शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
7
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
8
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
9
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
10
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
11
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
12
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
13
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
14
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
15
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
16
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
17
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
18
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

दहा जिल्हे अजून कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:40 IST

कोकण किनारपट्टी, मुंबई महानगर आणि विदर्भातील गडचिरोली, वर्धा जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असताना राज्यातील इतर दहा जिल्हे मात्र

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोकण किनारपट्टी, मुंबई महानगर आणि विदर्भातील गडचिरोली, वर्धा जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असताना राज्यातील इतर दहा जिल्हे मात्र अजून कोरडेच आहेत.औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, अकोला, जालना, यवतमाळ या नऊ जिल्ह्यांत आतापर्यंत सरासरीच्या २६ ते ५० टक्केच पाऊस झाला असून सोलापूर जिल्ह्यात २५ टक्केही पाऊस झालेला नाही. राज्यात ७२ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. आतापर्यंत झालेल्या लागवडीत सर्वाधिक क्षेत्र कापसाचे असून त्याखालोखाल तेलबिया आणि तृणधान्याची लागवड करण्यात आली आहे. त्याबरोबरच राज्यातील धरणांमध्ये ३४.७४ टक्के साठा असला तरी तो गेल्यावर्षी आजच्या तारखेपेक्षा तीन टक्के अधिक आहे. राज्यात १ जून ते १९ जुलैअखेर १८२.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. हा पाऊस सरासरीच्या ७३.९ टक्के एवढा असून गेल्या वर्षी याच सुमारास तो सरासरीच्या १०८.५ टक्के एवढा झाला होता. ठाणे, रायगड, पालघर, पुणे, गडचिरोली या पाच जिल्ह्यांत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस आतापर्यंत झाला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, सातारा, सांगली, वर्धा, भंडारा, गोदिंया, चंद्रपूर या दहा जिल्ह्यांत ७६ ते १०० टक्के पाऊस; धुळे, जळगांव,अहमदनगर, कोल्हापूर, नांदेड, बुलडाणा, वाशिम, अमरावती, नागपूर या नऊ जिल्ह्यांत ५१ ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.राज्यातील खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र १३९.६४ लाख हेक्टर असून १४ जुलैअखेर १०१.२० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. तसेच कोकण, कोल्हापूर, पुणे विभागात भात पिकाच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत. यामध्ये कापसाची ३५.५३ लाख हेक्टरवर पेरणी झाली असून त्याखालोखाल तेलबिया (३१.६७ लाख हेक्टर) आणि तृणधान्याची (१७.२५ लाख हेक्टर ) पेरणी झाली आहे.