शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

‘आधारवाडी’साठी दहाव्यांदा निविदा

By admin | Updated: September 20, 2016 04:01 IST

३२ कोटींची निविदा ही जास्त दराची असल्याने ती रद्द झाल्याने आता दहाव्या वेळी निविदा मागवण्याची तयारी पालिकेत सुरू आहे.

कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी मागवलेली ३२ कोटींची निविदा ही जास्त दराची असल्याने ती रद्द झाल्याने आता दहाव्या वेळी निविदा मागवण्याची तयारी पालिकेत सुरू आहे. याच डम्पिंगच्या विषयावरून कल्याण-डोंबिवलीतील बांधकामांवर न्यायालयाने बंदी घातली होती. हा विषय दीड वर्षात मार्गी लावण्याचे आश्वासन आयुक्त आणि महापौरांनी दिले होते. मात्र, ‘निविदा पे निविदा’ असाच हा खेळ सुरू असल्याचे दिसून आले. डम्पिंगसाठी आतापर्यंत नऊ वेळा निविदा मागवून झाल्या आहेत. त्या विविध कारणास्तव रद्द करण्यात आल्या आहेत. आधारवाडी डम्पिंग बंद करून घनकचरा व्यवस्थापन व शास्त्रोक्त विल्हेवाट प्रकल्प न राबवल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने गेल्यावर्षी बांधकामबंदी केली होती. ती जानेवारीत उठवली. ही स्थगिती कायमस्वरूपी उठवलेली नाही. पालिकेने १२ आॅगस्टला प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर प्रकल्प तातडीने राबवावा, अन्यथा पुन्हा स्थगितीचे आदेश दिले जातील, असा स्पष्ट इशारा उच्च न्यायालयाने दिला आहे. डम्पिंग बंद करण्यासाठी फेब्रुवारीत आठव्यावेळी निविदा प्रक्रिया राबवली. प्रकल्पाला असलेला स्थानिकांचा विरोध पाहता कंत्राटदाराने काढता पाय घेतला. आधारवाडी डम्पिंग आणि बारावे भरावभूमीसाठी नेमलेले कंत्राटदार पळून गेल्याने त्यांचे ६० लाख रुपये जप्त करण्यात आले. नंतर, नवव्या वेळी निविदा मागवली. तेव्हा, नवी मुंबईच्या गिरीश एंटरप्रायझेसची एकमेव निविदा मिळाली. ती ४० टक्के जास्त रकमेची असल्याने ही ३२ कोटींची निविदा स्वीकारण्याऐवजी पालिकेने ती नाकारली. आता दहाव्या वेळेस निविदा मागवली गेली आहे. (प्रतिनिधी) >डम्पिंगची सध्याची स्थिती काय?महापालिकेने डम्पिंग ग्राउंड बंद केलेले नाही. बारावे व मांडा या भरावभूमींसाठीही पालिकेने फेरनिविदा मागवल्या आहेत. त्या ९ आॅक्टोबरला उघडल्या जाणार आहेत. निविदांना प्रतिसाद न मिळणे, कंत्राटदार पळून जाणे आणि एकमेव निविदा आली, तर ती जास्त दराची असणे, या अशा विविध कारणास्तव आधारवाडी डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सुटण्याऐवजी तो निविदेच्या फेऱ्यातच गटांगळ्या खात आहे. गेल्यावर्षी एप्रिलपासून पालिकेने केवळ फेरनिविदा काढण्याचेच काम केले आहे. जोपर्यंत भरावभूमी सुरू होत नाही, तोवर डम्पिंग बंद करता येत नाही. उंबर्डे येथे एकाच ठिकाणी कचऱ्यापासून बायोगॅस प्रकल्प सुरू करण्यात महापालिकेस यश आले आहे. अन्य १३ ठिकाणी बायोगॅस प्रकल्प सुरू करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जैवकचऱ्यावर प्रक्रियेचे काम बारगळले आहे. याचा लेखाजोखा येत्या न्यायालयीन सुनावणीत मांडला जाणे अपेक्षित आहे.