शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा

By admin | Updated: February 4, 2017 01:30 IST

विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांवर बार कौन्सिल आॅफ इंडियाने (बीसीआय) घातलेल्या वयाच्या अटीवर उच्च न्यायालयाने तात्पुरती दिलेली स्थगिती आणखी काही

मुंबई: विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांवर बार कौन्सिल आॅफ इंडियाने (बीसीआय) घातलेल्या वयाच्या अटीवर उच्च न्यायालयाने तात्पुरती दिलेली स्थगिती आणखी काही दिवस कायम केली. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात तात्पुरत्या स्वरुपी प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नका, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. सप्टेंबर २०१६ मध्ये बीसीआयने २० वर्षांवरील विद्यार्थ्यांना पाच वर्षांच्या एलएलबी कोर्ससाठी तर ३० वर्षांवरील विद्यार्थ्यांना तीन वर्षांच्या एलएलबी कोर्ससाठी अपात्र ठरवले. त्यामुळे राज्य सरकारनेही या वयोगटातील विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देत बीसीआयच्या निर्णयाच्या अधीन राहून हे प्रवेश अंतिम करण्यात येतील, असे राज्य सरकारने कोर्सच्या माहिती पुस्तकात म्हटले आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी बीसीआयच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली. मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवरील सुनावणी होती.शुक्रवारच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी अद्याप बीसीआयने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘बीसीआयने नेमलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल प्रलंबित आहे. या समितीचे काय म्हणणे आहे, हे समजून घेण्यासाठी थांबावे लागेल,’ असे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले. याचिकाकर्त्यांचे म्हणणे मान्य करत खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी काही आठवडे तहकूब केली.‘त्या वयानंतरचे विद्यार्थी(अट घातलेल्या वयानंतरची) वचनबद्ध नसतात?’ असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला होता. बीसीआयने घातलेल्या अटीबाबत वेगवेगळ्या राज्यांच्या उच्च न्यायालयांनी वेगवेगळे निकाल दिले आहेत. अलहाबाद आणि पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने बीसीआयच्या वयोमर्यादेविरुद्ध निकाल दिला आहे. तर मदुराई उच्च न्यायालयाने बीसीआयची वयाची मर्यादा योग्य असल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी) - गेल्या सुनावणीत बीसीआयच्या वकिलांनी वयोमर्यादेबाबत ११० पानी उत्तर खंडपीठासमोर सादर केले. ‘आम्हाला स्थिर विद्यार्थी हवे आहेत. काही विद्यार्थी प्रवेश घेतात आणि मग निघून जातात. त्यामुळे वयोमर्यादेची अट घालण्यात आली आहे,’ असे बीसीआयच्या वकिलांनी खंडपीठाला सांगितले.