शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

दहा लाख चारचाकी गाड्या

By admin | Updated: March 21, 2017 03:44 IST

उड्डाणपूल आणि नवीन द्रुतगती मार्ग उभारूनही मुंबईतील वाहतुकीची समस्या जैसे थे आहे. मुंबईच्या वाहतूककोंडीला वाहनांची वाढती संख्या प्रमुख कारण

मुंबई : उड्डाणपूल आणि नवीन द्रुतगती मार्ग उभारूनही मुंबईतील वाहतुकीची समस्या जैसे थे आहे. मुंबईच्या वाहतूककोंडीला वाहनांची वाढती संख्या प्रमुख कारण आहे. मुंबईतील चारचाकी वाहनांची संख्या १० लाखांवर गेल्याची माहिती राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणातून समोर आली आहे. नुकताच विधिमंडळात राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार राज्यात सर्व प्रकारची एकूण २ कोटी ९० लाख वाहने आहेत. त्यापैकी तब्बल १० टक्के म्हणजे २९ लाख वाहने एकट्या मुंबईत आहेत. त्यातही चारचाकी वाहनांची संख्या लक्षणीय आहे. मुंबईत जानेवारी २०१६पर्यंत नऊ लाख ३० हजार चारचाकी वाहने होती. पण गेल्या एका वर्षात यात ९.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार मुंबईत सध्या १० लाख २७ हजार चारचाकी वाहने आहेत. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्त्यांवरील ताण दिवसेंदिवस वाढतच आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढत असली, तरी ती वाहून नेण्यासाठी रस्त्यांची लांबी मात्र ठरावीक मर्यादेबाहेर वाढविणे शक्य नाही. मुंबईत आजही फक्त दोन हजार किलोमीटर लांबीचेच रस्ते आहेत. वाहनांची संख्या आणि रस्त्यांच्या लांबीबाबत असणाऱ्या या व्यस्त समीकरणामुळे वाहनांच्या बाबतीत मुंबई देशातील सर्वाधिक घनतेचे महानगर ठरले आहे. मुंबईत प्रति शंभर मीटर १४१ वाहने उभी राहू शकतात. तर नागपूरमध्ये हाच आकडा फक्त ३६ आहे. नागपूरपाठोपाठ ठाण्यात ३३ तर पुण्यात २६ वाहने उभी राहतात. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईत पार्किंगसाठीही जागा उरलेली नाही. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी सोसायटीबाहेरील पदपथांवरच वाहने उभी केली जातात. (प्रतिनिधी)एकीकृत वाहतूक व्यवस्थेचाच पर्याय -प्रचंड गर्दीमुळे बेस्ट बसेस आणि लोकल गाड्यांचा प्रवास जिकिरीचा ठरतो. संख्या आणि सुविधेच्या बाबतीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नकोशी झाल्यानेच अनेक जण खासगी वाहनांचा पर्याय निवडतात. त्यामुळे रस्त्यांवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. हा ताण कमी करण्यासाठी सुखकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचा मागणी तज्ज्ञांनी लावून धरली आहे. मेट्रो आणि मोनो प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता असून, सर्व वाहतूक व्यवस्था एकमेकांशी जोडण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील ताण कमी करायचा असेल तर एकीकृत वाहतूक व्यवस्थेशिवाय पर्याय नाही.