शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा

By admin | Updated: February 4, 2017 01:30 IST

विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांवर बार कौन्सिल आॅफ इंडियाने (बीसीआय) घातलेल्या वयाच्या अटीवर उच्च न्यायालयाने तात्पुरती दिलेली स्थगिती आणखी काही

मुंबई: विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांवर बार कौन्सिल आॅफ इंडियाने (बीसीआय) घातलेल्या वयाच्या अटीवर उच्च न्यायालयाने तात्पुरती दिलेली स्थगिती आणखी काही दिवस कायम केली. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात तात्पुरत्या स्वरुपी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नका, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. सप्टेंबर २०१६ मध्ये बीसीआयने २० वर्षांवरील विद्यार्थ्यांना पाच वर्षांच्या एलएलबी कोर्ससाठी तर ३० वर्षांवरील विद्यार्थ्यांना तीन वर्षांच्या एलएलबी कोर्ससाठी अपात्र ठरवले. त्यामुळे राज्य सरकारनेही या वयोगटातील विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देत बीसीआयच्या निर्णयाच्या अधीन राहून हे प्रवेश अंतिम करण्यात येतील, असे राज्य सरकारने कोर्सच्या माहिती पुस्तकात म्हटले आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी बीसीआयच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली. मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवरील सुनावणी होती.शुक्रवारच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी अद्याप बीसीआयने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘बीसीआयने नेमलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल प्रलंबित आहे. या समितीचे काय म्हणणे आहे, हे समजून घेण्यासाठी थांबावे लागेल,’ असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले. याचिकाकर्त्यांचे म्हणणे मान्य करत खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी काही आठवडे तहकूब केली.‘त्या वयानंतरचे विद्यार्थी(अट घातलेल्या वयानंतरची) वचनबद्ध नसतात?’ असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला होता. बीसीआयने घातलेल्या अटीबाबत वेगवेगळ्या राज्यांच्या उच्च न्यायालयांनी वेगवेगळे निकाल दिले आहेत. अलहाबाद आणि पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने बीसीआयच्या वयोमर्यादेविरुद्ध निकाल दिला आहे. तर मदुराई उच्च न्यायालयाने बीसीआयची वयाची मर्यादा योग्य असल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी) - गेल्या सुनावणीत बीसीआयच्या वकिलांनी वयोमर्यादेबाबत ११० पानी उत्तर खंडपीठासमोर सादर केले. ‘आम्हाला स्थिर विद्यार्थी हवे आहेत. काही विद्यार्थी प्रवेश घेतात आणि मग निघून जातात. त्यामुळे वयोमर्यादेची अट घालण्यात आली आहे,’ असे बीसीआयच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले.