शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

‘तात्पुरते’ बसले अडून!

By admin | Updated: May 6, 2015 04:30 IST

मंत्री आस्थापनेवरील सर्व पदे भरण्यात आली तरी १२५ ‘तात्पुरते’ कर्मचारी मूळ विभागात परत जाण्यास तयार नाहीत.

यदु जोशी, मुंबईराज्यातील मंत्र्यांकडे तात्पुरत्या स्वरूपात गेलेले अधिकारी-कर्मचारी तिथे चांगलाच ठिय्या मांडून बसले आहेत. मंत्री आस्थापनेवरील सर्व पदे भरण्यात आली तरी हे १२५ ‘तात्पुरते’ कर्मचारी मूळ विभागात परत जाण्यास तयार नाहीत.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर विविध विभागांनी आपल्याकडील कर्मचाऱ्यांना मंत्री आस्थापनेवर तात्पुरत्या स्वरूपात पाठविले. पीए, पीएस, ओएसडी, लिपिक, टंकलेखक, शिपाई आदी पदांवर गेलेले हे कर्मचारी तिथे असे काही रमले, की मूळ विभागात परतण्याचे नाव ते घेत नाहीत. अल्पाधितच त्यांनी एकनाथ खडसे, विनोद तावडे अशा वजनदार मंत्र्यांशी सूत जमविल्यामुळे विभाग प्रमुखांनी ‘परती’चा आदेश काढला तरी त्यांनी त्यास जुमानले नाही. मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात बाहेरील व्यक्तींना कर्मचारी/ अधिकारी म्हणून सामावून घेण्यात आले आहे. त्यांना सहसचिव, उपसचिव आदी पदांचा दर्जाही देण्यात आला आहे. या सर्वांना महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ लागू करण्यात आला आहे. विधी व न्याय विभागाचा सल्ला घेऊनच सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचे सर्व नियम त्यांना लागू झाले आहेत. सामान्य प्रशासन विभागातून पाच कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या मंत्री आस्थापनेवर पाठविण्यात आले होते. मात्र ते कर्मचारी मूळ विभागात परत येईनात. म्हणून विभागाने आदेश काढून त्यांना मूळ विभागात तीन दिवसांत रुजू व्हा नाहीतर वेतन रोखू, असा दम दिल्यावर ते विभागात परतले.... तपासणीनंतर निर्णयप्रत्येक मंत्री आस्थापनेवर किती कर्मचारी/अधिकारी असतील याचा एक आकृतीबंध असतो. त्यानुसार पदे भरण्यात आल्यानंतर कर्मचारी अतिरिक्त ठरतात का ते तपासले जाईल. तात्पुरत्या स्वरुपात पाठविलेले कर्मचारी अतिरिक्त असतील तर त्यांना त्यांच्या विभागामध्ये परत जावे लागेल. - स्वाधीन क्षत्रिय, मुख्य सचिव. या नियमातील काही तरतुदीच्कर्मचाऱ्यांना वा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देणग्या घेता येणार नाहीत.च्सार्वजनिक ठिकाणी मादक पेय किंवा मादक औषधी द्रव्यांचे सेवन करता येणार नाही.च्संपत्तीचे विवरण नियमितपणे सरकारकडे सादर करावे लागेल.च्शेअरची खरेदी विक्री करता येणार नाही.च्धार्मिक तेढ पसरविणाऱ्या संघटनेचे सदस्य होता येणार नाही. च्कोणताही कर्मचारी दूरचित्रवाणी किंवा आकाशवाणीच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही किंवा वृत्तपत्र वा नियतकालिकाकडे लेख व पत्र पाठवू शकणार नाही.