शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

दहा जिल्हे अजून कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:40 IST

कोकण किनारपट्टी, मुंबई महानगर आणि विदर्भातील गडचिरोली, वर्धा जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असताना राज्यातील इतर दहा जिल्हे मात्र

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोकण किनारपट्टी, मुंबई महानगर आणि विदर्भातील गडचिरोली, वर्धा जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असताना राज्यातील इतर दहा जिल्हे मात्र अजून कोरडेच आहेत.औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, अकोला, जालना, यवतमाळ या नऊ जिल्ह्यांत आतापर्यंत सरासरीच्या २६ ते ५० टक्केच पाऊस झाला असून सोलापूर जिल्ह्यात २५ टक्केही पाऊस झालेला नाही. राज्यात ७२ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. आतापर्यंत झालेल्या लागवडीत सर्वाधिक क्षेत्र कापसाचे असून त्याखालोखाल तेलबिया आणि तृणधान्याची लागवड करण्यात आली आहे. त्याबरोबरच राज्यातील धरणांमध्ये ३४.७४ टक्के साठा असला तरी तो गेल्यावर्षी आजच्या तारखेपेक्षा तीन टक्के अधिक आहे. राज्यात १ जून ते १९ जुलैअखेर १८२.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. हा पाऊस सरासरीच्या ७३.९ टक्के एवढा असून गेल्या वर्षी याच सुमारास तो सरासरीच्या १०८.५ टक्के एवढा झाला होता. ठाणे, रायगड, पालघर, पुणे, गडचिरोली या पाच जिल्ह्यांत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस आतापर्यंत झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, सातारा, सांगली, वर्धा, भंडारा, गोदिंया, चंद्रपूर या दहा जिल्ह्यांत ७६ ते १०० टक्के पाऊस; धुळे, जळगांव,अहमदनगर, कोल्हापूर, नांदेड, बुलडाणा, वाशिम, अमरावती, नागपूर या नऊ जिल्ह्यांत ५१ ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.राज्यातील खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र १३९.६४ लाख हेक्टर असून १४ जुलैअखेर १०१.२० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. तसेच कोकण, कोल्हापूर, पुणे विभागात भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत. यामध्ये कापसाची ३५.५३ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून त्याखालोखाल तेलबिया (३१.६७ लाख हेक्टर) आणि तृणधान्याची (१७.२५ लाख हेक्टर ) पेरणी झाली आहे.