्या आरोग्यासाठी सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ करतो, मात्र हा अवलिया संपूर्ण शहराच्या पर्यावरणाचे आरोग्य सक्षम ठेवण्याचा विचार करत वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी झटतो आहे, हे नाशिककरांच्या लक्षात आले. ‘मै तो अकेला ही चला था जानिबे मंजील, मगर लोग साथ जुडते गयें और कारवां बनता गया...’ या शायरीप्रमाणे गायकवाड यांच्यासोबतही काही तरूणांसह मध्यमवयाच्या महिला, पुरूषही आले.

 

‘आता एकच चळवळ करुया वृक्षसंवर्धन’ असा नारा या निसर्गप्रेमींच्या ग्रुपने बुलंद केला. वृक्षारोपण करुन लावलेल्या झाडांचे संवर्धन करण्याचे व्रत त्यांच्या ‘आपलं पर्यावरण ग्रुप’ने घेतले आहे. नाशिकमध्ये वृक्ष लागवड व संवर्धनाचा घेतलेला वसा प्रामाणिकपणे गायकवाड यांनी स्थापन केलेल्या आपलं पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून होत आहे. गायकवाड यांनी सलग दोन वर्षे शहरात लोकसहभागातून पर्यावरण दिनाच्या मुहूर्तावर ‘वनमहोत्सव’ घेऊन पहिल्या टप्प्यात अकरा हजार, तर दुसऱ्या टप्प्यात साडेपाच हजार रोपांची लागवड केली. केवळ वृक्षारोपण न करता किमान तीन वर्षे रोपट्यांच्या संवर्धनाच्या माध्यमातून पालकत्व या संस्थेच्या हरित सैनिकांनी घेतली आहे. २०१५ साली नाशिककरांनी लावलेल्या अकरा हजार रोपट्यांचे रूपांतर वृक्षांमध्ये होत असल्याचे ‘देवराई’वर बघून नागरिकांना मनस्वी आनंद होत आहे.

https://www.dailymotion.com/video/x844t3o