शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

‘तात्पुरते’ बसले अडून!

By admin | Updated: May 6, 2015 04:30 IST

मंत्री आस्थापनेवरील सर्व पदे भरण्यात आली तरी १२५ ‘तात्पुरते’ कर्मचारी मूळ विभागात परत जाण्यास तयार नाहीत.

यदु जोशी, मुंबईराज्यातील मंत्र्यांकडे तात्पुरत्या स्वरूपात गेलेले अधिकारी-कर्मचारी तिथे चांगलाच ठिय्या मांडून बसले आहेत. मंत्री आस्थापनेवरील सर्व पदे भरण्यात आली तरी हे १२५ ‘तात्पुरते’ कर्मचारी मूळ विभागात परत जाण्यास तयार नाहीत.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात आल्यानंतर विविध विभागांनी आपल्याकडील कर्मचाऱ्यांना मंत्री आस्थापनेवर तात्पुरत्या स्वरूपात पाठविले. पीए, पीएस, ओएसडी, लिपिक, टंकलेखक, शिपाई आदी पदांवर गेलेले हे कर्मचारी तिथे असे काही रमले, की मूळ विभागात परतण्याचे नाव ते घेत नाहीत. अल्पाधितच त्यांनी एकनाथ खडसे, विनोद तावडे अशा वजनदार मंत्र्यांशी सूत जमविल्यामुळे विभाग प्रमुखांनी ‘परती’चा आदेश काढला तरी त्यांनी त्यास जुमानले नाही. मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात बाहेरील व्यक्तींना कर्मचारी/ अधिकारी म्हणून सामावून घेण्यात आले आहे. त्यांना सहसचिव, उपसचिव आदी पदांचा दर्जाही देण्यात आला आहे. या सर्वांना महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ लागू करण्यात आला आहे. विधी व न्याय विभागाचा सल्ला घेऊनच सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचे सर्व नियम त्यांना लागू झाले आहेत. सामान्य प्रशासन विभागातून पाच कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या मंत्री आस्थापनेवर पाठविण्यात आले होते. मात्र ते कर्मचारी मूळ विभागात परत येईनात. म्हणून विभागाने आदेश काढून त्यांना मूळ विभागात तीन दिवसांत रुजू व्हा नाहीतर वेतन रोखू, असा दम दिल्यावर ते विभागात परतले.... तपासणीनंतर निर्णयप्रत्येक मंत्री आस्थापनेवर किती कर्मचारी/अधिकारी असतील याचा एक आकृतीबंध असतो. त्यानुसार पदे भरण्यात आल्यानंतर कर्मचारी अतिरिक्त ठरतात का ते तपासले जाईल. तात्पुरत्या स्वरुपात पाठविलेले कर्मचारी अतिरिक्त असतील तर त्यांना त्यांच्या विभागामध्ये परत जावे लागेल. - स्वाधीन क्षत्रिय, मुख्य सचिव. या नियमातील काही तरतुदीच्कर्मचाऱ्यांना वा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देणग्या घेता येणार नाहीत.च्सार्वजनिक ठिकाणी मादक पेय किंवा मादक औषधी द्रव्यांचे सेवन करता येणार नाही.च्संपत्तीचे विवरण नियमितपणे सरकारकडे सादर करावे लागेल.च्शेअरची खरेदी विक्री करता येणार नाही.च्धार्मिक तेढ पसरविणाऱ्या संघटनेचे सदस्य होता येणार नाही. च्कोणताही कर्मचारी दूरचित्रवाणी किंवा आकाशवाणीच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही किंवा वृत्तपत्र वा नियतकालिकाकडे लेख व पत्र पाठवू शकणार नाही.