शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

दहा लाख चारचाकी गाड्या

By admin | Updated: March 21, 2017 03:44 IST

उड्डाणपूल आणि नवीन द्रुतगती मार्ग उभारूनही मुंबईतील वाहतुकीची समस्या जैसे थे आहे. मुंबईच्या वाहतूककोंडीला वाहनांची वाढती संख्या प्रमुख कारण

मुंबई : उड्डाणपूल आणि नवीन द्रुतगती मार्ग उभारूनही मुंबईतील वाहतुकीची समस्या जैसे थे आहे. मुंबईच्या वाहतूककोंडीला वाहनांची वाढती संख्या प्रमुख कारण आहे. मुंबईतील चारचाकी वाहनांची संख्या १० लाखांवर गेल्याची माहिती राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणातून समोर आली आहे. नुकताच विधिमंडळात राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार राज्यात सर्व प्रकारची एकूण २ कोटी ९० लाख वाहने आहेत. त्यापैकी तब्बल १० टक्के म्हणजे २९ लाख वाहने एकट्या मुंबईत आहेत. त्यातही चारचाकी वाहनांची संख्या लक्षणीय आहे. मुंबईत जानेवारी २०१६पर्यंत नऊ लाख ३० हजार चारचाकी वाहने होती. पण गेल्या एका वर्षात यात ९.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार मुंबईत सध्या १० लाख २७ हजार चारचाकी वाहने आहेत. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्त्यांवरील ताण दिवसेंदिवस वाढतच आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढत असली, तरी ती वाहून नेण्यासाठी रस्त्यांची लांबी मात्र ठरावीक मर्यादेबाहेर वाढविणे शक्य नाही. मुंबईत आजही फक्त दोन हजार किलोमीटर लांबीचेच रस्ते आहेत. वाहनांची संख्या आणि रस्त्यांच्या लांबीबाबत असणाऱ्या या व्यस्त समीकरणामुळे वाहनांच्या बाबतीत मुंबई देशातील सर्वाधिक घनतेचे महानगर ठरले आहे. मुंबईत प्रति शंभर मीटर १४१ वाहने उभी राहू शकतात. तर नागपूरमध्ये हाच आकडा फक्त ३६ आहे. नागपूरपाठोपाठ ठाण्यात ३३ तर पुण्यात २६ वाहने उभी राहतात. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईत पार्किंगसाठीही जागा उरलेली नाही. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी सोसायटीबाहेरील पदपथांवरच वाहने उभी केली जातात. (प्रतिनिधी)एकीकृत वाहतूक व्यवस्थेचाच पर्याय -प्रचंड गर्दीमुळे बेस्ट बसेस आणि लोकल गाड्यांचा प्रवास जिकिरीचा ठरतो. संख्या आणि सुविधेच्या बाबतीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नकोशी झाल्यानेच अनेक जण खासगी वाहनांचा पर्याय निवडतात. त्यामुळे रस्त्यांवरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. हा ताण कमी करण्यासाठी सुखकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचा मागणी तज्ज्ञांनी लावून धरली आहे. मेट्रो आणि मोनो प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता असून, सर्व वाहतूक व्यवस्था एकमेकांशी जोडण्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील ताण कमी करायचा असेल तर एकीकृत वाहतूक व्यवस्थेशिवाय पर्याय नाही.